शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

वाळूअभावी १५० घरकुलांचे बांधकाम ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:17 IST

नगरपालिकेच्या माध्यमातून अनुसूचित जातीसाठी रमाई घरकुल योजना शहरात प्रभावीपणे राबवली जात आहे. शहरातील आंबेडकरनगर, पंचशीलनगर, बुद्धनगर या प्रमुख भागासह ...

नगरपालिकेच्या माध्यमातून अनुसूचित जातीसाठी रमाई घरकुल योजना शहरात प्रभावीपणे राबवली जात आहे. शहरातील आंबेडकरनगर, पंचशीलनगर, बुद्धनगर या प्रमुख भागासह इतर भागांत राहत असलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील जवळपास १५० लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाली आहेत. घरकुलाचा पहिला आणि दुसरा हप्ता मिळाल्याने लाभार्थांनी घरकुल बांधकामाला सुरुवात केली. मात्र वाळू मिळत नसल्याने या लाभार्थ्यांचे घरकुल बांधकाम रखडले आहे. वाळू माफिया वाळूची चोरी करून अव्वाच्या सव्वा दराने विक्री करत आहेत. यामध्ये तीन ब्रास क्षमता असलेले वाहन २२ हजार रुपयाला जात आहे. पाच ब्रास वाळू क्षमता असलेले हायवा हे वाहन ४५ हजार रुपयाला विक्री केले जात आहे. अव्वाच्या सव्वा दराने वाळू विक्री करून वाळूमाफिया मलिदा लाटत असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. वाळूचे हे दर सामान्य घरकुल लाभार्थ्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने ते खरेदी करू शकत नसल्याचे चित्र आहे. परिणामी मागील दोन महिन्यापासून या घरकुलाचे बांधकाम बंद पडले आहे. काही लाभार्थ्यांना दुसरीकडे राहण्याचा ठिकाण नसल्याने उघड्यावरच दिवस काढावे लागत आहेत. दुसरीकडे शासनाने घरकुल लाभार्थ्यासाठी पाच ब्रास वाळूची सोय केली आहे. याबाबतीत शासनाने रीतसर परिपत्रक काढले असतानाही ही मोफत वाळू मिळत नसल्याने लाभार्थी त्रस्त झाले आहेत. राज्य सरकारने याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयांना दिले आहेत. मात्र प्रशासनाकडून लाभार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्याबाबत उदासीनता दिसून येत आहे.

वाळू घाट आरक्षित करण्याची मागणी

जिल्हाधिकारी कार्यालयाने वाळू घाटांची नुकतीच लिलाव प्रक्रिया पार पडली असून, तालुक्यातील वांगी येथील वाळू घाट यावेळी पाथरी येथील ठेकेदाराला सुटला आहे. आठवडाभरात येथील वाळू विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. मात्र मागील दोन वर्षांपासून घाटाचे लिलाव झाले नसल्याने यामुळे या वेळेस वाळूची मागणी मोठ्या प्रमाणावर असणार आहे. वाळूच्या दराबाबत ही बांधकाम करणाऱ्या नागरिकांना चिंता लागली आहे. घरकुल लाभार्थ्यांना मिळणारा निधी आणि वाळूचे दर पाहता लाभार्थ्यांना हे परवडणार नसल्याने जिल्हाधिकारी यांनी विशेष लक्ष घालून रमाई घरकुल लाभार्थ्यांसाठी पाच ब्रास वाळू उपलब्ध व्हावी यासाठी तालुक्यातील गोदावरी नदीवरील एखादा वाळू घाट आरक्षित करावा, अशी मागणी होत आहे.