शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
4
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
5
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
6
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
7
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
8
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
9
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
10
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
11
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
12
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
13
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
14
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
15
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
16
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
17
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
18
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
19
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
20
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

हे शहर आमचं नाहीये का? - का विचारताहेत मुली असा रोखठोक सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 13:12 IST

साधं चहाच्या टपरीवर मुलींना जाता येऊ नये, वाटलं तर कुठं गप्पा मारत बसता येऊ नये? मैदानात खेळायला जाता येऊ नये? साधं वाचनालयात जाता येऊ नये? असं का?

ठळक मुद्दे‘इट्स माय सिटी टू’ ही मुंबईतली डॉक्युमेण्टरी विचारतेय काही प्रश्न

- स्नेहा मोरे

चल, जरा टपरीवर कटिंग घेऊन येऊया. यार, चार तास बसलो नोट्स काढायला, चल जरा मैदानात बघूया टीम आलीय का, बसू कट्टय़ावर.किंवारात्री भेट, नेहमीच्या कट्टय़ावर, बसू निवांत गप्पा मारत -मित्रांच्या गँगमधले हे रोजचे संवाद. असे संवाद मुलींमध्ये घडताना दिसतात का? उत्तर ‘नाही’ असंच मिळतं. कारण मैत्रिणींना एकत्र वेळ घालवायचा असेल तर त्यांना कोणत्या तरी सुरक्षित ठिकाणाचा आधार घ्यावा लागतो. म्हणजे कुणाच्या तरी घरी जावं लागतं, कॉलेजातच बसावं लागतं, कधीमधी हॉटेलात खायला गेलं तर तेवढय़ाच गप्पा होतात. मैदान, चहाची टपरी, पार्क, उद्यानं, शहर किंवा उपनगरातील वृत्तपत्रं वाचनालय, बंद दुकानांच्या पायर्‍या या जागांवरही आजही तरुण मुली- महिला जायला कचरतात. तिथं जाऊन गप्पा मारत बसणं हे तर अशक्यच.बाकी शहरांचं सोडा, मुंबईतही असं वातावरण नाही. त्यामुळेच मुंबईतल्या काही मुली सांगताहेत ठणकावून की ‘हे शहर आमचंही आहे!’ पुरुषांच्या नजरा-भाषा, वावर यानं भेदरलेल्या मुली, महिला सार्वजनिक जागांमधील वावरापासून चार हात लांबच असल्याचं नुकतचं एका धक्कादायक सव्रेक्षणातून समोर आलंय. बर्‍याचदा इच्छा असूनसुद्धा केवळ टपरी, पार्क, मैदान, मंदिर आणि वाचनालयाच्या आवारातील वातावरणामुळे तिकडे जात नसल्याचं मुली-महिलांनी यात म्हटलयं. मुलींच्या सक्षमीकरणासाठी झटणार्‍या ‘अक्षरा’ संस्थेनं यासाठी पुढाकार घेऊन एक चळवळ राबवायला सुरुवात केलीय. त्यातून ‘वाचनहक्क अभियान’, ‘सार्वजनिक जागा जितकी तुमची तितकीच आमचीही’ अशा स्वरुपाच्या चळवळी मुंबई शहरात आकार घेत आहेत.  अक्षरा संस्थेच्या सहसंस्थापिका नंदिता गांधी सांगतात की, संस्थेमध्ये दर आठवडय़ाला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून सामाजिक विषयांबद्दल चर्चा होते. अशाच एका चर्चेदरम्यान संस्थेतील मुलींनी  ‘आमच्या जागा कोणत्या?’ याविषयी प्रश्न विचारणं सुरू केलं. त्यावेळी घर, कॉलेज, वसतिगृह अशा काही ठरावीक जागा सोडल्या तर सार्वजनिक जागांमध्ये बिनदिक्कत फिरायची भीती वाटते, संकोच वाटतो, सुरक्षित वाटत नाही असा सूर या मुलींनी आळवला. आणि मग याच विचारातून ‘इट्स अवर सिटी टू’ या डॉक्युमेण्ट्रीचा जन्म झाला. मुलामुलींना समान वागणुकीच्या गप्पा मारताना रोजच्या जगण्यात भेदाभेद करणारे आपणच असतो हे विसरून जातो. याचीच काहीशी जाणीव वेगळ्या शैलीत, वेगळ्या माध्यमात, वेगळ्या स्वरुपातून करण्यासाठी ही धडपड हा प्रयत्न आम्ही केला. खरं तर मुंबईसारख्या शहरात या मोहिमेची गरज लागणं हे दुर्दैवाचं आहे; परंतु आता मात्र या मोहिमेच्या माध्यमातून आणि दर आठवडय़ाचा उपक्रम म्हणूनच राबवतोय. यात दर शनिवारी संस्थेच्या माध्यमातून महिला-मुलींनी या सार्वजनिक ठिकाणांच्या भेटीसांठी घेऊन जातो. या माध्यमातून हे शहर तुमचचं तितकचं आहे, याची आंतरिक जाणीव मुलींना व्हावी हा उद्देश आहे.या डॉक्युमेण्ट्रीमध्ये सहभागी असलेल्या संस्थेच्या समन्वयक ऊर्मिला साळुंके यांनी सार्वजनिक ठिकाणी दिलेल्या भेटींचा विलक्षण अनुभव मांडला. या अनुभवाविषयी सांगताना त्या म्हणाल्या की, 2016 साली ही फिल्म आकार घेत असताना संस्थेतील मुलींनी शहराच्या वेगवेगळ्या कोपर्‍यातल्या 18-50 वयोगटातल्या 103 महिला व पुरुषांशी चर्चा केली . यातल्या सगळ्या महिलांनी एकदाही टपरी वा वाचनालयात गेलं नसल्याचं सांगितलं. मात्र 69 महिला- मुलींनी या जागा, ठिकाणं ‘जेंडर फ्रेण्डली’ करण्यावर भर द्यावा असं सांगितलं. 45 महिला - मुलींनी दुपारच्या काहीवेळेत कुणी नसताना तिथे जाण्यास प्राधान्य देण्यात येईल असं सांगितलं. खरं तर टपरीवर जाऊन चहा पिणं, यात काय क्रांतिकारी आहे? पण अजूनही आपण तरुणींसाठी कुठल्याच शहरात तो सुरक्षित अवकाश निर्माण करू शकलेलो नाही.

***

रात्रीची मुंबापुरी

ज्या शहराच्या अंगाखांद्यावर आपण वाढलोय, ते शहर रात्री कसं दिसतं. स्वप्नांनी झपाटलेली ही मुंबापुरी रात्री झोपते का? रात्रीही या शहराच्या गल्लोगल्ल्या, इथले रस्ते, कट्टे मुली-महिलांसाठी सुरक्षित आहेत का? या सगळ्यांची उत्तरं शोधण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून महिन्यांतून एकदा मुलींना एकत्र घेऊन रात्रीच्या मुंबापुरीची सफर घडविली जाते. आजही अनेक तरुणी नोकरी-शिक्षणासाठी उशिरार्पयत काम करतात; मात्र रात्रभर शहरातल्या वेगवेगळ्या सार्वजनिक जागा, ठिकाणांना भेटी देऊन ते अनुभवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातोय. या आगळ्यावेगळ्या प्रयत्नातून मुलींना शहर आपलसं वाटू लागल्याचं दिसून आलंय.......वाचन हक्क अभियानाला यशअभियानाला आकार देण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून संबंधित यंत्रणेच्या पातळीवरही प्रयत्न करण्यात आले. त्यातल्या शहर-उपनगरातल्या वाचनालय मंडळांशी संवाद साधून गल्लोगल्ली वसलेल्या वाचनालयाच्या जागा महिला-मुलींसाठी खुल्या करण्यात यावा, त्यांच्यासाठी पोषक वातावरण तयार करावे यासाठी पुढाकाराने चर्चा करण्यात आल्या. त्यानुसार वाचनालय मंडळांनी पुढाकार घेऊन मुली-महिलांसाठी सुरक्षित वातावरण तयार केलेच. शिवाय त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे यासाठी मंडळाच्या विविध उपक्रमांत त्यांना सामावून घेतले.......फिल्मचा सन्मानअमेरिका दूतावासाच्या महिला सक्षमीकरण व सुरक्षाविषयक आधारित डॉक्युमेण्ट्री स्पर्धेत अक्षरा संस्थेच्या ‘इट्स अवर सिटी टू’ या फिल्मचा सन्मान करण्यात आला. या फिल्मने तृतीय स्थान मिळवलं.