शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

आयुष्याचा कण्ट्रोल कुणाच्या हाती?

By admin | Updated: April 12, 2017 16:13 IST

आपण सगळेच हे सतत करत असतो. लहानपणापासून ते अगदी मोठं होईपर्यंत. दुसऱ्याला दोष देणं.

- प्रज्ञा शिदोरे

आपण सगळेच हे सतत करत असतो. लहानपणापासून ते अगदी मोठं होईपर्यंत. दुसऱ्याला दोष देणं. परीक्षेत कमी मार्क पडले तर- काय शाळेत काही नीट शिकवत नाहीत हो. एखादी भाजी करपली तर- अगदी तेव्हाच फोन आला, त्यानं असं झालं. निवडणूक हरलो तर- ईव्हीएम मशीन्समध्ये घोळ असणार! असं काहीही. दुसऱ्याला दोष दिला, स्वत:ला सेफ झोनमध्ये ठेवत आपण वेळ मारून नेतो. मारून नेण्यातच आपल्याला धन्यता वाटते. मोठमोठे मानसशास्त्रज्ञ आणि मॅनेजमेंट गुरूही म्हणतात की, आपली जबाबदारी ढकलून देता ना आपण, तेव्हा आपण आपल्या आयुष्यातून, स्वत:च्या नजरेतून उतरायला लागतो. आपण मग कधीच सत्याला सामोरं जाऊ शकत नाही. असं झालं तर आपण आयुष्यात काही मिळवूही शकत नाही. बेंजामिन हार्डी याने यासंदर्भात सुंदर लेख लिहिला आहे. यात तो म्हणतो की, जगात चार सत्य आहेत. १. निर्णय घेता न येणं ही समस्या तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे. २. लोक सतत लटकलेल्या अवस्थेत असतात. त्यांना काय करायचं, आणि ते करण्यामागचा हेतू काय ते कळत नसतं. ३. कोणतीही मोठी गोष्ट घडण्याच्या अगदी आधी तुम्हाला सर्वात जास्त काळोख दिसेल. पुढे काही वाटच नाही असं वाटेल. ४. तुम्ही जेव्हा स्वत:च्या आयुष्याचे सारथी स्वत:च बनाल तेव्हा तुम्हाला तुमच्यातली खरी क्षमता बघायला मिळेल. बाकी अधिक समजून घेण्यासाठी वाचा-  "What happens when you take control of your life" 

 
https://medium.com/the-mission/what-happens-when-you-take-full-responsibility-of-your-life-b72999a03d4e
 
 pradnya.shidore@gmail.com