शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

पायजे कशाला हा फालतूचा पैका?

By admin | Updated: February 25, 2016 21:32 IST

हुंडा घेतला नाही किंवा घेणार नाही असं स्वत:च्या अनुभवातून सांगणारी काही पत्रं या गठ्ठ्यात मिळाली आणि तिही ग्रामीण भागातून आलेली!

 हुंडा घेतला नाहीकिंवा घेणार नाहीअसं स्वत:च्या अनुभवातून सांगणारीकाही पत्रं या गठ्ठ्यात मिळालीआणि तिही ग्रामीण भागातून आलेली!त्यातले काही नमुने..कशाला हवीखोटी प्रतिष्ठा??आम्ही तीन भाऊ. एकानेही लग्नात हुंडा घेतला नाही. वडिलांनी मागितला नाही. माझ्या सगळ्यात मोठ्या भावाच्या लग्नात पन्नासच्या आत वऱ्हाडीमंडळी नेली. आपल्या घरी पाहुण्यांना रिसेप्शन दिले. माझे लग्न साखरपुड्यातच आटोपले. माझी सासू मुलीच्या लग्नासाठी व हुंड्यासाठी शेती विकणार होती ती वाचली. माझ्या लहान भावाने आंतरजातीय आंतरप्रांतीय विवाह केला. ही सगळी लग्न साधेपणानं झाली. वरातीसाठी घोड्याचा वापर नाही. फटाके फोडणं, रस्त्यावर नाचगाणं नाही. अहेर घेणं-देणं नाही. वर-वधूचे कपडे आपापले घ्यावेत असं ठरलं. लग्नाच्या वेळी प्रतिष्ठित लोकांचे सत्कार ठेवले नाहीत. कारण येणारा प्रत्येकजण आमच्यासाठी प्रतिष्ठितच होता. मुलीच्या बापाकडून पैसे घेऊन त्यातच नवरदेवाचे अंडरपॅण्ट, बनियन, बूट, सॉक्सपासूनचे कपडे घेणं, घोड्यावर बसणं, वरातीच्या गाड्या आणणं, फटाके फोडणं, यात मला तरी काही भूषण वाटत नाही. आणि माझे वडीलही या मताचे आहेत, ते अत्यंत सुधारणावादी व पुरोगामी आहेत.- राजू छगन शिराळे,बुलडाणातो त्रास इतरांना कशाला?मी एकुलता. एक माझे वय २५ वर्षं आहे. माझे लग्न झालेले नाही. पण घरात लग्नाचा विषय निघाला की मी म्हणतो हुंडा घेणार नाही. तेव्हा माझे आई-वडील खूप चिडतात. कारण मला चार बहिणी आहेत. त्यापैकी तीन बहिणींची लग्न झालेली आहे आणि एकीचे बाकी आहे. त्या तिघींचे लग्न झाले तेव्हा पहिलीला ५१ हजार रुपये, दुसरीला ३ लाख रुपये, तिसरीला २ लाख ५१ हजार रुपये इतका हुंडा दिलेला आहे. आणि चौथ्या बहिणीच्या लग्नात ३-४ लाख रुपये हुंडा द्यावा लागेलच.आणि मग तू का घेणार नाहीस हुंडा, असा माझ्या आई-वडिलांचा मला प्रश्न. पण तरीपण माझे मन म्हणते की जो त्रास आपण भोगला तो इतरांना नको. मी हुंडा घेणार नाही आणि लग्न पण सामूहिक विवाहसोहळ्यातच करीन. बघू कसं जमतंय.- गणेश, बीडताई, जिजूआणि त्यांचा संसारताईला बघण्यासाठी जिजू आले. १०-१५ नातेवाइकांसोबतच. पाहण्याचा कार्यक्रम होता, मात्र त्यांनी लगेच, तेव्हाच लग्न करून ताईला नेले. दहेज-हुंडा, दाग-दागिने म्हणून त्यांनी काहीच मागितलं नाही. ताईसाठी आधीपासूनच घरात घेऊन ठेवलेल्या वस्तूही त्यांनी नेल्या नाहीत. लग्नानंतर त्यांनीच गावपंगत दिली. ताई बीएड आहे. जिजूंनीच तिला नोकरीला लावले. आज ती शिक्षिका आहे. जिजू स्वत: वकील आहेत. इतक्या घाई-गडबडीत झालेलं लग्न पाहून समाजात, नातेवाइकांत कुजबुज सुरू झाली. सुरुवातीला आम्हाला आणि त्यांनाही लोकांचे टोमणे ऐकावे लागले पण आज ताईच्या लग्नाला साडेपाच वर्षे होऊन गेली. तिच्या सासूबाई कधी म्हणाल्या नाही, की माहेरून अमुक-तमुक वस्तू आणं. पैसे आण. तिचा संसार सुखानं सुरू आहे.सांगण्याचा अर्थ एवढाच की, समाजात अशा ही व्यक्ती आहेत ज्या स्त्रियांचा इतका आदर करतात. ते अपवाद समाजासमोर यायला हवेत. एखाद्या मुलाने हुंडा न घेण्याचा निर्णय घेतला तर त्याला दूषणे न देता सपोर्ट करायला हवा. नुसताच हुंडाबंदीचा कायदा कागदावर न राहता तो अमलात आणला गेला पाहिजे.- तसलिम,औरंगाबाद...अरे आज्या,कशाले, फालतूचं?माझ्या लग्नाचा बस्ता बांधायचा होता. तालुक्याच्या ठिकाणी कापड दुकानातून खरेदी करण्यासाठी आमचे चुलते, मामे, शेजारी-पाजारी मिळून २०-२२ लोकं ही लग्नाच्या बस्त्याची खरेदी करायला दोन काळी-पिवळी गाडीनं तालुक्याला आली होती. ५-६ जण एसटीने आले. अमुक-अमुक दुकानात कपडे खरेदी करायचे ठरले. आम्ही तेथे १०-१५ लोकं अगोदर पोहचलो. मी दुकानात उभा राहून म्हणालो, तो पॅण्ट पीस, तो शर्ट पीस आणि पुन्हा एक पांढरा पॅण्ट पीस आणि पांढरा शर्ट पीस, अमुक-अमुक कंपनीचे दोन बनियन, त्या गठ्ठ्यातल्या दोन साड्या, टावेल टोपी बस् एवढे द्या. लगेच बील विचारले त्याने ११०० रु. मुलाचे आणि मुलीचे कपडे मिळून झाले असं सांगितलं. मी लगेच खिशातून तेवढे पैसे काढले अन् दुकानदाराच्या हाती दिले आणि म्हणालो, बांधा तो सर्व बस्ता... अन् द्या इकडं! कपडे घेतले व पायात चप्पल घातली बाहेर निघालो. माझ्यासोबतची माणसं आवाक्क झाली. त्यातली बरीचशी कुजबुज करत होती की, ‘तुलाच तुझ्या हाताने कपडे घ्यायचे होते तर आम्ही एवढे लोक येऊन इथं काय फायदा?’ म्हटलं फायद्या-तोट्याचं गणित नाही. कपडे घेतले आता चला. बाजारातून गावात एक तासातच परत आल्यामुळे शेजारी-पाजारी विचारू लागले.‘‘काय सोयरीक फिसकटली की काय...?’’म्हटलं, अरे, कपडे घेण्यासाठी २५-३० माणसं कशाला पाहिजेत? विनाकारण टाइमपास करायचा. बडे-बुढे म्हणत, ‘‘अरे एकतर हुंडा घेतला नाही बराबर. सगळ्याचीच बचत करतोसकी काय? एकदाच तर लग्न होते आयुष्यात...’’मी म्हणालो, आज्या, कपडे जन्माला पुरत नसतात अन् हुंडाही काही पुरायचा नाही. मग कशाले फालतूचं...?साध्या-सुध्या प्रकारे लग्न झालं. काही दिवसांनी मी ‘स्क्रीन प्रिंटींग’ करू लागलो. पत्रिका छापायला येणाऱ्या माणसासोबत किती हुंडा घेतला? काय करते मुलगी? किती शिकली? अशा चर्चा व्हायच्या त्यावेळेस मी त्यांना हुंडा न घेता लग्न करा, असं सांगत रहायचो.आता तर मला वाटतं, ‘जो मागेल हुंडा, तो एक नंबरचा गुंडा’ असा फलक घेऊन नवरदेवाच्या वरातीत घुसलं पाहिजेत! फरक पडेलच हळूहळू का होईना..- प्रा. बंदू वानखेडे मुंगळा, जि. वाशिम