शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

"UPA सरकारकडून हवा तसा पाठिंबा नव्हता; ऑलिम्पिकमधील भारताच्या यशाचं श्रेय पंतप्रधान मोदींना!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 12:06 IST

Tokyo Olympic 2020 : भारतीय खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत १ सुवर्ण, दोन रौप्य व ४ कांस्य अशा एकूण ७ पदकांची कमाई केली.

Tokyo Olympic 2020 : भारतीय खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत १ सुवर्ण, दोन रौप्य व ४ कांस्य अशा एकूण ७ पदकांची कमाई केली. ऑलिम्पिक स्पर्धेतील ही आतापर्यंतची भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी २०१२ मध्ये भारतानं ६ पदकं जिंकली होती. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी कुस्तीपटू बजरंग पुनियानं कांस्यपदक जिंकले, तर भालाफेकपटू नीरज चोप्रानं सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला. १२५ वर्षांत अॅथलेटिक्समधील भारताचे पहिलेच ऑलिम्पिक पदक ठरले. भारताच्या या ऐतिहासिक कामगिरीवर प्रतिक्रिया देताना माजी खेळाडू अंजू बॉबी जॉर्ज हिनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार जे खेळाडूंच्या पाठिशी खंबीरपणे उभे होते, यांचे आभार मानले. ( former Indian athlete Anju Bobby George thanked PM Narendra Modi and his government's support behind India's marked improvement at the Olympics)

Neeraj Chopra : तुम्हाला माहित्येय का? गोल्डन बॉय नीरज चोप्रासाठी भारत सरकारनं खर्च केले किती कोटी?

२००४च्या अॅथेन्स ऑलिम्पिक स्पर्धेत अंजू बॉबी जॉर्ज लांब उडीत पाचव्या क्रमांकावर राहिली होती आणि तिनं वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करताना ६.८३ मीटर लांब उडी मारली होती. यावेळी अंजू बॉबी जॉर्ज यांनी अॅथेन्स ऑलिम्पिक स्पर्धेतील दिवसांना उजाळा दिला. सोनी स्पोर्ट्स चॅनेलवर बोलताना त्या म्हणाल्या, ''आमच्या काळात आपले क्रीडा मंत्री ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये पाहुणे म्हणून यायचे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकल्यानंतर भारतात मोठा जल्लोष साजरा केला गेला, परंतु मंत्र्यांकडून त्याला फार महत्त्व दिले गेले नाही. तत्कालिन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी माझे अभिनंदन केले, त्यापलिकडे काहीच नव्हते.''

गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्रा झाला करोडपती; ३ तासांत १६.७५ कोटींचे रोख बक्षीस जाहीर, जाणून घ्या संपूर्ण लिस्ट

आता खेळाडूंना मिळत असलेले महत्त्व मिस करत असल्याचेही त्या म्हणाल्या. ''भारत सरकार खेळाडूंना खूप महत्त्व देत आहे. पदक जिंकल्यानंतर आपले पंतप्रधान स्वतः खेळाडूंना फोन करत आहेत. त्यामुळे खेळाडूंनाही ही संधी सोडावीशी वाटत नाही. भारतात काहीतरी मोठं होत आहे. मी याचा भाग नसल्यानं मी हे सर्व मिस करतेय,''असेही त्या म्हणाल्या.  देशातील सध्याची क्रीडा संस्कृतीबाबत बोलताना अंजू यांनी या सरकारनं ग्रासरूट ( खालच्या स्तरापासून) लेव्हलपासून सोयी सुविधा पुरवल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, ते खूप सहकार्य करत आहेत. ते आमच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत. प्रत्येक खेळाडूवर त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच रिझल्ट मिळत आहेत. ग्रासरूट लेव्हलपासून ते काम करत आहेत. त्यांच्याकडे दीर्घकालीन आराखडा आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरण आतापासूनच २०२८ व २०३२च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या आराखड्यावर काम करत आहेत. सिस्टम असेच काम करते. आता युवा खेळाडूंसाठी अनेक संधी उपलब्ध होत आहेत. असाच पाठिंबा मिळत राहिला, तर भारत एक दिवस नक्की अव्वल क्रमांकावर असेल.''

भारतीयांची अविश्वसनीय कामगिरी; निरोप समारंभात डौलानं फडकला तिरंगा, जाणून घ्या मेडल टॅलीत कितव्या स्थानी!

स्वतः क्रीडापटू असलेले क्रीडा मंत्री आपल्याला मिळाले आणि हे ऑलिम्पिक यशामागचे एक कारण आहे. त्या म्हणाल्या,'' किरण रिजिजू ( माजी क्रीडा मंत्री) त्यांना खेळाची प्रचंड आवड होती आणि ते प्रत्येक खेळाडूला ओळखायचे.  आम्ही जेव्हा मॅसेज किंवा कॉल करायचो, ते मदतीसाठी उपलब्ध असायचे. नवीन क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर सह हेही खेळाडू आहेत आणि तेही चांगले काम करत आहेत. अशा प्रकारचा पाठिंबा मंत्र्यांकडून व सिस्टमकडून अपेक्षित आहे.'' 

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Narendra Modiनरेंद्र मोदीManmohan Singhमनमोहन सिंग