शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विकासकामांना लागेना मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:20 IST

बाजारपेठेतील गर्दी कमी होईना परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने प्रशासन उपाययोजना करीत असले तरी अद्यापपर्यंत बाजारपेठ भागातील गर्दी ...

बाजारपेठेतील गर्दी कमी होईना

परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने प्रशासन उपाययोजना करीत असले तरी अद्यापपर्यंत बाजारपेठ भागातील गर्दी कमी झालेली नाही. शहरात फिरणारे काही नागरिक मास्कचा वापर करीत असले तरी फिजिकल डिस्टन्सच्या बाबतीत मात्र पालन होत नाही. गर्दी कमी व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाने धार्मिक स्थळे, आठवडे बाजार बंद केला आहे. मात्र बाजारपेठ भागातील गर्दीकडे दुर्लक्ष होत आहे.

बसस्थानक भागात सुविधांचा अभाव

परभणी : येथील बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात असुविधा असून, त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. पिण्याचे पाणी, आसन व्यवस्था, सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे या सुविधा बसस्थानकावर उपलब्ध नाहीत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. बसपोर्टचे काम लवकर पूर्ण होणार नसल्याने किमान तात्पुरत्या बसस्थानकात सुविधा तरी उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी होत आहे.

रसवंत्या, शितगृहे पुन्हा सुरू

परभणी : जिल्ह्यात उन्हाळ्याची चाहूल सुरू झाली असून, उन्हापासून बचाव करण्यासाठी आतापासूनच उपाययोजना सुरू झाल्या आहेत. शहरात रसवंत्य, शीतगृहे सुरू करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे आईस्क्रीम पार्लर चालकांनीही तयारी सुरू केली असून, उन्हाळ्यात आईस्क्रीमला मागणी असल्याने साठा वाढविला आहे.

वाहनधारकांच्या अडचणी खड्ड्यांमुळे वाढल्या

परभणी : शहरातील बाजारपेठ भागातील रस्ते खराब झाल आहेत. कच्छी बाजारातून जनता मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे झाले आहेत. या अरुंद रस्त्यावर आधीच वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. त्यातच खड्ड्यांचे प्रमाण वाढले असल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मनपाने खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे.

उद्यानातील लॉन पाण्याअभावी वाळली

परभणी : येथील राजगोपालाचारी उद्यानातील लॉन पाण्याअभावी वाळली आहे. कोरोनाच्या संसर्गानंतर सर्व व्यवहार सुरळीत झाले असले तरी उद्यानाच्या व्यवस्थापनाबाबत अद्याप ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. मागील काही महिन्यांपासून लॉनसाठी पाण्याचे व्यवस्थापन केले नसल्याने ही लॉन वाळली आहे. परिणामी उद्यान ओसाड बनले आहे.

बसफेऱ्या अभावी ग्रामस्थांची गैरसोय

परभणी : जिल्ह्यातील ग्रामीण भागात एसटी महामंडळाने बसफेऱ्या सुरू केल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. एसटी महामंडळाने लांब पल्ल्याच्या बसफेऱ्या सुरू केल्या. मात्र जिल्ह्यांतर्गत ग्रामीण भागातील बसफेऱ्या प्रवासी मिळत नसल्याने सुरू केल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनाने तालुक्याचे ठिकाण गाठावे लागते. महामंडळाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.