शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

काश्मिरी तरुणी ३ वर्षे उशिरा करतात लग्न

By admin | Updated: April 5, 2017 18:35 IST

गेली अनेक वर्षे झाली, काश्मीरचा विषय चर्चेत राहिला नाही असा एकही दिवस जात नाही. आताही काश्मीर चर्चेच आहेच.

गेली अनेक वर्षे झाली, काश्मीरचा विषय चर्चेत राहिला नाही असा एकही दिवस जात नाही. आताही काश्मीर चर्चेच आहेच. काश्मीरच्या अशांततेचं नेहमीचं कारण तर आहेच, पण यावेळी काश्मीर गाजवताहेत त्या काश्मिरी ललना. केंद्र सरकारनं गेल्याच आठवड्यात एक अहवाल जाहीर केला आहे. त्यानुसार एक आश्चर्यकारक माहिती उघड झाली आहे. देशातील पुरुष आणि स्त्रियांच्या संदर्भातील अभ्यासाचा हा अहवाल सांगतो, जम्मू-काश्मिरातील तरुणींचं विवाहाचं वय देशात सर्वाधिक आहे. त्याचवेळी झारखंडच्या तरुणी मात्र अधिक लवकर विवाहबंधनात अडकून संसाराला लागतात. या अभ्यासात देशातील एकूण २१ राज्यांचा अभ्यास करण्यात आला आणि ठिकठिकाणच्या तरुणींच्या विवाहाच्या वयाचा आढावा घेण्यात आला. २०१४ मध्ये देशातील या २१ राज्यांतील तरुणींचं विवाहाचं सरासरी वय होतं २२ वर्षे आणि तीन महिने. त्याचवेळी जम्मू-काश्मीरच्या तरुणींचं विवाहाचं वय मात्र होतं तब्बल २५ वर्षे आणि दोन महिने. याच काळात झारखंडच्या तरुणींचं विविहाचं वय होतं २१ वर्षे. संपूर्ण देशातच तरुणींच्या विवाहाचं वय हळूहळू वाढतं आहे असं निरीक्षण हा अहवाल नोंदवतो. पण संपूर्ण देशात काश्मिरी तरुणींच्याच विवाहाचं वय इतकं जास्त का? गेल्या काही वर्षांत जम्मू-काश्मिरात फोफावलेला हिंसाचार आणि तिथली अशांतता, आपल्या भवितव्याविषयी वाटत असलेली चिंता हे तर त्याचं एक कारण आहेच, पण जम्मु-काश्मिरी तरुणींचा विवेकवाद हेही त्यामागचं एक कारण असल्याचं सांगितलं जातंय. याचसंदर्भात कै. बशीर अहमद दाबला यांनीही काश्मिरी तरुण-तरुणींच्या विवाहाचा अभ्यास केला आहे आणि २००८मध्ये तो प्रसिद्धही झाला आहे. नऊ वर्षांपूर्वी जम्मू-काश्मिरातील २५०० तरुण-तरुणींचा अभ्यास त्यांनी केला. त्यांची वैयक्तिक माहिती जमवली. त्यावेळीसुद्धा जेव्हा तेथील तरुणांचं विवाहाचं अपेक्षित वय २८ वर्षे होतं, त्यावेळी तब्बल ३२ व्या वर्षी ते विवाह करीत होते, तर वयाच्या किमान २६व्या वर्षी तरुणींचा विवाह व्हावा असं अपेक्षित असताना २८ व्या वर्षी त्यांचं लग्न होत होतं. खोऱ्यातला दिवसेंदिवस तीव्र होत जाणारा संघर्ष आणि तेथील अशांतता हे कारण तर बशीर यांनी नोंदवलं होतंच, पण या राज्यात कायमच पेटलेल्या असलेल्या बर्फामुळेही अनेक तरुणांनी आपल्या खोऱ्याला रामराम ठोकला होता आणि इतर ठिकाणी ते गेले होते. राहिलेल्यांसाठी हुंड्याचा प्रश्न मोठा होता. जम्मू-काश्मीरमधील तरुणींच्या विवाहाचं सरासरी वय २५ वर्षे दोन महिने असलं तरी शहरी भागातल्या मुलींची हीच सरासरी आणखी जास्त म्हणजे २५ वर्षे आठ महिने इतकी होती. ग्रामीण भागातील मुलींच्या विवाहाच्या वयाची सरासरी मात्र तुलनेनं थोडी कमी २४ वर्षे नऊ महिने होती. देशातील साक्षरतेचा दर ज्या राज्यात सर्वाधिक आहे, त्या केरळचा क्रमांक जम्मू-काश्मीरच्या नंतर लागतो. यासंदर्भातील आकडेवारीही मोठी रंजक आहे. देशातील तरुणींच्या विवाहाच्या वयाची ही आकडेवारी सातत्याने वाढतच गेली आहे. त्यात कायमच जम्मू-काश्मीरने आघाडी घेतली आहे. १९६१मध्ये भारतीय तरुणींच्या विवाहाचं सरासरी वय १५.२ वर्षे होतं, त्यावेळी जम्मू-काश्मीरच्या तरुणींचं विवाहाचं सरासरी वय होतं १७.५ वर्षे. देशाच्या आणि काश्मीरच्या संदर्भात २०१२ मध्ये हेच वय अनुक्रमे २१.२ वर्षे आणि २४.६ वर्षे होतं तर २०१४मध्ये २२.३ वर्षे आणि २५.२ वर्षे! याचाच सरळसरळ अर्थ म्हणजे देशातल्या तरुणींपेक्षा जम्मू-काश्मीरमधील तरुणी तब्बल तीन वर्षे उशिरा लग्न करतात. लग्न तर त्या उशिरा करतात, पण मनासारखा जोडीदार त्यांना मिळतो का, मिळाला का, याचं उत्तर मात्र अजून शोधायचं बाकी आहे.