शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

काश्मिरी तरुणी ३ वर्षे उशिरा करतात लग्न

By admin | Updated: April 5, 2017 18:35 IST

गेली अनेक वर्षे झाली, काश्मीरचा विषय चर्चेत राहिला नाही असा एकही दिवस जात नाही. आताही काश्मीर चर्चेच आहेच.

गेली अनेक वर्षे झाली, काश्मीरचा विषय चर्चेत राहिला नाही असा एकही दिवस जात नाही. आताही काश्मीर चर्चेच आहेच. काश्मीरच्या अशांततेचं नेहमीचं कारण तर आहेच, पण यावेळी काश्मीर गाजवताहेत त्या काश्मिरी ललना. केंद्र सरकारनं गेल्याच आठवड्यात एक अहवाल जाहीर केला आहे. त्यानुसार एक आश्चर्यकारक माहिती उघड झाली आहे. देशातील पुरुष आणि स्त्रियांच्या संदर्भातील अभ्यासाचा हा अहवाल सांगतो, जम्मू-काश्मिरातील तरुणींचं विवाहाचं वय देशात सर्वाधिक आहे. त्याचवेळी झारखंडच्या तरुणी मात्र अधिक लवकर विवाहबंधनात अडकून संसाराला लागतात. या अभ्यासात देशातील एकूण २१ राज्यांचा अभ्यास करण्यात आला आणि ठिकठिकाणच्या तरुणींच्या विवाहाच्या वयाचा आढावा घेण्यात आला. २०१४ मध्ये देशातील या २१ राज्यांतील तरुणींचं विवाहाचं सरासरी वय होतं २२ वर्षे आणि तीन महिने. त्याचवेळी जम्मू-काश्मीरच्या तरुणींचं विवाहाचं वय मात्र होतं तब्बल २५ वर्षे आणि दोन महिने. याच काळात झारखंडच्या तरुणींचं विविहाचं वय होतं २१ वर्षे. संपूर्ण देशातच तरुणींच्या विवाहाचं वय हळूहळू वाढतं आहे असं निरीक्षण हा अहवाल नोंदवतो. पण संपूर्ण देशात काश्मिरी तरुणींच्याच विवाहाचं वय इतकं जास्त का? गेल्या काही वर्षांत जम्मू-काश्मिरात फोफावलेला हिंसाचार आणि तिथली अशांतता, आपल्या भवितव्याविषयी वाटत असलेली चिंता हे तर त्याचं एक कारण आहेच, पण जम्मु-काश्मिरी तरुणींचा विवेकवाद हेही त्यामागचं एक कारण असल्याचं सांगितलं जातंय. याचसंदर्भात कै. बशीर अहमद दाबला यांनीही काश्मिरी तरुण-तरुणींच्या विवाहाचा अभ्यास केला आहे आणि २००८मध्ये तो प्रसिद्धही झाला आहे. नऊ वर्षांपूर्वी जम्मू-काश्मिरातील २५०० तरुण-तरुणींचा अभ्यास त्यांनी केला. त्यांची वैयक्तिक माहिती जमवली. त्यावेळीसुद्धा जेव्हा तेथील तरुणांचं विवाहाचं अपेक्षित वय २८ वर्षे होतं, त्यावेळी तब्बल ३२ व्या वर्षी ते विवाह करीत होते, तर वयाच्या किमान २६व्या वर्षी तरुणींचा विवाह व्हावा असं अपेक्षित असताना २८ व्या वर्षी त्यांचं लग्न होत होतं. खोऱ्यातला दिवसेंदिवस तीव्र होत जाणारा संघर्ष आणि तेथील अशांतता हे कारण तर बशीर यांनी नोंदवलं होतंच, पण या राज्यात कायमच पेटलेल्या असलेल्या बर्फामुळेही अनेक तरुणांनी आपल्या खोऱ्याला रामराम ठोकला होता आणि इतर ठिकाणी ते गेले होते. राहिलेल्यांसाठी हुंड्याचा प्रश्न मोठा होता. जम्मू-काश्मीरमधील तरुणींच्या विवाहाचं सरासरी वय २५ वर्षे दोन महिने असलं तरी शहरी भागातल्या मुलींची हीच सरासरी आणखी जास्त म्हणजे २५ वर्षे आठ महिने इतकी होती. ग्रामीण भागातील मुलींच्या विवाहाच्या वयाची सरासरी मात्र तुलनेनं थोडी कमी २४ वर्षे नऊ महिने होती. देशातील साक्षरतेचा दर ज्या राज्यात सर्वाधिक आहे, त्या केरळचा क्रमांक जम्मू-काश्मीरच्या नंतर लागतो. यासंदर्भातील आकडेवारीही मोठी रंजक आहे. देशातील तरुणींच्या विवाहाच्या वयाची ही आकडेवारी सातत्याने वाढतच गेली आहे. त्यात कायमच जम्मू-काश्मीरने आघाडी घेतली आहे. १९६१मध्ये भारतीय तरुणींच्या विवाहाचं सरासरी वय १५.२ वर्षे होतं, त्यावेळी जम्मू-काश्मीरच्या तरुणींचं विवाहाचं सरासरी वय होतं १७.५ वर्षे. देशाच्या आणि काश्मीरच्या संदर्भात २०१२ मध्ये हेच वय अनुक्रमे २१.२ वर्षे आणि २४.६ वर्षे होतं तर २०१४मध्ये २२.३ वर्षे आणि २५.२ वर्षे! याचाच सरळसरळ अर्थ म्हणजे देशातल्या तरुणींपेक्षा जम्मू-काश्मीरमधील तरुणी तब्बल तीन वर्षे उशिरा लग्न करतात. लग्न तर त्या उशिरा करतात, पण मनासारखा जोडीदार त्यांना मिळतो का, मिळाला का, याचं उत्तर मात्र अजून शोधायचं बाकी आहे.