शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात चार लाख कुटुंबांना मिळणार मोफत धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:16 IST

परभणी : अन्न सुरक्षा योजनेतील जिल्ह्यातील ४ लाख १४ हजार ६९८ रेशनकार्डधारकांना राज्य शासनाने मंगळवारी घोषित केलेल्या मोफत ...

परभणी : अन्न सुरक्षा योजनेतील जिल्ह्यातील ४ लाख १४ हजार ६९८ रेशनकार्डधारकांना राज्य शासनाने मंगळवारी घोषित केलेल्या मोफत धान्य वितरण निर्णयाचा लाभ होणार आहे.

कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्यशासनाने ३० एप्रिलपर्यंत राज्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. याचा परिणाम दारिद्र्य रेषेखालील तसेच गरजू कुटुंबीयांवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. या दृष्टीकोनातून राज्य शासनाने अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अशा लाभार्थ्यांना दरमहा दोन किलो तांदूळ व तीन किलो गहू देण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयाचा जिल्ह्यातील ४ लाख १४ हजार ६८९ लाभार्थ्यांना फायदा होणार आहे. यामध्ये बीपीएल कुटुंबातील ७० हजार ९२३ तर अंत्योदय योजनेतील ४४ हजार ९५३ आणि केशरी रेशन कार्ड असलेल्या २ लाख ९४ हजार ७६ रेशन कार्डधारक लाभार्थ्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कुटुंबीयांना ५ किलो मोफत धान्य देण्याची मंगळवारी घोषणा केल्यानंतर त्याची तातडीने प्रशासनाकडून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी

हाताला काम नसल्याने घरीच बसून आहोत. आता शासनाने ३ किलो गहू व दोन किलो तांदूळ देण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. कोरोनामुळे काम मिळणेही कमी झाले आहे. त्यामुळे वर्षभर शासनाने हा निर्णय लागू करावा. याचा गरजू लोकांना फायदा होईल.

१५ दिवसांसाठी मुख्यमंत्र्यांनी ५ किलो धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. तो योग्यच आहे. राज्यावर कोरोनाचे गंभीर संकट आले आहे. त्यामुळे शासनाने घालून दिलेल्या नियमांचे प्रत्येकाने पालन करणे आवश्यक आहे. त्यातूनच कोरोनावर मात करता येईल.

सरकारचा निर्णय चांगला आहे. गेल्या वर्षीही जवळपास सहा महिने सरकारने मोफत धान्य दिले होते. आताही १५ दिवसांसाठी का होईना हे धान्य मिळणार आहे. परंतु, धान्याचा दर्जा चांगला राहावा.

तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मिळणार

मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या निर्णयानुसार पात्र रेशन कार्डधारकांना प्रत्येकी ३ किलो गहू आणि दोन किलो तांदूळ देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही, अशा व्यक्तींनाही या योजनेचा लाभ शासनाच्यावतीने देण्यात येणार आहे. तसे मुख्यमंत्र्यांनी घोषित केले आहे.

अनेक गरजू कुटुंबीय या योजनेसाठी पात्र असतानाही त्यांच्याकडे रेशन कार्ड नाही. त्यामुळे या योजनेचा ते लाभ घेऊ शकत नाहीत, अशा लाभार्थ्यांसाठी पुरवठा विभागाकडे नवे रेशन कार्ड प्राप्त झाले आहे. त्यांनी संबंधित तहसील कार्यालयाकडे कार्डसाठी अर्ज केल्यास त्यांना सदरील कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहेत.