शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

बँक मॅनेजर व्हाया इंडियन नेव्ही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 03:00 IST

इंडियन नेव्हीत निवड झाली आणि तिथंच माझ्या जगण्यानं एक नवं वळण घेतलं..

- चंद्रकांत मोरेवर्धनगड हे ऐतिहासिक वारसा लाभलेलं माझं सातारा जिल्ह्यातील छोटंसं खेडेगाव. आमच्या घरापासून ३-४ किमी अंतरावर असणाऱ्या प्राथमिक शाळेनं माझा शैक्षणिक पाया मजबूत केलाच पण रोजच्या पायी प्रवासानं शारीरिक जडणघडणही चांगली होत गेली. इथे पाचवीपर्यंतचं शिक्षण घेताना इतर वेळांत घरगुती कामं, गायी, बैल, शेळ्या, कोंबड्या सांभाळणं आणि शेतामधील कामात मदत करणं सुरूच होतं. या गोष्टींमुळे गावाशी आणि मातीशी एकदम घट्ट नाळ जुळली.सहावीसाठी पहिल्यांदा घराबाहेर पडलो ते थेट मिस क्लार्क होस्टेल, कोल्हापूरला पोहोचलो. देशभूषण हायस्कूल, कोल्हापूर येथे शिकत असताना अभ्यासाव्यतिरिक्त स्वावलंबनाचे धडेही गिरवले. पैसे, कपडे आणि इतर वस्तूंच्या कमतरतेबरोबरच प्रसंगी उपवासही घडायचा. अशा परिस्थितीतही स्वत:ला सावरायला शिकलो.आठवीला सरस्वती विद्यालय, कोेरेगाव इथं प्रवेश घेतला आणि शासकीय मुलांचे वसतिगृह कोरेगाव हे आमचं दुसरं घर बनलं. एव्हाना, घरापासून दूर राहण्याची सवय आणि वसतिगृहात राहण्याचा अनुभव असल्यानं इथंही सहज रमून गेलो. इथल्या पाच वर्षांच्या प्रवासात अभ्यासापेक्षा खेळ आणि इतर अवांतर गोष्टीत बराच सहभाग होता. त्यामुळे मैत्रीसंबंध आणि सामाजिक बंध दृढ होत गेले.बारावीच्या वार्षिक परीक्षेला अभ्यासाची अपेक्षित तयारी न झाल्यामुळे पुन्हा सर्व विषय घेऊन बारावीला प्रवेश घेण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय स्वत:च घेतला आणि गणिताचा पेपर सोडला. याचा परिणाम म्हणजे, पहिलीपासून नेहमी अव्वल असणारा मी बारावी नापासचा निकाल घेऊन घरी पोहोचलो. हे सर्वांनाच अनपेक्षित होते. माझ्या डोक्यात तर अक्षरश: कल्लोळ माजला होता. एकदोन महिन्यांत रेडिओवर जाहिरात ऐकून वडिलांच्या आग्रहाखातर मी इंडियन नेव्ही ट्रेनिंग भरतीसाठी गेलो. माझी अंतिम निवडही झाली. हे माझ्या आयुष्यातील महत्त्वाचं वळण ठरलं.ओरिसाला इंडियन नेव्हीचं प्रशिक्षण घेताना माझ्या मार्गात सात वर्षांच्या स्वावलंबी प्रवासाचा फार उपयोग झाला. संपूर्ण भारतभरातून आलेल्या सर्व प्रकारच्या प्रशिक्षणार्थींबरोबर सहज मैत्री झाली. अतिशय खडतर प्रशिक्षणातही यश मिळाल्याचा आनंद वाटत होता.प्रशिक्षणानंतर विशाखापट्टणमच्या पहिल्या पोस्टिंगने मला खºया अर्थानं खेळाडू बनवलं. बास्केटबॉल, व्हॉलिबॉल, अ‍ॅथलेटिक्स असे सर्व खेळ शिकून त्यात प्रावीण्य मिळवलं. आॅल इंडिया नेव्ही चॅम्पियनशिपपर्यंत मजल मारली. २००७ मध्ये अतिशय अवघड असा ड्रायव्हिंगचा कोर्स पूर्ण केला आणि इथून पुढे मला खºया अर्थाने माझ्या क्षमतांची प्रचिती यायला लागली. पुढच्या काही काळात सेलिंग इन्स्ट्रक्टर म्हणून काम करायची संधीही मिळाली.हे सर्व चालू असतानाच अपूर्ण राहिलेलं शिक्षण पूर्ण करावं असं वाटू लागलं. संधी मिळाली आणि एक्स्टर्नल, बीए-एमबीएही पूर्ण केलं. यूजीसी-नेटची परीक्षाही दुसºया प्रयत्नात यशस्वी झालो.आता यापेक्षा मोठं व्यासपीठ मला खुणावत होतं की काय म्हणून आयबीपीएसमधून बँक अधिकारी झालो. आणि माझ्या जीवनप्रवासाला दुसरं वळण मिळालं. आज मागे वळून पाहताना आयुष्यातील काही महत्त्वाचे टप्पे आणि माझी जडणघडण स्पष्टपणे जाणवते. वर्धनगडच्या पहिल्या दहा वर्षांच्या काळात मातीशी आणि गावाशी घट्टपणे नाळ जुळलेली होती. कोल्हापूर येथे दोन वर्षांच्या प्रवासात स्वावलंबन आणि सामंजस्य शिकलो. कोरेगाव येथे पाच वर्षांत मैत्री आणि सामाजिकतेचे भान वाढत गेलं. इंडियन नेव्हीमध्ये पंधरा वर्षांच्या काळात खºया अर्थाने माझ्या क्षमतांचा विकास होत गेला. आणि बँक अधिकारी म्हणून मागील तीन वर्षांत माझा आत्मविश्वास दृढ होत गेला.वयाच्या अकराव्या वर्षी ‘वन वे तिकीट’ काढून गाव सोडलंय, अजून प्रवास चालूच आहे. पुढचं स्टेशन माहीत नाही आणि अंतिम स्टेशनची कल्पना नाही. ज्या समाजानं आपल्याला घडवलं आपण त्या समाजाचं काहीतरी देणं लागतो हा विचार आणि विश्वास सोबत घेऊन हा प्रवास सुरूच आहे...

(प्रबंधक- बँक ऑफ महाराष्ट्र, सातारा शहर शाखा)