शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
3
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
6
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
7
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
8
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
9
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
10
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
11
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

राज्यातील शेतकरी पुन्हा आंदोलनाच्या पावित्र्यात : परभणीत पत्रकार परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:41 AM

फसवी कर्जमाफी, शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. कर्जमाफी होऊनही शेतकरी आत्महत्या थांबत नसल्याने हे सरकारचे अपयश असून शेतकºयांच्या हक्कासाठी २३ मार्चपासून राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय शेतकरी सुकाणू समितीने घेतला आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : फसवी कर्जमाफी, शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. कर्जमाफी होऊनही शेतकरी आत्महत्या थांबत नसल्याने हे सरकारचे अपयश असून शेतकºयांच्या हक्कासाठी २३ मार्चपासून राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय शेतकरी सुकाणू समितीने घेतला आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील यांनी दिली.येथील सावली विश्रामगृहावर २३ फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी रघुनाथ पाटील यांच्यासह सुकाणू समितीतील सत्यशोधक शेतकरी सभेचे किशोर ढमाले, किसान सभेचे विलास बाबर, अ‍ॅड.राजन क्षीरसागर, बंडू सोळंके, अमृतराव शिंदे, लिंबाजी कचरे, बालासाहेब आळणे, माऊली कदम, सलीम शेख, प्रल्हाद जाधव, रामराजे महाडिक, मुंजाभाऊ कदम, नारायण आवचार, मोहन मानोलीकर आदींची उपस्थिती होती. या आंदोलनाच्या जनजागृतीसाठी १६ फेब्रुवारीपासून सांगली येथून पायलट दौरा सुरु करण्यात आला आहे. सरसगट कर्जमाफीची घोषणा केल्यानंतरही शासनाने शब्द फिरविला. बोंडअळीमुळे नुकसानग्रस्त शेतकºयांना अद्यापही मदत मिळाली नाही. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये शेतकरी कर्ज, कर, वीज बिल भरु शकत नाही. त्यामुळे २३ मार्चपासून असहकार आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे रघुनाथ पाटील यांनी सांगितले. किशोर ढबाले म्हणाले, २३ मार्च रोजी हुतात्मा अभिवादन शेतकरी शहीद स्मृती दिवसापासून इस्मालपूर येथून जागर यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. ३० एप्रिल रोजी राज्यभरात जेलभरो आंदोलन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.हमीभाव न देता शेतकºयांची लूटराज्य शासनामार्फत नुसते निर्णय घेऊन शेतकºयांची फसवणूक केली जात आहे. प्रत्येक शेतमालाला हमीभाव जाहीर केला जातो. परंतु, प्रत्यक्षात हा हमीभाव मिळत नाही. हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणे गुन्हा असताना याविरुद्ध कारवाई होत नाही. मागील आंदोलनाच्या वेळी दुधाला हमीभाव जाहीर करण्यात आला. परंतु, आतापर्यंत या हमीभावाने दुधाची खरेदी झाली नाही. परिणामी राज्यातील शेतकºयांची ४ हजार २०० कोटी रुपयांची लूट झाली. शासनाला शेतकºयांविषयी गांभीर्य नसल्याचा आरोपही पाटील यांनी यावेळी केला.