शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

संवेदना ते सृजनशीलता

By admin | Updated: January 7, 2016 22:14 IST

नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन आयोजित डॉ. एपीजे अब्दुल कलाम ‘इग्नाइट’ इनोव्हेशन स्पर्धेच्या पुरस्कार प्रदान सोहळ्यानिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी तरुण मुलांना संबोधित केले.

-  प्रणव मुखर्जी, माननीय राष्ट्रपती

तरुण पिढीला आता न सुटणा:या, 

जटिल वाटणा:या समस्यांसोबत 
जगायचं नाही. 
त्यांना आपले प्रश्न सोडवायचे आहेत, 
तोडगे हवे आहेत आणि
त्यासाठी ते स्वत: उत्तरं शोधत 
नवनिर्मितीची वाट चालत आहेत.
 
नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन आयोजित डॉ. एपीजे अब्दुल कलाम ‘इग्नाइट’ इनोव्हेशन स्पर्धेच्या पुरस्कार प्रदान सोहळ्यानिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी तरुण मुलांना संबोधित केले. त्या भाषणाचा हा संपादित अनुवाद
 
इनोव्हेशन.
नवनिर्मिती ही आर्थिक विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी एक किल्ली आहे. आपल्या समाजात, राष्ट्रात निर्माण होणा:या गरजांना, आव्हानांना आपण कसा प्रतिसाद देतो, त्यावर काय तोडगे काढतो यावर राष्ट्र म्हणून आपली परिपक्वता दिसते. 
नवनिर्मिती ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. प्रत्येक पावलावर, प्रत्येक पायरीवर तिचं भरणपोषण व्हायला हवं. आणि त्या प्रक्रियेला पाठबळही मिळायला हवं. ही गरज लक्षात घेऊनच राष्ट्रपती भवनात मार्च 2015 मध्ये नॅशनल इनोव्हेश फाउंडेशनच्या सहकार्यानं नवनिर्मिती महोत्सव भरवण्यात आला होता. भारतातल्या सुदूर भागात राहणा:या, खेडय़ापाडय़ातल्या, वयानं लहान असणा:या पण नवोन्मेषशाली मनाच्या कल्पक मुलांनी त्यात सहभाग घेतला. यावर्षीही मार्चमधे असा महोत्सव आयोजित करण्याचा आमचा मानस आहे. 
कल्पक विचार करणा:या, भन्नाट काहीतरी घडवण्याचा प्रयत्न करणा:या मुलांनी जरूर या महोत्सवात सहभागी व्हावं!
यापुढच्या काळात आपल्या समाजासाठी ‘इनोव्हेशन’ अर्थात नवनिर्मिती हे अत्यंत महत्त्वाचे सूत्र ठरणार आहे. उच्च शिक्षण आणि उद्योगसंस्था यांचं एक उत्तम नेटवर्क तयार होऊन समाजात वेगळे प्रयोग करणा:या कृतिशील कल्पक मुलांना संधीही मिळायला हवी. तळागाळात, खेडय़ापाडय़ात जी मुलं अनेक प्रयोग करतात, आपल्या गरजांपोटी काही उपकरणं, अवजारं बनवतात, वेगळा विचार करत समस्येवर तोडगा काढतात त्या शिक्षण घेणा:या मुलांना उद्योगांनी स्वत:शी जोडून घ्यायला हवं. त्या कल्पक इनोव्हेशनचा उपयोग मोठय़ा प्रमाणात, व्यावसायिक तत्त्वावर कसा करता येईल याचाही उद्योगांनी विचार करायला हवा. देशातल्या 114 मध्यवर्ती संस्थांना मी असं सांगितलं आहे की, शिक्षण आणि उद्योग अंतरसंबंध प्रस्थापित व्हावेत. त्यातून अनेक नवनिर्मितीचे प्रयोग, अनेक उपक्रम थेट बाजारपेठेशी जोडले जाऊ शकतील. 
नवर्निमिती करू पाहणा:या तरुण हातांची आज देशात कमतरता नाही. नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनकडे ‘इग्नाइट-2015’ या स्पर्धेसाठी देशभरातून 28 हजार अर्ज आल्याचं मला कळलं. भारतरत्न आणि माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना या सृजनशील मुलांनी ख:या अर्थानं विज्ञाननिष्ठ आदरांजलीच वाहिली असं म्हणायला हवं. डॉ. कलामांनी नेहमी लहान मुलांची मनं प्रज्वलित केली, त्यांना प्रेरणा दिली. आज त्याच वाटेवर चालण्यासाठी ही मुलं तयार होत आहेत. 
या सगळ्या इनोव्हेशन्सचं प्रदर्शन पाहताना माङया लक्षात आलं की, अनेक प्रयोग, इनोव्हेशन हे आपल्या विकसनशील समाजाच्या गरजांवर शोधलेले तोडगे आहेत. समाजातील म्हातारी माणसं, लहान मुलं, अपंग या घटकांच्या समस्या कमी व्हाव्यात म्हणून किती बारकाईनं विचार करून या मुलांनी आपले प्रयोग सुचवले आहेत. या मुलांनी आणखी एक गोष्ट सिद्ध केली आहे, ती म्हणजे नवनिर्मितीची ही आस, ही ऊर्मी सर्व प्रकारचे भेदाभेद नष्ट करते आणि अमर्याद उत्साही शक्यता आणि उमेद यांसह नवीन क्षितिजं शोधू लागते. 
या सा:या प्रयोगांकडे पाहून आपल्या देशाच्या भवितव्याविषयी आणि तरुण पिढीविषयी मला अत्यंत आशादायी वाटतं आहे.
आणि त्यातही सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट जाणवते आहे ती म्हणजे तरुण पिढीला आता न सुटणा:या, जटिल वाटणा:या समस्यांसोबत जगायचं नाही. त्यांना ते प्रश्न सोडवायचे आहेत, तोडगे हवे आहेत आणि त्यासाठी ते स्वत: उत्तरंही शोधत आहेत.
या सा:या नवनिर्मितीच्या प्रयोगांमध्ये एक गोष्ट फार महत्त्वाची दिसते आहे. या मुलांनी जे प्रयोग केले आहेत, जे तोडगे सुचवले आहेत त्यात समाजासाठीची सहवेदना, संवेदना दिसते आहे. हे सगळे तरुण क्रिएटिव्ह मुलं ‘संवेदना ते सृजनशीलता’ या एका सूत्रनं जोडले गेले आहेत, त्यांचे सारे प्रयोग त्याच भावनेतून आकार घेत आहेत.  
भारत हा 120 कोटी सृजनशील मनांचा देश आहे. या कोटय़वधी सृजनशील मनांतून उठणा:या ऊर्मीचा जर विधायक कामांसाठी उपयोग झाला तर भारतीय समाजाचे अनेक प्रश्न, अनेक समस्या सुटतील. आज ज्या समस्या आपल्याला भेडसावत आहेत त्या समस्या उद्या कदाचित या सृजनशील वाटेवर सुटलेल्याही असतील.
पण त्यासाठी या देशात राहणा:या आपल्या प्रत्येकाला एक गोष्ट करावी लागेल. 
स्वत:ला निष्ठेने या देशाप्रती समर्पित करत देशाचे, समाजाचे प्रश्न सुटावेत म्हणून काम करावं लागेल. प्रश्नांसोबत जगणार नाही, तर सर्वासाठी त्या प्रश्नाचं उत्तर शोधीन असं म्हणून नवनिर्मितीची विधायक वाट निष्ठेने चालावी लागेल!
तरुण प्रज्वलित मनं आपल्या देशासाठी, उज्‍जवल भविष्यासाठी आणि समाजाच्या सर्वसमावेशक विकासासाठी ही वाट नक्की चालतील याची मला खात्री आहे!
जय हिंद!!
 
 
 
‘‘सर्वसमावेशक विकास ही फक्त एक घोषणा असू नये. आपल्या शाश्वत विकासाच्या प्रवासात सगळ्यांचा सहभाग आणि त्यातून होणारी सगळ्यांची भरभराट ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.’’
 
‘‘आपल्याकडच्या नावाजलेल्या उच्चशिक्षण संस्थांनी तळागाळातल्या अत्यंत छोटय़ा पण वेगळ्या, नवनिर्मिती करणा:या कल्पनांना व्यासपीठ देत त्यांचं भरणपोषण करत मार्गदर्शन करायला हवं; तर नव्या कल्पना, विचार आणि कृती यांना प्रोत्साहन आणि पाठबळही मिळेल!’’
 
‘‘नॉलेज आणि इनोव्हेशन. राष्ट्राच्या उन्नतीसाठी आवश्यक असे हे दोन स्तंभ आहेत. त्यांच्या भोवतीनं जर मेहनतीनं काम केलं तर 21व्या शतकात राष्ट्र समृद्धी आणि विकास यांची कास धरू शकेल!’’
 
‘‘ज्ञान आणि सृजनशीलता, नावीन्याची ओढ आणि आस, त्यासाठीची व्यवस्था हे सारं जर आपल्या तरुण मुलांना मिळालं तर त्यांचं भवितव्य झळाळून निघेल आणि वेगानं जागतिकीकरण होणा:या जगात या तरुण मुलांना आघाडी घेता येईल असं वातावरण आपण तयार करू शकू.’’
 
‘‘विज्ञान आणि शिक्षण, संशोधन आणि नवनिर्मिती या चार गोष्टींभोवती विकास आणि कार्यसंस्कृती यांची वीण पक्की होती. राष्ट्राच्या विकासासाठीही या चार गोष्टी महत्त्वाच्या आहेत.’’