शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जे आपण करु शकतो, ते तरी आपण करतोय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 17:00 IST

जे हातात नाही त्यासाठी रडण्यापेक्षा जे हातात आहे, त्याचं आपण काय करतो?

- विकास बांबल 

कॉलेजमध्ये सर वर्गात शिकवत असताना घडलेला किस्सा. ज्यामुळे मला खूप मोठी शिकवण मिळाली.बिझनेस मॅनेजमेण्ट या विषयाचा क्लास चालू होता. माझा आवडता विषय. सरसुद्धा छान तल्लीन होऊन शिकवत होते. थोडय़ाच वेळात वर्गाच्या खिडकीतून बाहेरचे हसण्या-खिदळण्याचे आवाज ऐकायला आलेत व मोबाइलवरची गाणीसुद्धा ऐकू येऊ लागली. त्या  आवाजामुळे संपूर्ण वर्ग डिस्टर्ब झाला.सर तसेच तडकाफडकी खिडकी जवळ गेलेत. खिडकीतूनच डोकावून पाहत गाणी वाजवणार्‍या मुलांना विनंती केली, ‘अरे मुलांनो, येथे गाणी वाजवू नका.’ सरांच्या बोलण्यावर मुलांनी गाणी लगेच बंद केलीत आणि सर पुन्हा शिकवायला लागलेत. मग पुन्हा पाच-दहा मिनिटांनी गाण्यांचा आवाज ऐकायला येऊ लागला. सरांनी पुन्हा एकदा संबंधितांना विनंती केली, कृपया येथे गाणी वाजवू नका. क्लास चालू आहे.पण ह्यावेळी गाणी बंद झाली नाहीत उलट बाहेरून हसण्याचे आवाज आलेत. तेव्हा सरांनी नाइलाजाने ती खिडकी पूर्णपणे बंद करून घेतली. त्यामुळे ऐकू येणार्‍या आवाजाची तीव्रता बरीच कमी झाली. मग सरांनी आपला आवाज थोडा वाढवत आम्हाला शिकविण्यास सुरुवात केली.तेव्हा सरांनी एक गोष्ट सांगितली होती. आजही ती स्मरणात आहे.सर म्हणाले, मी प्रयत्न करूनही मुलांनी गाणी बंद केली नाहीत, पण मी ही खिडकी बंद करू शकत होतो जे माझ्या हातात होते ते मी केले. दुसर्‍यानं काय करायला पाहिजे यापेक्षा मी काय केलं पाहिजे, माझ्या हातात कुठला पर्याय आहे याचा विचार आपण करायला हवाय.ही गोष्ट छोटी असली तरी सुखी आणि समाधानी जीवन जगण्याचा मंत्न देणारी आहे.आयुष्यात बर्‍याच गोष्टी आपल्या हातात नसतात. त्या आपल्या हातात नसतात याच गोष्टीची सल आयुष्यभर आपण बाळगतो त्यामुळे बरेचदा दुर्‍खच आपल्या वाटय़ाला येते.  याउलट माझ्याकडे काय आहे? याचा मी जीवन सुंदर करण्यासाठी कसा उपयोग करून घेऊ शकतो?  हा विचार प्रत्येकाने केल्यास दुर्‍खाचा भार तेवढाच कमी करता येईल.जेवढा सकारात्मक विचार करून आपल्याला जगता येईल तेवढे आपणच स्वतर्‍ आनंदी राहू. नकारात्मक विचार वेदनेशिवाय काही देत नाही. नेहमी आपल्याकडे असलेल्या गोष्टींचा पुरेपूर उपयोग करून घेता आला पाहिजे. आपल्या हातात अमुक गोष्ट नाही म्हणून मन लहान करून घेऊ नये. जे आपल्या हातात आहे त्यावर समाधान व्यक्त करा. आणि प्रयत्न करीत राहा.आयुष्याचा प्रवास करताना जे आपल्या हातात नाही त्याचा शोक करीत बसण्यापेक्षा जे आहे त्याचा आनंद घेत उपयोग करून घेणं महत्त्वाचं.आपण आपल्या हाती कण्ट्रोल घेतलेला बरा.