शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

१२ हजार व्यक्तींना सहव्याधी; तातडीने उपचारासाठी सुचविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:14 IST

कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात आरोग्य विभागामार्फत ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविली होती. ...

कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात आरोग्य विभागामार्फत ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविली होती. या मोहिमेअंतर्गत राज्यभरात शहर व ग्रामीण भागात कोरोना संशयित व्यक्ती तसेच इतर सहव्याधी असलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात आला होता. परभणी जिल्ह्यातही दोन टप्प्यात सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात पहिल्या टप्प्यात १६ लाख ४९ हजार १५० तर दुसऱ्या १६ लाख ७३ हजार ३२६ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात पहिल्या टप्प्यात ८ हजार ९६६ व्यक्तींना तर दुसऱ्या टप्प्यात २ हजार ८७० व्यक्तींना सहव्याधी असल्याचे स्पष्ट झाले होते. सहव्याधी आढळलेल्या व्यक्तींना आरोग्य संस्थांमध्ये उपचार घेण्यासाठी आरोग्य विभागाने आरोग्य संख्यांमध्ये दाखल होण्यास सुचविले होते.

कोविडचे १९२ तर सारीचे १६८५ रुग्ण

आरोग्य विभागाच्या वतीने दोन टप्प्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात कोविडचे एकूण १९२ रुग्ण आढळले. तसेच सारीचे पहिल्या टप्प्यात ९७४ तर दुसऱ्या टप्प्यात ७११ असे एकूण १६८५ रुग्ण आढळून आले. या रुग्णांना उपचारसाठी तातडीने रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. कोविड व सारी व्यतिरिक्त जिल्ह्यात इतर आजारांचे पहिल्या टप्प्यात ३ हजार ५०९ तर दुसऱ्या टप्प्यात ७२४ रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

पुढे काय?

सहव्याधी आढळलेल्या जिल्ह्यातील एकूण ११ हजार ८३६ व्यक्तींना आरोग्य विभागाच्या वतीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याचे सूचित करण्यात आले. तसेच रुग्णांना ई-संजीवनी या मोबाईल ॲपच्या माध्यमातून घरबसल्या उपचाराच्या अनुषंगाने दररोज तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले. या ॲपच्या माध्यमातून आजही शेकडो रुग्ण मार्गदर्शन घेत असल्याचे या विभागाने सांगितले.

परभणीत जास्त

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत केलेल्या सर्वेक्षणात इतर शहरांच्या तुलनेत परभणी शहरात सर्वाधिक रुग्ण सहव्याधी असलेले आढळून आले. त्यात पहिल्या टप्प्यात शहरात ७५४ तर दुसऱ्या टप्प्यात ३०५ रुग्ण आढळले आहेत.

‘परभणी जिल्ह्यात शहर व ग्रामीण भागात आरोग्य विभागाच्या वतीने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात आली. या माध्यमातून कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींना तसेच सारीचे रुग्ण आढळलेल्या व्यक्तींना तातडीने आरोग्य संस्थेत उपचारासाठी दाखल करण्यात आले. शिवाय त्यांना स्थानिक आरोग्य विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात आले. त्यांची योग्य ती काळजी घेण्यात आली.

-डॉ. शंकर देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी