शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
2
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
3
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
4
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
6
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...
7
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
8
ITR ची डेडलाईन ४५ दिवसांनी का वाढवली? १२ लाखांपर्यंतचा 'नो टॅक्स' आता नाही, पुढच्या वर्षी
9
“विद्यार्थी स्कूल व्हॅनला शासन मंजुरी, सुरक्षित वाहतुकीसह बेरोजगारांना रोजगार संधी”: सरनाईक
10
आयकर कायद्याचा चेहरामोहरा बदलणार? अर्थमंत्र्यांनी सादर केले नवे विधेयक, 'हे' मोठे बदल तुमच्यासाठी महत्त्वाचे!
11
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
12
ICC Womens World Cup 2025 : युवराज सिंगच्या साक्षीनं हरमनप्रीत कौरनं दिला शब्द; आम्ही...
13
‘काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजपाच काँग्रेसयुक्त झाला; भाजपाकडे नेतृत्व, कार्यकर्त्यांचा अभाव,’’ हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला   
14
AUS vs SA: एकेकाळी 'मुंबई इंडियन्स'कडून खेळणाऱ्या फलंदाजांने मोडला सूर्यकुमार यादवचा विश्वविक्रम
15
“सगळीकडे हीच चर्चा, मतचोरीविरोधात जनता राहुल गांधींसोबत, संपूर्ण देश म्हणणे ऐकतोय”: काँग्रेस
16
आई दुसऱ्यांकडे काम करायची, वडील विटा उचलायचे; २२ व्या वर्षी लेक देशातील सर्वात तरुण IPS
17
VIDEO: महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
18
Viral Video: मध्यरात्री शौचालयासाठी बाहेर पडला, अचानक समोर दिसला बिबट्या, पहारेकरीसोबत असं घडलं की...
19
‘माझी पत्नी बाहेरच्या लोकांना घरी बोलावते’, व्हिडीओमध्ये सांगून पतीनं उचललं भयानक पाऊल...  
20
बर्फाळ टेकडीवर वसलाय 'हा' छोटासा देश! स्वतःचा झेंडा, ध्वज आणि पासपोर्टची सुविधा देखील उपलब्ध; तुम्हाला माहितीये का?

जे आपण करु शकतो, ते तरी आपण करतोय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 17:00 IST

जे हातात नाही त्यासाठी रडण्यापेक्षा जे हातात आहे, त्याचं आपण काय करतो?

- विकास बांबल 

कॉलेजमध्ये सर वर्गात शिकवत असताना घडलेला किस्सा. ज्यामुळे मला खूप मोठी शिकवण मिळाली.बिझनेस मॅनेजमेण्ट या विषयाचा क्लास चालू होता. माझा आवडता विषय. सरसुद्धा छान तल्लीन होऊन शिकवत होते. थोडय़ाच वेळात वर्गाच्या खिडकीतून बाहेरचे हसण्या-खिदळण्याचे आवाज ऐकायला आलेत व मोबाइलवरची गाणीसुद्धा ऐकू येऊ लागली. त्या  आवाजामुळे संपूर्ण वर्ग डिस्टर्ब झाला.सर तसेच तडकाफडकी खिडकी जवळ गेलेत. खिडकीतूनच डोकावून पाहत गाणी वाजवणार्‍या मुलांना विनंती केली, ‘अरे मुलांनो, येथे गाणी वाजवू नका.’ सरांच्या बोलण्यावर मुलांनी गाणी लगेच बंद केलीत आणि सर पुन्हा शिकवायला लागलेत. मग पुन्हा पाच-दहा मिनिटांनी गाण्यांचा आवाज ऐकायला येऊ लागला. सरांनी पुन्हा एकदा संबंधितांना विनंती केली, कृपया येथे गाणी वाजवू नका. क्लास चालू आहे.पण ह्यावेळी गाणी बंद झाली नाहीत उलट बाहेरून हसण्याचे आवाज आलेत. तेव्हा सरांनी नाइलाजाने ती खिडकी पूर्णपणे बंद करून घेतली. त्यामुळे ऐकू येणार्‍या आवाजाची तीव्रता बरीच कमी झाली. मग सरांनी आपला आवाज थोडा वाढवत आम्हाला शिकविण्यास सुरुवात केली.तेव्हा सरांनी एक गोष्ट सांगितली होती. आजही ती स्मरणात आहे.सर म्हणाले, मी प्रयत्न करूनही मुलांनी गाणी बंद केली नाहीत, पण मी ही खिडकी बंद करू शकत होतो जे माझ्या हातात होते ते मी केले. दुसर्‍यानं काय करायला पाहिजे यापेक्षा मी काय केलं पाहिजे, माझ्या हातात कुठला पर्याय आहे याचा विचार आपण करायला हवाय.ही गोष्ट छोटी असली तरी सुखी आणि समाधानी जीवन जगण्याचा मंत्न देणारी आहे.आयुष्यात बर्‍याच गोष्टी आपल्या हातात नसतात. त्या आपल्या हातात नसतात याच गोष्टीची सल आयुष्यभर आपण बाळगतो त्यामुळे बरेचदा दुर्‍खच आपल्या वाटय़ाला येते.  याउलट माझ्याकडे काय आहे? याचा मी जीवन सुंदर करण्यासाठी कसा उपयोग करून घेऊ शकतो?  हा विचार प्रत्येकाने केल्यास दुर्‍खाचा भार तेवढाच कमी करता येईल.जेवढा सकारात्मक विचार करून आपल्याला जगता येईल तेवढे आपणच स्वतर्‍ आनंदी राहू. नकारात्मक विचार वेदनेशिवाय काही देत नाही. नेहमी आपल्याकडे असलेल्या गोष्टींचा पुरेपूर उपयोग करून घेता आला पाहिजे. आपल्या हातात अमुक गोष्ट नाही म्हणून मन लहान करून घेऊ नये. जे आपल्या हातात आहे त्यावर समाधान व्यक्त करा. आणि प्रयत्न करीत राहा.आयुष्याचा प्रवास करताना जे आपल्या हातात नाही त्याचा शोक करीत बसण्यापेक्षा जे आहे त्याचा आनंद घेत उपयोग करून घेणं महत्त्वाचं.आपण आपल्या हाती कण्ट्रोल घेतलेला बरा.