शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

"UPA सरकारकडून हवा तसा पाठिंबा नव्हता; ऑलिम्पिकमधील भारताच्या यशाचं श्रेय पंतप्रधान मोदींना!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 12:06 IST

Tokyo Olympic 2020 : भारतीय खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत १ सुवर्ण, दोन रौप्य व ४ कांस्य अशा एकूण ७ पदकांची कमाई केली.

Tokyo Olympic 2020 : भारतीय खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत १ सुवर्ण, दोन रौप्य व ४ कांस्य अशा एकूण ७ पदकांची कमाई केली. ऑलिम्पिक स्पर्धेतील ही आतापर्यंतची भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी २०१२ मध्ये भारतानं ६ पदकं जिंकली होती. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी कुस्तीपटू बजरंग पुनियानं कांस्यपदक जिंकले, तर भालाफेकपटू नीरज चोप्रानं सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला. १२५ वर्षांत अॅथलेटिक्समधील भारताचे पहिलेच ऑलिम्पिक पदक ठरले. भारताच्या या ऐतिहासिक कामगिरीवर प्रतिक्रिया देताना माजी खेळाडू अंजू बॉबी जॉर्ज हिनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार जे खेळाडूंच्या पाठिशी खंबीरपणे उभे होते, यांचे आभार मानले. ( former Indian athlete Anju Bobby George thanked PM Narendra Modi and his government's support behind India's marked improvement at the Olympics)

Neeraj Chopra : तुम्हाला माहित्येय का? गोल्डन बॉय नीरज चोप्रासाठी भारत सरकारनं खर्च केले किती कोटी?

२००४च्या अॅथेन्स ऑलिम्पिक स्पर्धेत अंजू बॉबी जॉर्ज लांब उडीत पाचव्या क्रमांकावर राहिली होती आणि तिनं वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करताना ६.८३ मीटर लांब उडी मारली होती. यावेळी अंजू बॉबी जॉर्ज यांनी अॅथेन्स ऑलिम्पिक स्पर्धेतील दिवसांना उजाळा दिला. सोनी स्पोर्ट्स चॅनेलवर बोलताना त्या म्हणाल्या, ''आमच्या काळात आपले क्रीडा मंत्री ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये पाहुणे म्हणून यायचे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकल्यानंतर भारतात मोठा जल्लोष साजरा केला गेला, परंतु मंत्र्यांकडून त्याला फार महत्त्व दिले गेले नाही. तत्कालिन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी माझे अभिनंदन केले, त्यापलिकडे काहीच नव्हते.''

गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्रा झाला करोडपती; ३ तासांत १६.७५ कोटींचे रोख बक्षीस जाहीर, जाणून घ्या संपूर्ण लिस्ट

आता खेळाडूंना मिळत असलेले महत्त्व मिस करत असल्याचेही त्या म्हणाल्या. ''भारत सरकार खेळाडूंना खूप महत्त्व देत आहे. पदक जिंकल्यानंतर आपले पंतप्रधान स्वतः खेळाडूंना फोन करत आहेत. त्यामुळे खेळाडूंनाही ही संधी सोडावीशी वाटत नाही. भारतात काहीतरी मोठं होत आहे. मी याचा भाग नसल्यानं मी हे सर्व मिस करतेय,''असेही त्या म्हणाल्या.  देशातील सध्याची क्रीडा संस्कृतीबाबत बोलताना अंजू यांनी या सरकारनं ग्रासरूट ( खालच्या स्तरापासून) लेव्हलपासून सोयी सुविधा पुरवल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, ते खूप सहकार्य करत आहेत. ते आमच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत. प्रत्येक खेळाडूवर त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच रिझल्ट मिळत आहेत. ग्रासरूट लेव्हलपासून ते काम करत आहेत. त्यांच्याकडे दीर्घकालीन आराखडा आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरण आतापासूनच २०२८ व २०३२च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या आराखड्यावर काम करत आहेत. सिस्टम असेच काम करते. आता युवा खेळाडूंसाठी अनेक संधी उपलब्ध होत आहेत. असाच पाठिंबा मिळत राहिला, तर भारत एक दिवस नक्की अव्वल क्रमांकावर असेल.''

भारतीयांची अविश्वसनीय कामगिरी; निरोप समारंभात डौलानं फडकला तिरंगा, जाणून घ्या मेडल टॅलीत कितव्या स्थानी!

स्वतः क्रीडापटू असलेले क्रीडा मंत्री आपल्याला मिळाले आणि हे ऑलिम्पिक यशामागचे एक कारण आहे. त्या म्हणाल्या,'' किरण रिजिजू ( माजी क्रीडा मंत्री) त्यांना खेळाची प्रचंड आवड होती आणि ते प्रत्येक खेळाडूला ओळखायचे.  आम्ही जेव्हा मॅसेज किंवा कॉल करायचो, ते मदतीसाठी उपलब्ध असायचे. नवीन क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर सह हेही खेळाडू आहेत आणि तेही चांगले काम करत आहेत. अशा प्रकारचा पाठिंबा मंत्र्यांकडून व सिस्टमकडून अपेक्षित आहे.'' 

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Narendra Modiनरेंद्र मोदीManmohan Singhमनमोहन सिंग