शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
4
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
5
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
6
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
7
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
8
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
9
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
10
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
11
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
12
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
13
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
14
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
15
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
16
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
17
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
18
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
19
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
20
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना डेथ ऑडिट; ६४ टक्के रुग्णांचा ७२ तासांत मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:13 IST

परभणी : कोरोनाच्या संसर्गामुळे दवाखान्यात दाखल झालेल्या ७८१ रुग्णांचा ७२ तासांत मृत्यू झाला आहे. हे प्रमाण एकूण मृत्यूच्या ...

परभणी : कोरोनाच्या संसर्गामुळे दवाखान्यात दाखल झालेल्या ७८१ रुग्णांचा ७२ तासांत मृत्यू झाला आहे. हे प्रमाण एकूण मृत्यूच्या ६४.४४ टक्के एवढे आहे. विशेष म्हणजे, मृत पावलेल्या बहुतांश रुग्णांना पूर्वीपासूनच व्याधी होती.

कोरोनाच्या संसर्गामुळे जिल्ह्यात १ हजार २१२ रुग्णांच्या मृत्यूचे विश्लेषण आरोग्य विभागाने केले आहे. ७८१ रुग्णांचा मृत्यू कोरोना झाल्याने दवाखान्यात दाखल झाल्यानंतर ७२ तासांत झाला आहे. हे प्रमाण सर्वाधिक आहे. त्याचप्रमाणे २१३ रुग्णांचा दवाखान्यात दाखल झाल्यानंतर अवघ्या २४ तासांतच मृत्यू झाला. १११ रुग्णांचा मृत्यू हा २४ ते ४८ तासांत झाला आहे. तर ४८ ते ७२ तासांत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १०७ एवढी आहे.

कोरोनाने मृत्यू झालेल्या या रुग्णांपैकी बहुतांश रुग्णांना पूर्वी सहव्याधी असल्याचेही पुढे आले आहे. तर अनेक रुग्ण कोरोनाची लागण झाल्यानंतर उशिराने दवाखान्यात दाखल झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याची बाबही पुढे येत आहे. त्यामुळे कोरोनाच्या लाटेत निष्काळजीपणा झाल्यानेही अनेकांवर मृत्यू ओढावल्याचे आरोग्य विभागाने केलेल्या मृत्यूच्या विश्लेषणानंतर समोर येत आहे.

पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण निम्मे

कोरोना झाल्यानंतर दवाखान्यात दाखल झालेल्या ७८१ रुग्णांचा मृत्यू ७२ तासांत झाला आहे. मृत्यू पावलेल्या या रुग्णांमध्ये ५३५ पुरुष, तर २४६ महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण १२१२ रुग्णांच्या मृत्यूचे आरोग्य विभागाने विश्लेषण केले आहे. त्यात ८०४ पुरुष आणि ४०८ महिला रुग्णांचा समावेश आहे. तर दवाखान्यात दाखल झाल्यानंतर २४ तासांत मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये ८५ महिला रुग्णांचा समावेश आहे.

मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण

कोरोना संसर्ग काळ मधुमेही रुग्णांसाठी सर्वाधिक धोकादायक काळ ठरला आहे. कोरोनाने मृत्यू पावलेल्या रुग्णांमध्ये मधुमेह असलेल्या रुग़्णांचे प्रमाण अधिक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

मधुमेह असलेल्या रुग़्णांना आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यातच कोरोनाची लागण झाल्याने कोरोना काळात या रुग्णांना औषधी आणि ऑक्सिजन लागण्याचे प्रमाण अधिक राहिले.

त्याचप्रमाणे हृदयरोग, रक्तदाब, कर्करोग यासारख्या आजाराच्या रुग्णांसाठीही कोरोना संसर्ग अधिक धोकादायक ठरला आहे.

बालकांचे प्रमाण अत्यल्प

कोरोनाने मृत्यू झालेल्या बालकांचे प्रमाण मात्र अत्यल्प आहे. ० ते १० वर्षे वयोगटातील पाच बालकांचा आतापर्यंत मृत्यू झाला.