शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

काश्मिरी तरुणी ३ वर्षे उशिरा करतात लग्न

By admin | Updated: April 5, 2017 18:35 IST

गेली अनेक वर्षे झाली, काश्मीरचा विषय चर्चेत राहिला नाही असा एकही दिवस जात नाही. आताही काश्मीर चर्चेच आहेच.

गेली अनेक वर्षे झाली, काश्मीरचा विषय चर्चेत राहिला नाही असा एकही दिवस जात नाही. आताही काश्मीर चर्चेच आहेच. काश्मीरच्या अशांततेचं नेहमीचं कारण तर आहेच, पण यावेळी काश्मीर गाजवताहेत त्या काश्मिरी ललना. केंद्र सरकारनं गेल्याच आठवड्यात एक अहवाल जाहीर केला आहे. त्यानुसार एक आश्चर्यकारक माहिती उघड झाली आहे. देशातील पुरुष आणि स्त्रियांच्या संदर्भातील अभ्यासाचा हा अहवाल सांगतो, जम्मू-काश्मिरातील तरुणींचं विवाहाचं वय देशात सर्वाधिक आहे. त्याचवेळी झारखंडच्या तरुणी मात्र अधिक लवकर विवाहबंधनात अडकून संसाराला लागतात. या अभ्यासात देशातील एकूण २१ राज्यांचा अभ्यास करण्यात आला आणि ठिकठिकाणच्या तरुणींच्या विवाहाच्या वयाचा आढावा घेण्यात आला. २०१४ मध्ये देशातील या २१ राज्यांतील तरुणींचं विवाहाचं सरासरी वय होतं २२ वर्षे आणि तीन महिने. त्याचवेळी जम्मू-काश्मीरच्या तरुणींचं विवाहाचं वय मात्र होतं तब्बल २५ वर्षे आणि दोन महिने. याच काळात झारखंडच्या तरुणींचं विविहाचं वय होतं २१ वर्षे. संपूर्ण देशातच तरुणींच्या विवाहाचं वय हळूहळू वाढतं आहे असं निरीक्षण हा अहवाल नोंदवतो. पण संपूर्ण देशात काश्मिरी तरुणींच्याच विवाहाचं वय इतकं जास्त का? गेल्या काही वर्षांत जम्मू-काश्मिरात फोफावलेला हिंसाचार आणि तिथली अशांतता, आपल्या भवितव्याविषयी वाटत असलेली चिंता हे तर त्याचं एक कारण आहेच, पण जम्मु-काश्मिरी तरुणींचा विवेकवाद हेही त्यामागचं एक कारण असल्याचं सांगितलं जातंय. याचसंदर्भात कै. बशीर अहमद दाबला यांनीही काश्मिरी तरुण-तरुणींच्या विवाहाचा अभ्यास केला आहे आणि २००८मध्ये तो प्रसिद्धही झाला आहे. नऊ वर्षांपूर्वी जम्मू-काश्मिरातील २५०० तरुण-तरुणींचा अभ्यास त्यांनी केला. त्यांची वैयक्तिक माहिती जमवली. त्यावेळीसुद्धा जेव्हा तेथील तरुणांचं विवाहाचं अपेक्षित वय २८ वर्षे होतं, त्यावेळी तब्बल ३२ व्या वर्षी ते विवाह करीत होते, तर वयाच्या किमान २६व्या वर्षी तरुणींचा विवाह व्हावा असं अपेक्षित असताना २८ व्या वर्षी त्यांचं लग्न होत होतं. खोऱ्यातला दिवसेंदिवस तीव्र होत जाणारा संघर्ष आणि तेथील अशांतता हे कारण तर बशीर यांनी नोंदवलं होतंच, पण या राज्यात कायमच पेटलेल्या असलेल्या बर्फामुळेही अनेक तरुणांनी आपल्या खोऱ्याला रामराम ठोकला होता आणि इतर ठिकाणी ते गेले होते. राहिलेल्यांसाठी हुंड्याचा प्रश्न मोठा होता. जम्मू-काश्मीरमधील तरुणींच्या विवाहाचं सरासरी वय २५ वर्षे दोन महिने असलं तरी शहरी भागातल्या मुलींची हीच सरासरी आणखी जास्त म्हणजे २५ वर्षे आठ महिने इतकी होती. ग्रामीण भागातील मुलींच्या विवाहाच्या वयाची सरासरी मात्र तुलनेनं थोडी कमी २४ वर्षे नऊ महिने होती. देशातील साक्षरतेचा दर ज्या राज्यात सर्वाधिक आहे, त्या केरळचा क्रमांक जम्मू-काश्मीरच्या नंतर लागतो. यासंदर्भातील आकडेवारीही मोठी रंजक आहे. देशातील तरुणींच्या विवाहाच्या वयाची ही आकडेवारी सातत्याने वाढतच गेली आहे. त्यात कायमच जम्मू-काश्मीरने आघाडी घेतली आहे. १९६१मध्ये भारतीय तरुणींच्या विवाहाचं सरासरी वय १५.२ वर्षे होतं, त्यावेळी जम्मू-काश्मीरच्या तरुणींचं विवाहाचं सरासरी वय होतं १७.५ वर्षे. देशाच्या आणि काश्मीरच्या संदर्भात २०१२ मध्ये हेच वय अनुक्रमे २१.२ वर्षे आणि २४.६ वर्षे होतं तर २०१४मध्ये २२.३ वर्षे आणि २५.२ वर्षे! याचाच सरळसरळ अर्थ म्हणजे देशातल्या तरुणींपेक्षा जम्मू-काश्मीरमधील तरुणी तब्बल तीन वर्षे उशिरा लग्न करतात. लग्न तर त्या उशिरा करतात, पण मनासारखा जोडीदार त्यांना मिळतो का, मिळाला का, याचं उत्तर मात्र अजून शोधायचं बाकी आहे.