शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

निराधार योजनेचे एक हजार प्रस्ताव प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:20 IST

मानवत : आर्थिक दुर्बल निराधार घटकातील लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी संजय गांधी निराधार योजनेची बैठक होत नसल्याने मागील ६ ...

मानवत : आर्थिक दुर्बल निराधार घटकातील लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी संजय गांधी निराधार योजनेची बैठक होत नसल्याने मागील ६ महिन्यापासून १ हजार प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे निराधार लाभार्थांमधून संताप व्यक्त होत आहे.

निराधार घटकासाठी संजय गांधी निराधार योजनेंतर्गत मासिक लाभाच्या योजना राबविण्यात येतात. यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्ती योजना या दोन राज्य सरकारच्या तर इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अंपग निवृत्तीवेतन योजना, आणि राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजना या केंद्र सरकार मार्फत राबविण्यात येतात. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा १ हजार रुपये अनुदान देण्यात येते. योजनेतील लाभार्थ्यांचे प्रस्ताव निवडीसाठी पालकमंत्री यांच्या शिफारशीने तालुकास्तरावर समिती स्थापन करण्यात येते. विधानसभा निवडणुकीत राज्यात सत्ता परिवर्तन होऊन शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या पक्षाचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. मात्र सरकार स्थापन होऊन दीड वर्षाचा कालावधी उलटला तरी संजय गांधी निराधार योजनेची समिती स्थापन झाली नाही. सद्यस्थितीत तहसीलदार डी. डी. फुफाटे यांच्याकडे प्रस्ताव मंजूर करण्याचे अधिकार आहेत. तहसीलदार फुफाटे यांनी ४ सप्टेंबर रोजी बैठकीचे आयोजन करुन ४०० प्रकरण निकाली काढली होती. यापैकी मंजूर झालेल्या १६९ लाभार्थ्यांची प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी २५६ अर्जदाराचे प्रस्ताव नामंजूर करण्यात आले होते. यापैकी मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना अनुदानही सुरू झाले आहे. त्यानंतर मात्र मागील सहा महिन्यात २४ फेब्रुवारीपर्यंत १ हजारावर नवीन प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे दखल झाले आहेत. हे प्रस्ताव प्रलंबित असल्याची माहिती मिळत आहे. समिती स्थापन होत नसल्याने निराधारांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे तत्काळ बैठकीचे आयोजन करून दाखल झालेले प्रस्ताव निकाली काढावेत, अशी मागणी निराधारातून होत आहे.

अर्जांचा निपटारा करण्याची मागणी

राज्य सरकार ही प्रकरणे निकाली काढण्यासाठी संजय गांधी निराधार समिती नियुक्त करत असते. या समितीवर अध्यक्ष आणि तीन सदस्य असतात. मात्र महाविकास आघाडी सरकारकडून अद्यापही समितीची नियुक्ती करण्यात आली नाही. यामुळे समिती स्थापनेची वाट न बघता तहसीलदारांनी आपल्या अधिकारात लवकरात लवकर बैठक घेऊन प्रकरणाचा निपटारा करण्याची मागणी विविध पक्ष संघटनाकडून होत आहे.

राज्य सरकार द्वारा गठित करण्यात येणाऱ्या समितीची वाट न बघता तहसीलदारांनी निराधारांचे प्रस्ताव मार्गी लावावेत. जेणेकरुन अर्जदार लाभार्थ्यांना दिलासा मिळेल. यामुळे तातडीने बैठकीचे आयोजन करणे गरजेचे आहे.

प्रेरणाताई वरपूडकर , प्रदेश सरचिटणीस युवक काँग्रेस