शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरी तरुणी ३ वर्षे उशिरा करतात लग्न

By admin | Updated: April 5, 2017 18:35 IST

गेली अनेक वर्षे झाली, काश्मीरचा विषय चर्चेत राहिला नाही असा एकही दिवस जात नाही. आताही काश्मीर चर्चेच आहेच.

गेली अनेक वर्षे झाली, काश्मीरचा विषय चर्चेत राहिला नाही असा एकही दिवस जात नाही. आताही काश्मीर चर्चेच आहेच. काश्मीरच्या अशांततेचं नेहमीचं कारण तर आहेच, पण यावेळी काश्मीर गाजवताहेत त्या काश्मिरी ललना. केंद्र सरकारनं गेल्याच आठवड्यात एक अहवाल जाहीर केला आहे. त्यानुसार एक आश्चर्यकारक माहिती उघड झाली आहे. देशातील पुरुष आणि स्त्रियांच्या संदर्भातील अभ्यासाचा हा अहवाल सांगतो, जम्मू-काश्मिरातील तरुणींचं विवाहाचं वय देशात सर्वाधिक आहे. त्याचवेळी झारखंडच्या तरुणी मात्र अधिक लवकर विवाहबंधनात अडकून संसाराला लागतात. या अभ्यासात देशातील एकूण २१ राज्यांचा अभ्यास करण्यात आला आणि ठिकठिकाणच्या तरुणींच्या विवाहाच्या वयाचा आढावा घेण्यात आला. २०१४ मध्ये देशातील या २१ राज्यांतील तरुणींचं विवाहाचं सरासरी वय होतं २२ वर्षे आणि तीन महिने. त्याचवेळी जम्मू-काश्मीरच्या तरुणींचं विवाहाचं वय मात्र होतं तब्बल २५ वर्षे आणि दोन महिने. याच काळात झारखंडच्या तरुणींचं विविहाचं वय होतं २१ वर्षे. संपूर्ण देशातच तरुणींच्या विवाहाचं वय हळूहळू वाढतं आहे असं निरीक्षण हा अहवाल नोंदवतो. पण संपूर्ण देशात काश्मिरी तरुणींच्याच विवाहाचं वय इतकं जास्त का? गेल्या काही वर्षांत जम्मू-काश्मिरात फोफावलेला हिंसाचार आणि तिथली अशांतता, आपल्या भवितव्याविषयी वाटत असलेली चिंता हे तर त्याचं एक कारण आहेच, पण जम्मु-काश्मिरी तरुणींचा विवेकवाद हेही त्यामागचं एक कारण असल्याचं सांगितलं जातंय. याचसंदर्भात कै. बशीर अहमद दाबला यांनीही काश्मिरी तरुण-तरुणींच्या विवाहाचा अभ्यास केला आहे आणि २००८मध्ये तो प्रसिद्धही झाला आहे. नऊ वर्षांपूर्वी जम्मू-काश्मिरातील २५०० तरुण-तरुणींचा अभ्यास त्यांनी केला. त्यांची वैयक्तिक माहिती जमवली. त्यावेळीसुद्धा जेव्हा तेथील तरुणांचं विवाहाचं अपेक्षित वय २८ वर्षे होतं, त्यावेळी तब्बल ३२ व्या वर्षी ते विवाह करीत होते, तर वयाच्या किमान २६व्या वर्षी तरुणींचा विवाह व्हावा असं अपेक्षित असताना २८ व्या वर्षी त्यांचं लग्न होत होतं. खोऱ्यातला दिवसेंदिवस तीव्र होत जाणारा संघर्ष आणि तेथील अशांतता हे कारण तर बशीर यांनी नोंदवलं होतंच, पण या राज्यात कायमच पेटलेल्या असलेल्या बर्फामुळेही अनेक तरुणांनी आपल्या खोऱ्याला रामराम ठोकला होता आणि इतर ठिकाणी ते गेले होते. राहिलेल्यांसाठी हुंड्याचा प्रश्न मोठा होता. जम्मू-काश्मीरमधील तरुणींच्या विवाहाचं सरासरी वय २५ वर्षे दोन महिने असलं तरी शहरी भागातल्या मुलींची हीच सरासरी आणखी जास्त म्हणजे २५ वर्षे आठ महिने इतकी होती. ग्रामीण भागातील मुलींच्या विवाहाच्या वयाची सरासरी मात्र तुलनेनं थोडी कमी २४ वर्षे नऊ महिने होती. देशातील साक्षरतेचा दर ज्या राज्यात सर्वाधिक आहे, त्या केरळचा क्रमांक जम्मू-काश्मीरच्या नंतर लागतो. यासंदर्भातील आकडेवारीही मोठी रंजक आहे. देशातील तरुणींच्या विवाहाच्या वयाची ही आकडेवारी सातत्याने वाढतच गेली आहे. त्यात कायमच जम्मू-काश्मीरने आघाडी घेतली आहे. १९६१मध्ये भारतीय तरुणींच्या विवाहाचं सरासरी वय १५.२ वर्षे होतं, त्यावेळी जम्मू-काश्मीरच्या तरुणींचं विवाहाचं सरासरी वय होतं १७.५ वर्षे. देशाच्या आणि काश्मीरच्या संदर्भात २०१२ मध्ये हेच वय अनुक्रमे २१.२ वर्षे आणि २४.६ वर्षे होतं तर २०१४मध्ये २२.३ वर्षे आणि २५.२ वर्षे! याचाच सरळसरळ अर्थ म्हणजे देशातल्या तरुणींपेक्षा जम्मू-काश्मीरमधील तरुणी तब्बल तीन वर्षे उशिरा लग्न करतात. लग्न तर त्या उशिरा करतात, पण मनासारखा जोडीदार त्यांना मिळतो का, मिळाला का, याचं उत्तर मात्र अजून शोधायचं बाकी आहे.