शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

ग्रामीण महाआवास अभियानास मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2021 4:18 AM

केंद्र शासनाच्या वतीने १९ नोव्हेंबर २०१६ पासून ‘सर्वांसाठी घरे’ या धोरणांतर्गत राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेची २० नोव्हेंबर २०१६ पासून ...

केंद्र शासनाच्या वतीने १९ नोव्हेंबर २०१६ पासून ‘सर्वांसाठी घरे’ या धोरणांतर्गत राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेची २० नोव्हेंबर २०१६ पासून अंमलबजावणी करण्यात आली. त्यानुसार २० नोव्हेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय आवास दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या योजनेंतर्गत ग्रामीण योजनांच्या गतिमानतेसाठी व गुणवत्तावाढीसाठी राज्यात ‘महाआवास अभियान-ग्रामीण’ हा उपक्रम १९ नोव्हेंबर २०२० पासून सुरू करण्यात आला. ग्रामीण गृहनिर्माण योजनेअंतर्गत शासकीय यंत्रणेबरोबरच, सर्व पंचायतराज संस्था, स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था, खासगी संस्था, तंत्रशिक्षण संस्था, बँका, लोकप्रतिनिधी, लाभार्थी, ग्रामस्थ यांचा सक्रियपणे सहभाग वाढविणे तसेच नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून घरांचा दर्जा व गुणवत्ता वाढविणे, गृहनिर्माण क्षेत्रातील भागधारकांची क्षमता बांधणी व जनजागृतीद्वारे लोकचळवळ उभी करणे, हा या अभियानाचा उद्देश होता. या अनुषंगाने विभाग, जिल्हा, तालुका, स्तरावर आणि ग्रामपातळीवरही कार्यशाळेचे १८ डिसेंबर २०२० पर्यंत आयोजन करण्यात आले होते. हे अभियान राबविण्यास २८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर त्यास ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. आता सद्य:स्थितीत निर्माण झालेली कोरोना परिस्थिती पाहता या अभियानास ५ जूनपर्यंत पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे या अंतर्गत प्रलंबित राहणाऱ्या या घरकुलांच्या कामांना वेग येणार आहे.