शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

आता मिळणार मोफत शिवभोजन थाळी; १,५०० जणांचे भरणार पोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:16 IST

परभणी : जिल्ह्यातील ११ केंद्रांवरील १ हजार ५०० लाभार्थ्यांना आता राज्य शासनाच्या वतीने माेफत शिवभोजन थाळी देण्यात येणार ...

परभणी : जिल्ह्यातील ११ केंद्रांवरील १ हजार ५०० लाभार्थ्यांना आता राज्य शासनाच्या वतीने माेफत शिवभोजन थाळी देण्यात येणार आहे. ३० एप्रिलपर्यंत दररोज याचा संबंधितांना लाभ मिळणार आहे.

राज्यभरात कोरोना संकट गडद होत आहे. त्यामुळे राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीमधून अत्यावश्यक सेवांनाच सूट देण्यात आली आहे. सर्व व्यवहार बंद राहणार असल्याने राज्य शासनाच्या शिवभोजन थाळीचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची उपासमार होऊ नये, यासाठी त्यांना मोफत शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक तर परभणी शहरात ३ शिवभोजन थाळी केंद्रांना मंजुरी देण्यात आलेली आहे. या केंद्रांवरून दररोज १ हजार ५०० लाभार्थ्यांना आतापर्यंत ५ रुपयात शिवभोजन थाळी देण्यात येत होती. आता या सर्व १ हजार ५०० लाभार्थ्यांना मोफत शिवभोजन थाळी देण्यात येणार आहे. त्यामुळे शासनाच्या योजनेचा या लाभार्थ्यांना लाभ होणार आहे. प्रशासनाच्या संचारबंदी नियमांचा यासाठी त्यांना अडसर होणार नाही.

थाळीचा लाभ घेणारे

राज्य शासनाने सुरू केलेली शिवभोजन थाळी योजना अत्यंत उपयुक्त आहे. या योजनेमुळे अल्पदरात आणि चांगल्या प्रकारे अन्न मिळत आहे. शासनाने सामाजिक जाणिवेतून घेतलेला हा निर्णय आम्हा सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. या निर्णयाचे स्वागत.

- अनिल काळे

कोरोनाचा फैलाव वाढत आहे. त्यामुळे हाताला काम नाही. अशात शासनाने १५ दिवस का होईना मोफत शिवभोजन थाळी देण्याचा घेतलेला निर्णय चांगला आहे. सर्वसामान्य व्यक्तींच्या हिताचा निर्णय राज्य सरकारकडून होत आहे. याबद्दल शासनाचे आभार.

परभणी येथे शिवभोजन थाळी योजनेंतर्गत चांगल्या दर्जाचे जेवण देण्यात येते. शासनाच्या या निर्णयाचा गरीब, मजूर व होतकरू व्यक्तींना लाभ होत आहे. याचे समाधान वाटत आहे.

१५०० जणांना मिळतो दररोज लाभ....

परभणी शहरात दररोज एका केंद्रावर २७५ जणांना शिवभोजन थाळीचा लाभ देण्यात येतो. तर गंगाखेड शहरातील केंद्रावर १५० जणांना दररोज या योजनेचा मिळतो.

तालुकास्तरावर प्रत्येक शिवभोजन थाळी केंद्रावरून ७५ नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जातो. त्यामध्ये परभणी वगळता ८ तालुक्याचा समावेश आहे.

जिल्ह्यातील शिवभोजन थाळी केंद्र

११

दररोज किती जण घेतात लाभ

१,५००