शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
4
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
5
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
6
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
7
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
8
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
9
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
10
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
11
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
12
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
13
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
14
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
15
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
16
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
17
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
18
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
19
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
20
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमच संपवणारे हे कोणते व्हायरस?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 18:00 IST

प्रेम आपल्या समाजात आजही गुन्हाच आहे. प्रेमाच्या नावावर गळे चिरले जातातच; मात्र त्यापलीकडे प्रेमाचे वैरी आपणच पोसतोय, त्यांचं काय?

ठळक मुद्देअ‍ॅन्टिव्हायरस सापडेल तेव्हा सापडेल; पण हे सारं काय आपण ओढावून घेतो आहोत, याचा विचार या आगामी प्रेम दिनानिमित्त करायला हवा. 1) बिझी, यू नो!

- अंकुश जोशी

व्हॅलेन्टाइन्स वीक सुरू झाला.बाजारपेठा सजतील, लालचुटुक फुगे, हॉटेल्स, माध्यमातल्या बातम्या हे सारं सुरू होईल.हे सारं आपल्या समाजात खरं आहे की नाही? तर आहे. प्यार किया तो डरना क्या म्हणणारं तारुण्य आहे की नाही, तर आहे.मात्र, प्यार के दुश्मन हजार हे आजही खरंच आहे. वाचतोच आपण बातम्या. प्रेमाची शिक्षा म्हणून भररस्त्यात आजही गळा कापला जातो. त्याच्या बातम्या वाचून, व्हायरल व्हिडीओ पाहून भीती वाटतेच. आजही खेडय़ापाडय़ातच कशाला, शहरातही जातीपाती, खानदान की इज्जत, घरच्यांना फसवलं, पैसाअडका, लोक काय म्हणतील, रंगरूप हे सारे प्रेमात आडवं येतं. ते सारं एका टप्प्यावर इतकं महत्त्वाचं ठरतं की त्यापायी एकमेकांचे जीव घ्यायला लोक कमी करत नाहीत. आणि आपल्यामुळे नको घरच्यांना त्रास म्हणून यश चोप्रा फिल्म स्टाइल मुलंमुली स्वतर्‍च ठरवतात की आपण आपल्या प्रेमाचा त्याग करू, विसरुन जाऊ सारं पण हा जीवघेणा जाच नको. किती मुलंमुली आजही आपलं प्रेम विसरुन, सारं संपवून घरचे म्हणतात तिथं लग्न करून मोकळे होतात. भयंकर असलं तरी हे आजच्या समाजाचं वास्तव आहेच. मात्र हे सारे शत्रू कमीच होते म्हणून आधुनिक काळात आणखी काही शत्रू आता प्रेमाच्या जिवावर उठलेत. आणि त्यापायी प्रेमातल्या रोमान्सलाच नाही तर प्रेमालाच चूड लागतोय हे लक्षातही येत नाही. अनेकांना कुठून प्रेमात पडलो असं वाटावं इतका जीव नको करणारी भांडणं सतत होतात. कारण प्रेमाला छळणारे आणि त्यासाठी टपून बसलेले काही शत्रू आपल्याच पिढीनं जन्माला घातले आहेत. त्यांची जाणीव होते तोवर ब्रेकअप होऊन गेलेला असतो. ते आहेत नव्या लव्ह स्टोरीतले व्हायरसच.अ‍ॅन्टिव्हायरस सापडेल तेव्हा सापडेल; पण हे सारं काय आपण ओढावून घेतो आहोत, याचा विचार या आगामी प्रेम दिनानिमित्त करायला हवा.

1) बिझी, यू नो!प्रेमात पडतात. पण रोज भेटायला अनेकांना वेळ नाही. फोनवर बोललं की भांडणंच होतं. कारण प्रश्नांची सरबत्ती. त्यातून गैरसमज, भांडणं. ते काही संपत नाही.

2) पझेसिव्हत्यानं/ तिनं कुणा मित्र-मैत्रिणींशी बोलूच नये. फक्त आपली मालकी याच भावनेतून नात्याला बांधून घालणारे काच बसतात. त्यातून पझेसिव्हनेस भयंकर त्रास देतो.

3) सोशल मीडियासोशल मीडिया खरंच शत्रू होतो प्रेमाचा. सतत एकमेकांच्या टाइमलाइन पाहणं, संशय घेणं, सगळं शेअर करणं, इतरांशी जास्त बोलणं, कुणाला लाइक केलं, कुणाला नाही यावरुन वाद. त्यानं सगळंच बिघडतं.

4) अति बोलणंखाणंपिणं, बोलणं, काम हे सारं एकमेकांना डिटेल सांगत राहाणं आणि समोरच्याकडून तशी अपेक्षा धरणं हे इतकं वाढलंय की हे सतत शेअर करणंच समस्या बनलं आहे.

5) स्पेसची मागणीपूर्वीसारखं टिपिकल गुलाबी प्रेम आता नसतेच, सतत स्पेसची मागणी. त्यातून कोण कुणाची स्पेस घालवतं, कोण नाही यावरून प्रेमाचा पार चुराडा होतो.