शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

शाळा बंद असल्याने मानव विकासचा निधी ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:21 IST

ग्रामीण भागातील विद्यार्थिनींची शाळेत जाण्यासाठी होणारी गैरसोय दूर व्हावी, या उद्देशाने मानव विकास विभागाच्यावतीने एस.टी. महामंडळाच्या माध्यमातून मानव विकास ...

ग्रामीण भागातील विद्यार्थिनींची शाळेत जाण्यासाठी होणारी गैरसोय दूर व्हावी, या उद्देशाने मानव विकास विभागाच्यावतीने एस.टी. महामंडळाच्या माध्यमातून मानव विकास बसेस चालविल्या जातात. दरवर्षी जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानंतर त्या-त्या तालुक्यातील गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मानव विकासच्या बसेचा मार्ग निश्चित केला जातो. या मार्गानुसार होणाऱ्या फेऱ्या लक्षात घेऊन मानव विकास मिशनच्या माध्यमातून एस. टी. महामंडळाला निधी उपलब्ध केला जातो. या निधीमुळे एस.टी. महामंडळाच्या उत्पन्नातही मोठी वाढ होते. मात्र, कोरोनाच्या संसर्गामुळे मागील दीड वर्षांपासून जिल्ह्यातील शाळा बंद आहेत. त्यामुळे मानव विकासाची बससेवाही बंद ठेवण्यात आली आहे.

जिल्ह्यात मानव विकास मिशनच्या एकूण ६३ बसेस आहेत. प्रत्येक तालुक्यासाठी ७ बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. ७ लाख ४ हजार रुपये प्रतिबस याप्रमाणे मानव विकास मिशनच्या माध्यमातून एस.टी. महामंडळाला निधी दिला जातो. २०१९-२० मध्ये जिल्ह्यासाठी ४ कोटी ४३ लाख ५२ हजार रुपयांचा निधी मिळाला होता. मात्र, त्यानंतर २०२०-२१ मध्ये तीन महिने ही बससेवा चालविण्यात आली. त्यात १ कोटी ४६ लाख ३६ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यासाठी वापरण्यात आला. चालू शैक्षणिक वर्षात अद्याप शाळा सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे यावर्षी देखील मानव विकासची सेवा सुरू होते की नाही, याबद्दल साशंकता असून, निधी मिळण्याची शक्यता कमीच आहे.

१८.९३ लाखांचा केला दर

मानव विकास मिशनसाठी आतापर्यंत प्रति बस ७ लाख ४ हजार रुपये या प्रमाणे निधी मंजूर केला जात होता. दरम्यानच्या काळात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली, डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे एस.टी. महामंडळाने तिकीट भाडेही वाढविले आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, मानव विकास मिशनने ३० मार्च २०२१ रोजी अध्यादेश काढून मानव विकासच्या बसेससाठी १८.९३ लाख रुपये प्रतिबस या दराने एस.टी. महामंडळाला निधी देण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयानंतर शाळा बंद असल्याने नवीन दराप्रमाणे अद्याप महामंडळाला हा निधी मिळाला नाही. मागील वर्षीचा त्यास अपवाद या आहे. यावर्षात ३ महिने बससेवा सुरू होती. त्याचा एरिएसचा १ कोटी ४६ लाख रुपयांचा निधी महामंडळाला प्राप्त झाला आहे.

इतर योजना मात्र सुरूच

मानव विकासच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध योजना राबविल्या जातात. बससेवेसाठी दोन वर्षांपासून निधी मिळाला नसला तरी महिलांच्या आरोग्यासाठी घेतलेले जाणारे आरोग्य शिबिरे, गरोदर मातांसाठी असलेली बुडीत मजुरी या योजना जिल्ह्यात सध्या राबविल्या जात आहेत.