शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

Tokyo Olympics: मीराबाईच्या यशाने मानसिकता बदलेल; सामाजिक विचार बदलण्याची गरज 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 7:22 AM

स्नॅच विभाग मीराबाईची कमजोरी होती. मात्र, तिने ऑलिम्पिक पदक मिळवण्याचे लक्ष्य समोर ठेवून कठोर मेहनत घेतली आणि ही कमजोरी दूर केली.

अयाज मेमन

कन्सल्टिंग एडिटर 

शनिवारची सकाळ मीराबाई चानूने गाजवली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये या भारोत्तोलकने ऐतिहासिक कामगिरी करताना भारताला रौप्यपदक मिळवून दिले. या यशाचे दोन महत्त्वपूर्ण पैलू आहेत. हे यश मिळवण्यासाठी तिने केलेला प्रवास उल्लेखनीय आहे. अत्यंत गरीब घरातील सहा भावंडांमधील मीराबाईचे जीवन अत्यंत संघर्षमय ठरले. परिवाराचा आर्थिक भार उचलण्यासाठी तिला लहानपणी लाकडे तोडावी लागायची. मात्र, एका स्थानिक प्रशिक्षकाने तिच्यातील गुणवत्ता ओळखली आणि मीराबाईच्या आयुष्याला वेगळेच वळण लागले. त्यावेळी, ती केवळ १२ वर्षांची होती.

२०१४ साली ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक जिंकत मीराबाईने पहिल्यांदा सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले. २०१६ साली रिओ ऑलिम्पिकमध्ये तिच्याकडून भारताला पदकाची सर्वाधिक आशा होती. मात्र, तिच्याकडून निराशाजनक कामगिरी झाली. या अपयशाने अत्यंत निराश झालेल्या मीराबाईने खेळातून निवृत्त होण्याचाही विचार केला होता. या पराभवानंतर पुन्हा एकदा तिची कारकिर्द वेगळ्या वळणावर आली. रिओमधील अपयश टोकियोमध्ये मागे टाकण्याचा त्याचवेळी मीराबाईने निर्धार केला आणि पुढील ऑलिम्पिकच्या तयारीसाठी तिने तेव्हाच सुरुवात केली.

स्नॅच विभाग मीराबाईची कमजोरी होती. मात्र, तिने ऑलिम्पिक पदक मिळवण्याचे लक्ष्य समोर ठेवून कठोर मेहनत घेतली आणि ही कमजोरी दूर केली. टीव्ही समालोचनादरम्यान माजी हॉकी कर्णधार विरेन रिस्किन्हा यानेही सांगितले होते की, ‘कमजोरी दूर करणे हेच मीराबाईचे समर्पण ठरेल.’ शनिवारी स्पर्धेदरम्यान मीराबाई खूप सकारात्मक दिसली. स्नॅच प्रकारात प्रयत्न केल्यानंतर तिचा आत्मविश्वास आणखी वाढला. तिने आपल्या भावनांवर प्रचंड नियंत्रण राखले. माझ्या मते जर मुलींना आक्रमकतेने खेळांमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहन दिले, तेव्हाच असे परिवर्तन शक्य आहे. यासाठी सामाजिक विचार बदलण्याची गरज आहे. असे झाले तरच चानूसारखे चॅम्पियन दुर्मिळपणे नाही, तर नियमितपणे तयार होतील.

ऑलिम्पिकमधील भारताच्या आतापर्यंतच्या यशावर नजर टाकल्यास लक्षात येईल की, ज्या खेळांमध्ये भारतीयांना तंदुरुस्त मानले जात नाही, त्याच खेळांमध्ये भारतीय महिलांनी बाजी मारली आहे. मेरीकोम, कर्णम मल्लेश्वरी,  पी. व्ही. सिंधू, साक्षी मलिक अशी काही उदाहरणे आहेत. लिएंडर पेसने अटलांटामध्ये कांस्यपदक जिंकले आणि त्यानंतर २५ वर्षांत भारतीयांनी १५ वैयक्तिक ऑलिम्पिक पदके जिंकली आहेत. यामध्ये सहा म्हणजेच ४० टक्के यश महिलांनी मिळवले आहे. मल्लेश्वरी, सायना नेहवाल, मेरी कोम, सिंधू, ंसाक्षी मलिक आणि मीराबाई चानू यांचा यामध्ये समावेश आहे. तसेच, ऑलिम्पिकव्यतिरिक्त अनेक आघाडीच्या महिला खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये आपली छाप पाडली आहे. 

टॅग्स :Mirabai Chanuमीराबाई चानूOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021