शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
5
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
6
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
7
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
10
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
11
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
12
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
13
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
14
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
15
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
16
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
17
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
18
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
19
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
20
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 

विहिरीत पडून माय-लेकीचा मृत्यू; जिंतूर तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 21:38 IST

हा अपघात आहे की घातपात, याची चर्चा परिसरात सुरू झाली आहे.

बामणी (जि.परभणी) : जिंतूर तालुक्यातील वाघी धानोरा येथे विहिरीत पडून माय-लेकीचा मृत्यू झाल्याची घटना ३ जुलै रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून, हा अपघात आहे की घातपात, याची चर्चा परिसरात सुरू झाली आहे.

जिंतूर तालुक्यातील वाघी धानोरा येथील उषा शिवाजी खंदारे (४०) आणि आकांक्षा शिवाजी खंदारे (१८) या माय-लेकींचा मृतदेह त्यांच्या शेतालगत असलेल्या कल्याण तात्याराव खंदारे यांच्या विहिरीत शुक्रवारी पहाटे ५ च्या सुमारास आढळून आला. याबाबतची माहिती गावातील पोलीस पाटील छाया उद्धवराव तनपुरे यांनी बामणी पोलिसांना दिली. त्यानंतर सहायक पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, सहायक पोलीस निरीक्षक गिरी, फौजदार हनुमंत नागरगोजे, जमादार पिंपळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर विहिरीतून दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. 

या घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात दोघींचेही शवविच्छेदन केले. सद्यस्थितीत या घटनेची आकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. मयत महिलेस आणखी २० व १४ वर्षे वयाची दोन मुले आहेत. दरम्यान, या माय-लेकींचा अपघाती मृत्यू झाला की घातपात झाला? याची चर्चा परिसरात सुरू आहे. पोलीस तपासात ही बाब समोर येणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू