शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

जे आपण करु शकतो, ते तरी आपण करतोय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 17:00 IST

जे हातात नाही त्यासाठी रडण्यापेक्षा जे हातात आहे, त्याचं आपण काय करतो?

- विकास बांबल 

कॉलेजमध्ये सर वर्गात शिकवत असताना घडलेला किस्सा. ज्यामुळे मला खूप मोठी शिकवण मिळाली.बिझनेस मॅनेजमेण्ट या विषयाचा क्लास चालू होता. माझा आवडता विषय. सरसुद्धा छान तल्लीन होऊन शिकवत होते. थोडय़ाच वेळात वर्गाच्या खिडकीतून बाहेरचे हसण्या-खिदळण्याचे आवाज ऐकायला आलेत व मोबाइलवरची गाणीसुद्धा ऐकू येऊ लागली. त्या  आवाजामुळे संपूर्ण वर्ग डिस्टर्ब झाला.सर तसेच तडकाफडकी खिडकी जवळ गेलेत. खिडकीतूनच डोकावून पाहत गाणी वाजवणार्‍या मुलांना विनंती केली, ‘अरे मुलांनो, येथे गाणी वाजवू नका.’ सरांच्या बोलण्यावर मुलांनी गाणी लगेच बंद केलीत आणि सर पुन्हा शिकवायला लागलेत. मग पुन्हा पाच-दहा मिनिटांनी गाण्यांचा आवाज ऐकायला येऊ लागला. सरांनी पुन्हा एकदा संबंधितांना विनंती केली, कृपया येथे गाणी वाजवू नका. क्लास चालू आहे.पण ह्यावेळी गाणी बंद झाली नाहीत उलट बाहेरून हसण्याचे आवाज आलेत. तेव्हा सरांनी नाइलाजाने ती खिडकी पूर्णपणे बंद करून घेतली. त्यामुळे ऐकू येणार्‍या आवाजाची तीव्रता बरीच कमी झाली. मग सरांनी आपला आवाज थोडा वाढवत आम्हाला शिकविण्यास सुरुवात केली.तेव्हा सरांनी एक गोष्ट सांगितली होती. आजही ती स्मरणात आहे.सर म्हणाले, मी प्रयत्न करूनही मुलांनी गाणी बंद केली नाहीत, पण मी ही खिडकी बंद करू शकत होतो जे माझ्या हातात होते ते मी केले. दुसर्‍यानं काय करायला पाहिजे यापेक्षा मी काय केलं पाहिजे, माझ्या हातात कुठला पर्याय आहे याचा विचार आपण करायला हवाय.ही गोष्ट छोटी असली तरी सुखी आणि समाधानी जीवन जगण्याचा मंत्न देणारी आहे.आयुष्यात बर्‍याच गोष्टी आपल्या हातात नसतात. त्या आपल्या हातात नसतात याच गोष्टीची सल आयुष्यभर आपण बाळगतो त्यामुळे बरेचदा दुर्‍खच आपल्या वाटय़ाला येते.  याउलट माझ्याकडे काय आहे? याचा मी जीवन सुंदर करण्यासाठी कसा उपयोग करून घेऊ शकतो?  हा विचार प्रत्येकाने केल्यास दुर्‍खाचा भार तेवढाच कमी करता येईल.जेवढा सकारात्मक विचार करून आपल्याला जगता येईल तेवढे आपणच स्वतर्‍ आनंदी राहू. नकारात्मक विचार वेदनेशिवाय काही देत नाही. नेहमी आपल्याकडे असलेल्या गोष्टींचा पुरेपूर उपयोग करून घेता आला पाहिजे. आपल्या हातात अमुक गोष्ट नाही म्हणून मन लहान करून घेऊ नये. जे आपल्या हातात आहे त्यावर समाधान व्यक्त करा. आणि प्रयत्न करीत राहा.आयुष्याचा प्रवास करताना जे आपल्या हातात नाही त्याचा शोक करीत बसण्यापेक्षा जे आहे त्याचा आनंद घेत उपयोग करून घेणं महत्त्वाचं.आपण आपल्या हाती कण्ट्रोल घेतलेला बरा.