शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दीड महिन्यांत ६५ जणांना मृत्यूने गाठले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:11 IST

परभणी : जिल्ह्यात मागील दीड महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग वाढला तसा मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. या काळात ६५ जणांचा ...

परभणी : जिल्ह्यात मागील दीड महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग वाढला तसा मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. या काळात ६५ जणांचा मृत्यू झाला असून, त्यातील ३५ जणांचा मृत्यू हा शासकीय रुग्णालयात झाला आहे.

जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या संसर्गाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत आरोग्य विभागाने तपासण्या जवळपास तिपटीने वाढविल्या आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही तेवढीच होत आहे. रुग्णसंख्या वाढली असली तरी रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही त्याच तुलनेने वाढले आहे. मागील कोरोनाच्या काळात खासगी रुग्णालयातील मृत्यूची संख्या कमी होती. परंतु, या टप्प्यात खासगी रुग्णालयातही मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढले आहेत. १५ फेब्रुवारीपासून ते २७ मार्चपर्यंत जिल्ह्यात कोरोनाने ६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ३० रुग्णांचा मृत्यू खासगी रुग्णालयात झाला असून, ३५ रुग्णांचा मृत्यू शासकीय रुग्णालयात झाला आहे.

जानेवारी महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढू लागला. मात्र फेब्रुवारीमध्ये ही संख्या झपाट्याने वाढत गेली. त्याचबरोबर रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. फेब्रुवारी महिन्यात शासकीय आणि खासगी रुग्णालयात सर्वसाधारणपणे एक-दोन दिवसांआड एक ते दोन रुग्णांचा मृत्यू होत होता. परंतु, मागच्या ५ दिवसांपासून मृत्यूचे प्रमाणही झपाट्याने वाढले आहे. मागच्या ५ दिवसांत ३० रुग्णांचा मृत्यू झाला.

उपचारापूर्वी मृत्यूचे प्रमाण नगण्य

कोरेाना रुग्णाला उपचार मिळण्यापूर्वीच किंवा त्यास दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या नोंदी जिल्ह्यात नाहीत. हे प्रमाण तसे शून्य आहे. शासकीय पातळीवर रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या उपलब्ध नाही. त्यामुळे जिल्ह्यात उपचारापूर्वी किती रुग्णांचा मृत्यू झाला, याची आकडेवारीही प्रशासनाकडे उपलब्ध नाही.

आतापर्यंत ९२ रुग्णांचा २४ तासांत मृत्यू

मागील वर्षीच्या मार्च महिन्यापासून आतापर्यंत साडेतीनशेपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात ९२ रुग्णांचा मृत्यू रुग्णालयात दाखल झाल्यानंतर २४ तासांच्या आत झाल्याची नोंद आहे.

त्याचप्रमाणे ८७ रुग्णांचा मृत्यू हा दोन-तीन दिवसांनी, ७७ रुग्णांचा मृत्यू चार ते सात दिवसांनी, ५९ रुग्णांचा मृत्यू ८ ते १४ दिवसांनी तर ४३ रुग्णांचा मृत्यू १४ दिवसांनी झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे.