शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

३ दोस्त आणि १०० माणसं

By admin | Updated: April 28, 2016 13:53 IST

रेल्वेच्या सेकंडक्लास डब्यातून विनाआरक्षण प्रवास करत देशाची चारी टोकं फिरणाऱ्या दोस्तांचा आॅँखो देखा विशेष रिपोर्ट.

- आॅक्सिजन टीम

तीन दोस्त.मुंबईकर. उच्चशिक्षित.मात्र नोकरी आणि बड्या पगाराच्या मळलेल्या वाटा सोडून आपले क्रिएटिव्ह आनंद शोधत त्याप्रमाणे करिअरची वाट चालणारे..समर्थ महाजन, रजत भार्गव, ओमकार दिवेकर.एकदा समर्थच्या आॅफिसमध्ये बसलेले असताना घमासान चर्चा, ब्रेनस्टॉर्मिंग चाललं होतं. समर्थ आयआयटीवाला. मात्र ती लाइन सोडून क्रिएटिव्ह डिरेक्टर होत कलेच्या जगात आपला आनंद शोधणारा.दोस्तांशी चाललेल्या घमासान चर्चेत त्यानं एक कल्पना मांडली की, आपल्याला माणसं, त्यांचं जगणं, जग, सुखदु:ख समजून घ्यायची, आपला देश पाहायचा तर आपण रेल्वेनं देशाच्या चारी दिशांना जाऊ! तेही विनाआरक्षित जनरल कम्पार्टमेण्टमधून..त्यात जे दिसेल, सापडेल, अनुभव येतील, ते सारे आपले!रजत आणि ओमकारलाही ती आयडिया आवडली.रजत पटकथा लेखक, तर ओमकार सिनेमॅटोग्राफर.काहीही उद्देश नाही, कसलाही हेतू नाही.कुठलंही पर्यटन नाही, अमुक एक बघायचंच असा अट्टहास नाही, आणि कसलीही चंगळ नाही. मुख्य म्हणजे पर्यटक म्हणून आपला देश पाहायचा नाही, तर हा देश समजून घ्यायचा. इथल्या माणसांच्या जगण्यातून त्यातले ताणेबाणे समजून घ्यायचे एवढंच त्यांनी ठरवलं.सोबत फक्त प्रवासाचे टप्पे, ठिकाणं ठरवली. त्यासाठी किती वेळ लागेल हे अंदाजे प्लॅन केलं.आणि ‘देश पाहायचा, माणसं वाचायची’ म्हणत त्यांनी मुंबईहून सेकंडक्लास डबा गाठत बिनधास्त भ्रमंती सुरू केली..मुंबई-गुजरात-दिल्ली-काश्मीर-आसाम-तामिळनाडू-मुंबई असा मोठ्ठा प्रवास करत, रात्रंदिवस रेल्वेत बसून लोकांशी गप्पा मारत एक मोठा ऐवज कमवून ते मुंबईत परतले..या प्रवासात किमान १०० लोकांशी तरी त्यांच्या विस्तृत गप्पा झाल्या, प्रांत-भाषा-आर्थिक स्थिती-सामाजिक समस्या आणि व्यक्तिगत स्वप्न याची बदलती रूपं त्यांनी अनुभवलीच; पण त्यासोबत एक ठाम विश्वासही कमावला..ते म्हणतात, ‘‘प्रचंड गर्दीत सुविधांची पुरती वानवा. स्वत:साठी त्या गर्दीत जागा करून घेणंही अवघड अशा अवस्थेतही लोक इतरांना समजून घेतात, सामावून घेतात, गप्पा मारतात, सुखदु:ख वाटतात. हे किती वेगळं आहे. माणसं इतकी चांगली असू शकतात, याचा अनुभव एरवी घरबसल्या कसा यावा?’’अशाच थरारक अनआरक्षित प्रवासाची एक भन्नाट रेल्वे डायरी.१० ट्रेन, १७ दिवस, २६५ तास