शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! ६ गावांमध्ये पिण्याचे पाणीच ठरू शकते आजाराचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:06 IST

जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा व भूजल विभागाकडून दरमहा तपासल्या जाणाऱ्या दूषित पाण्याच्या नमुन्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एप्रिल महिन्यात तपासलेल्या ...

जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा व भूजल विभागाकडून दरमहा तपासल्या जाणाऱ्या दूषित पाण्याच्या नमुन्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एप्रिल महिन्यात तपासलेल्या ३ हजार ८७८ नमुन्यांपैकी सहा नमुने दूषित आढळले आहेत. त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या उपाययोजना राज्य शासन राबवित आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील दूषित निघालेल्या सहा गावांतील पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर आजार फैलावण्याची शक्यता नाकारता येत नाही. शुद्ध पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असल्याने ग्रामपंचायतीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे आदेश जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने संबंधित ग्रामपंचायतींना दिले आहेत.

पाणी नमुने सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह

जिल्हा आरोग्य विभागाकडून दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासले जातात. विशेष म्हणजे जिल्ह्यातील ७०४ गावांतील ३ हजार ८७८ पाणी नमुने एप्रिल महिन्यात तपासण्यात आल्याचे पाणी नमुने सर्वेक्षण विभागाने सांगितले.

दुसरीकडे पाथरी तालुक्यात जून महिन्यात तपासणी करण्यात आलेल्या ५९ पाणी नमुन्यांपैकी ४ गावांतील पाणी नमुने दूषित आढळून आले आहेत. तर वर्षभरात एकूण ३३६ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील ३६ पाणी नमुने दूषित आढळून आले तर जिल्हा आरोग्य विभागाच्या एप्रिल महिन्याच्या अहवालात ४३८ नमुने तपासण्यात आले. त्यातील एकही दूषित आढळून आला नसल्याने या पाणी नमुने सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

कोरोनामळे नमुने घेण्यास अडचण

n जिल्हा आरोग्य विभागाकडून दर महिन्याला ग्रामीण भागातील प्रत्येक गावातील पाणी नमुने तपासले जातात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रत्येक गावातील पाणी नमुदे तपासण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला.

n त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने एप्रिल २०२१ मध्ये पाणी नमुने सर्वेक्षण करण्यात आले.

n त्यामध्ये ३ हजार ८७८ नमुन्यांपैकी केवळ सहा नमुने दूषित आढळून आले.

आजारी पडायचे नसेल तर पाणी उकळून प्या!

n ग्रामीण भागात बहुतांश पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांच्या विहिरी या नदी, ओढ्यांच्या काठी आहेत. त्यामुळे या नदी व ओढ्यांना पूर आल्यानंतर पुराचे पाणी या विहिरींमध्ये जाते.

n ग्रामीण भागात खाजगी विहिरी, बोअर या जलस्रोतांजवळ मोठ्या प्रमाणात घाण पाणी साचते.

n बहुतांश जलस्रोतांजवळून गावातील नाल्या वाहतात. त्यामुळे ग्रामस्थांनी पाणी पिताना ते पाणी उकळून पिण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

पूर्णा तालुका अग्रेसर

n जिल्हा आरोग्य विभागाकडून पाणी नमुने सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये पूर्णा तालुक्यातील ६२५ नमुन्यांची तपासणी केली.

n त्यामध्ये ५ नमुने दूषित आढळून आले. जिल्ह्यात पूर्णा तालुक्यात सर्वाधिक नमुने दूषित आढळले.