शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आता आम्ही कायतरी करणारच असं म्हणता? मग म्हटलं ह्ये सांगून जावं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 15:48 IST

सामान्य नागरिकांत जसे चांगले-वाईट लोक असतात, तसेच शासनात असतात. सगळेच भ्रष्ट आहेत, जो-तो खायच्या मागे असतो, असली सरसकट विधाने करू नयेत. कारण ‘सगळंच वाईट’ असं कधीच नसतं!

- मिलिंद थत्ते

 जिंदगी वसूल सदर लिहिता लिहिता अनेक ई-मेल्स आल्या. वाचून उत्साह आला. आता आम्ही कायतरी करणारच - असं काहीजण म्हणाले, तर काहींनी लिहिले - आम्ही सुरुवात केलीय, पण कधीमधी अडखळतोय. माहिती अधिकाराबाबत प्रश्न आले, ग्रामपंचायतीबाबतच्या तक्रारी आल्या - असे विषय चर्चेत आले. एक अधूनमधून डोकावणारा प्रश्न होता - हे सगळं कुटं शिकाया भेटतं? आज या सदराचा शेवट करताना म्हटलं ह्ये सांगून जावं.. हे सगळं शिकवणारा एकच शिक्षक आहे. ‘अनुभव’ त्याचं नाव. हा विचित्न शिक्षक आहे. आधी परीक्षा घेतो आणि मग शिकवतो. आम्ही जेव्हा वयम् या चळवळीची सुरुवात केली, तेव्हा आम्हालाही यातलं काही कळत नव्हतं. लोकशाही नेमकी चालते कशी? आणि  आपण साध्यासुध्या लोकांनी कुठलीही सत्ता हातात नसताना ही लोकशाही चालवायची कशी? हे आम्हालाही सुधरत नव्हतं; पण प्रयोग करत करत चुकत-माकत आम्ही शिकलो. काय शिकलो?* हेच की, आपल्याला बोचणारा, भेडसावणारा एक छोटासा प्रश्न घ्यायचा, अन्  तो सोडवण्यासाठी मिळेल त्या कायदेशीर मार्गाने झगडत राहायचं. जो प्रश्न किंवा जी समस्या आपल्याला अस्वस्थ करत नाही, त्यावर आपण लढू शकत नाही. * हेच की - प्रत्येकालाच अभिमान / अहंकार असतो. आपल्याला आहे तसा समोरच्यालाही आहे. म्हणून सरकारी कर्मचारी / अधिकारी यांच्याशी बोलताना राग आला तरी त्यांचा वैयक्तिक अपमान करायचा नाही. आपण सभ्य आहोत, सभ्यपणे शांतपणे बोलायचं. आपला मुद्दा, आपले हक्क सोडायचे नाहीत; पण भाषा सभ्यतेचीच हवी.* हेच की - वैयक्तिक लाभासाठी भांडण्यात सामथ्र्य नसतं. गावाच्या फायद्यासाठी, अनेकांच्या लाभासाठी लढण्यात ताकद असते. एकत्न येण्याची सवय लागणं हा लोकशाही लढय़ाचा पहिला फायदा आहे.* हेच की - जसे आपण तसेच शासन! सामान्य नागरिकांत जसे चांगले-वाईट लोक असतात, तसेच शासनात असतात. सगळेच भ्रष्ट आहेत, जो तो खायच्या मागे असतो,  - असली सरसकट विधाने करू नयेत. कारण ‘सगळंच वाईट’ असं कधीच नसतं!* वयम् चळवळीत किती जातीतले युवक-युवती सहभागी आहेत सांगता येणार नाही, कारण ते आम्ही कधीच पाहिलेलं नाही. अनेकांची आडनावं माहीत नसतात आम्हाला, कारण त्याच्याशी घेणंदेणंच नाही आपल्याला! भारतीय नागरिक म्हणूनच आम्ही एकमेकांची साथ देतो. आम्ही कायदा शिकण्यासाठी प्रशिक्षण शिबिर घेतो. त्यातच नागरिकत्व म्हणजे काय, ‘शिका-संघटित व्हा-संघर्ष करा’ म्हणजे नेमकं काय, गाव हा स्वराज्याचा पाया कसा? हेही सारे शिकतो आणि प्रत्यक्षातही आणतो. पालघर जिल्ह्यातील जव्हार-मोखाडा व नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक तालुक्यातील दोनशेहून अधिक गावांत वयम् चळवळीचे युवक गट कार्यरत आहेत. रोजगार हमी कायदा वापरून 13000 मजुरांना त्यांच्याच गावातल्या युवकांनी काम मिळवून दिले. स्थलांतर थांबवले. 500 छोटय़ा शेतकर्‍यांना पाण्याची सोय करून दिली. 1600हून अधिक आदिवासी शेतकर्‍यांना वनहक्क मिळवून दिले. 47 गावांच्या ग्रामसभांनी आपापला निधी मिळवला व अडलेली शासकीय कामे मार्गी लावून दाखवली. 12 गावांत सामूहिक निर्णय आणि श्रमदानाची रीत पडली. शासन आणि नागरिक यांच्यात समानतेचं नातं रूळतं आहे.असं घडू शकतं आणि हे घडवण्याची ताकद आपल्यासारख्या सामान्य माणसात असतेच हा वयम् चळवळीचा विश्वास आहे.