शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
2
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
3
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
4
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
5
बीड महामार्ग भूसंपादन घोटाळा: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलिसांच्या ताब्यात
6
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
7
मार्कशीटमधील खाडाखोड कळली अन् बापाची सटकली; ९ वर्षांच्या मुलीला क्रूरपणे संपवलं, नंबर १ चा होता अट्टहास
8
रंगांचा खेळ! रेड, ग्रीन तर माहितीय पण फूड पॅकेजिंगवरील ब्लू, येलो मार्कचा नेमका अर्थ काय?
9
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
10
तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही...
11
थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले...
12
मरण्यापूर्वी एपस्टीनने काय लिहून ठेवलं? कुणाचा उल्लेख, ७ वर्षांनी समोर आलं पत्र
13
Firoza Khatun : जेलमध्ये जुळलं सूत! प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; जेलर फिरोजा खातूनने केलं कैद्यासोबत लग्न
14
राज्यपालांना दोनदा भेटले तरीही विजय यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण नाही, राज्यघटनेत काय म्हटलंय?
15
Sangeetha Sornalingam: तृषा कृष्णनपेक्षा श्रीमंत आहे थलपति विजयची पत्नी संगीता, अभिनेत्रीपेक्षा ५ पट प्रॉपर्टी
16
Vastu Tips: घरात कामधेनूची मूर्ती म्हणजे लक्ष्मीचा वास; तुमच्याकडे आहे का? फॉलो करा  'या' वास्तु टिप्स
17
Anudan Scheme: म्हैस, गाय, शेळी, मेंढी, कोंबड्या पाळा; सरकारकडून ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान मिळवा, योजना कोणती?
18
थलापती विजयने आपल्या आमदारांना ज्या हॉटेलमध्ये ठेवले, त्याचे एका दिवसाचे भाडे किती? जाणून घ्या...
19
आम्ही कोणीच नाही का! मोजकेच पापाराझी आलेले पाहून नीतू कपूर शॉक; नक्की काय झालं?
20
बारामतीत जय पवार यांनी भरवला जनता दरबार, नागरिकांची गर्दी, समस्या सोडवण्यावर दिला भर
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर ते मुंबई व्हाया बिंधास उद्योग

By admin | Updated: July 3, 2014 18:30 IST

वक्तृत्व स्पर्धा गाजवल्या, वादविवादाचे स्टेज हादरवलं, कॉलेज रिपोर्टर म्हणून काम केलं कॉलेजातलं इलेक्शन लढवलं,एनएसएसचे कॅम्प जागवले, शासकीय शाळांत शिकवलं आणि सायकल दामटत सगळं शहरं पिंजून काढलं.म्हणून तर कळलं जग नेमकं कसं चालतं-बोलतं ते.

- कॉलेजातल्या ‘उद्योगांनी’ काय शिकवलं?
 
सोलापूर सोडून आता जवळपास आठ वर्षं होत आली..विचार केला की  वाटतं, बापरे आठ वर्षं! पण इलेक्ट्रॉनिक मीडियासारख्या धावपळीच्या क्षेत्नात असल्यानं वेळ पटापट कसा गेला ते कळलंही नाही. अधूनमधून सोलापूरला जाणं होतं तेव्हा सात रस्त्याच्या चौकातली ती ऐसपैस दगडी इमारत पाहिली की एकदम बरं वाटतं, सोबत कुणी असलं की, मी त्या व्यक्तीलाही आवर्जून सांगते, हे माझं कॉलेज, इथं शिकले मी (मग भले त्या माणसाला इंटरेस्ट असो की नसो!)
कॉलेजची पाच वर्षं आठवतात तसे त्या पाच वर्षांत केलेले ‘उद्योग’ही आठवतात. वक्तृत्व स्पर्धांपासून ते निवडणूक लढवण्यापर्यंत आणि युथ फेस्टिव्हलच्या धिंगाण्यापासून ते सिनिअर्सना न बोलता दिलेल्या खुन्नसपर्यंत! पहिली दोन वर्षं तर कॉलेज काय असतं हेच जाणून घेण्यात गेली. पण याच तीन वर्षांत खर्‍या अर्थानं मला राज्यशास्त्न आणि समाजशास्त्नाची गोडी लागली. लोकशाही व्यवस्थेचं महत्त्व कळलं, आंबेडकरांचं मोठेपण कळायला लागण्याची सुरु वातही याच वर्षांमध्ये झाली. याचदरम्यान मी तेव्हाच्या  युवा सकाळ  साठी रिपोर्टिंंग सुरू केलं. सगळ्य़ांना बोलतं करणं थोडं- थोडं जमायला लागलं, लिहिण्याचा सराव सुरू झाला.
पण आम्ही खर्‍या अर्थानं मजा केली ती सिनिअर कॉलेजच्या तीन वर्षांत! त्याच वर्षात मस्त ग्रुप जमला, एकत्न फिरणं आणि कॉलेजला वाहून घेणं सुरू झालं. त्यातला सगळ्य़ात महत्त्वाचा टप्पा म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस). माझ्या मते  ग्रामीण भाग काय असतो, तळागाळाच्या समस्या काय असतात हे समजून घ्यायचं असेल तर शहरी मुलांसाठी यापेक्षा दुसरा कुठलाच चांगला उपक्र म नसावा. आम्ही खर्‍या अर्थानं एनएसएस गाजवलं. गावभर हिंडून प्रभातफेर्‍या काढणं, न लाजता बेंबीच्या देठापासून ओरडत घोषणा देणं, श्रमदानात गाणी म्हणत म्हणत मातीची घमेली उचलणं, रस्ते झाडणं, असे सगळे उद्योग अगदी मनापासून केले. त्याचा परिणाम म्हणून एनएसएसचं नेतृत्व माझ्याकडे आलं. एनएसएसच्या दोन वर्षांंनी खूप समृद्ध केलं. दरवर्षी आमचा आडगावात १0 दिवसांचा कॅम्प असायचा. तिथंही जनजागृतीसाठी प्रभातफेर्‍या, पथनाट्य करणं, गाणी, श्रमदान आणि एकत्न स्वयंपाक असं सगळं चालू असायचं. १0 दिवस तिथंच राहून गावगाडा बघता यायचा, लोकांच्या अंधश्रद्धा, गरिबी काय असते हे दिसलं, मुलगाच हवा हा हट्ट किती टोकाचा असतो हे लक्षात यायला लागलं. अजूनही दलितांची वस्ती वेगळीच असते हेही जाणवलं. पण त्याचबरोबर त्या गरीब माणसांचा पाहुणचार, आदरातिथ्य हे सारं अनुभवूनही भारावून जायलाही झालं. या गावामध्ये मला गाडगेबाबांना मानणारे, दररोज फुकटात गाव झाडून देणारे हरितात्या भेटले, शिकणार्‍या पोरी म्हणून कौतुकानं जास्त साखरेचा चहा देणार्‍या खूप मावश्या भेटल्या..
त्या कॅम्पमधली सकाळ खूप सुंदर असायची. पहाटे उठायचं, चांदण्यांनी लगडलेलं आभाळ, थंडगार वारा, सर्वधर्मीय प्रार्थना आणि व्यायाम. तेव्हाच्या आदर्श रोमॅण्टिसिझमची ती शेवटची प्रार्थना 
साथ में खाए, साथ में सोए
साथ करे हम अच्छे काम 
जब तक सबका भला न होगा 
नही करेंगे हम आराम 
नंतर माझी एनएसएसच्या राष्ट्रीय एकात्मता शिबिरासाठीही निवड झाली. त्या १0 दिवसांत आम्ही दिल्लीत महाराष्ट्राचं नेतृत्व केलं. या शिबिरात भारताच्या वेगवेगळ्य़ा राज्यातून मुलं आली होती. या सगळ्य़ांशी इतकी चांगली मैत्री झालीये की, आज १0 वर्षांंनंतरही त्यातले आम्ही काही जण व्हॉट्स अँपच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आहोत.
याच दरम्यान मी न्यूजपेपर इन एज्युकेशन या उपक्रमातही काम करत होते. आठवड्यातून एक तास शहरातल्या गरीब भागातल्या शाळांमध्ये शिकवायचं असा तो उपक्रम. त्यात व्यक्तिमत्त्व विकास, इंग्रजी आणि गणिताची भीती घालवणं, ओरिगामी, नागरिक म्हणून असलेले हक्क अधिकार, स्त्नी-पुरुष समानता असे अनेक विषय असायचे. यातून ६0 मुलांनी भरलेल्या वर्गाला नियंत्नणात ठेवणं म्हणजे काही खायचं काम नसतं हे कळलं, पण नंतर जमायला लागलं. पोरं अगदी आतुरतेनं त्या तासाची वाट बघायचे, कॉलेज संपवून सायकल मारत मी दूरच्या भागातील त्या शाळेत शिकवायला जायचे. मुलांशी मस्त गट्टी झाली होती.
त्याशिवाय दुसरीकडे मी आणि माझी मैत्नीण प्रियांका बडवे एकही वक्तृत्व, निबंध आणि वादविवाद स्पर्धा सोडायचो नाहीत. किंबहुना आम्ही स्पर्धेत असलो की बाकीच्यांना खात्नी असायची आपलं किमान एक बक्षीस हुकलं. स्पर्धेची तयारीही जोरदार व्हायची. वाचन, नोट्स काढणं, प्राध्यापकांना पिडणं. आमचे ऋतुराज बुवा सर आणि गीतांजली जोशी मॅडम मात्न न कंटाळता मार्गदर्शन करायच्या. आमची इतकी गट्टी जमली की जोशीमॅडमच्या तर आम्ही कुटुंबातलेच बनून गेलो. कॉलेजच्या शेवटच्या वर्षी विद्यापीठ प्रतिनिधी पदाची निवडणूक लढवण्याची खुमखुमी आली. झालं असं की युथ फेस्टिव्हलमध्ये बाकीचे युआर पैसे खातात किंवा नको तितका पैसा उधळला जातो, अशी मला शंका यायची. मग सिस्टीम बदलनी है, तो आओ, खुद उतरो और सिस्टीम बदलो वगैरे डोक्यात होतं. मग झालं, लढवली निवडणूक- प्रचार, सगळ्य़ांना भेटणं, मत देण्याची विनंती करणं वगैरे दोस्त लोकांच्या मदतीनं पार पाडलं. आणि मग निवडणूक जिंकली, मग ती इडली-डोसा आणि कॉफीची पार्टी, युथ फेस्टिव्हल ची रात्नी ९-१0 वाजेपर्यंंत कॉलेजात थांबून तयारी असं सगळं शिस्तीत पार पाडलं. भरपूर बक्षिसं जिंकून आणली, ठरवल्याप्रमाणे प्रत्येक रुपया  प्रामाणिकपणे वापरला. तेव्हा यु आर म्हणून विद्यापीठाकडून मिळालेला ब्लेझर अजून माझ्या घरच्या कपाटात आहे आणि तो पाहिला की सगळं आठवतं.
त्यानंतर पुण्यात पत्नकारितेसाठी दाखल झाले. शिकायचं तर रानडेलाच असं पूर्वीच ठरवलेलं. किंवा या सगळ्य़ाचा एकत्रित परिणाम म्हणून मी पत्नकारितेत आले म्हणा किंवा पत्नकारितेत यायचा निर्णय घेतल्यानं या सगळ्य़ा अनुभवाचा खूप उपयोग झाला असं म्हणा. मुळात या सगळ्य़ा गोष्टींची आवड असणं हीच पत्नकारितेची मुख्य अट असते. त्यात वाचनामुळे पाया पक्का झालेला, हात लिहिता होताच त्याचा फायदा झाला,  बोलण्याची, बोलतं करण्याची कला अवगत झाल्यानं पत्रकारितेच्या क्षेत्रात पाय रोवणं सोपं झालं. प्रत्येक कामातून, प्रत्येक नोकरीतून शिकत राहायचं हे ठरवलेलं असल्यानं कामात आजही मजा येतेय. पण हे मजेत सगळ्या अनुभवांना भिडणं शिकवलं ते कॉलेजच्या काळातल्या ‘उद्योगां’नीच.!
 
- स्नेहल बनसोडे (अभ्यासू पत्रकार असलेली स्नेहल,‘आयबीएन लोकमत’ वृत्तवाहिनीमध्ये  असिस्टण्ट एडिटर आहे.)