शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

Controversies Of CWG 2022: या ४ वादांमुळे राष्ट्रकुल स्पर्धेला लागला वाईट डाग; भारताला गमवावे लागले १ सुवर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 12:34 IST

राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ ची सोमवारी सांगता झाली असून ७२ देशातील ५००० हून अधिक ॲथलीट विविध खेळांमध्ये सहभागी झाले होते.

बर्गिंहॅम : राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ (Commonwealth Games 2022) ची सोमवारी सांगता झाली असून ७२ देशातील ५००० हून अधिक थलीट विविध खेळांमध्ये सहभागी झाले होते. भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्य पदकांसह एकूण ६१ पदकांवर देशाचे नाव कोरले. तब्बल ७२ देशातील खेळाडू एका मोठ्या व्यासपीठावर जमल्याने स्पर्धेने अवघ्या जगाला आकर्षित केले होते. मात्र या स्पर्धेतील काही वादांमुळे स्पर्धेला एक वाईट डाग देखील लागला आहे. यातील काही वादांमध्ये भारतीय संघांचा देखील समावेश होता. भारतीय हॉकी महिलांना तर या वादामुळे सुवर्ण पदकाच्या शर्यतीतून बाहेर व्हावे लागले होते. 

ऑस्ट्रेलियाचा खेळाडू कोरोना संक्रमित असतानाही मैदानातभारत आणि ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट सामन्यात एक ऑस्ट्रेलियन खेळाडू कोरोना संक्रमित असताना देखील मैदानात उतरला होता. कोरोना संक्रमित असलेल्या खेळाडूंना खेळण्यास परवानगी नसताना देखील ऑस्ट्रेलियाने रडीचा डाव खेळला. बर्गिंहॅम २०२२ च्या आयोजन समितीने, आयसीसीने, ऑस्ट्रेलिया आणि भारतीय क्रिकेट मंडळांनी ऑस्ट्रेलियन ऑलराउंडर तालिया मॅक्ग्राला कोरोना पॉझीटिव्ह असताना देखील भारताविरूद्धच्या फायनलच्या सामन्यात खेळू दिले. त्यामुळे भारतीय आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या आरोग्यास धोका निर्माण झाला.

महिला हॉकी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा रडीचा डावऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामधील उपांत्येफेरीचा सामना १-१ च्या बरोबरीत समाप्त झाला होता. यानंतर सामन्याचा निकाल ठरवण्यासाठी शूट आऊट सामना खेळवण्यात आला, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने ३-० ने मोठा विजय मिळवून फायनलचे तिकिट मिळवले. लक्षणीय बाब म्हणजे भारताच्या पराभवामध्ये पंचाचा देखील मोठा वाटा राहिला. शूट-आऊटमध्ये भारताने पहिला गोल वाचवला होता, पण नंतर वेळ सुरूच झाली नसल्याचे सांगण्यात आले आणि ऑस्ट्रेलियाला आणखी एक संधी देण्यात आली. यानंतर भारतीय संघ पिछाडीवर गेला. पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे भारताच्या वाघिणींना पराभव पत्करावा लागला होता. यावर विविध स्तरातून टीका करण्यात आली होती. भारतीय संघाचा माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवागने देखील यावर नाराजी व्यक्त केली होती. या पराभवामुळेच भारतीय महिला सुवर्ण पदकाच्या शर्यतीतून बाहेर झाल्या होत्या.

लवलीनाचे प्रशिक्षक ओळखण्यावरून वादबर्गिंहॅम गावात मर्यादीत संख्येने खेळाडूंच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांना आतमध्ये येण्यास परवानगी दिली होती. लवलीना बोरगोहेनचे प्रशिक्षक संध्या गुरूंग यांना यावेळी वेगळी ओळख देण्यात आली, त्यामुळे त्यांना गावामध्ये प्रवेश करू दिला नाही. लवलीनाने मानसिक छळ केल्याचा आरोप करत सोशल मीडियावर हा मुद्दा उपस्थित केला. अखेर बॉक्सिंग संघाचे मुख्य प्रशिक्षक भास्कर भट्ट यांना त्याच्या प्रशिक्षकाला मान्यता द्यावी लागली. 

थलीट्स गाव नसल्याने खेळाडू नाराजबर्गिंहॅम २०२२ च्या आयोजकांकडे सर्व खेळाडूंना सामावून घेण्यासाठी एकही थलीट्स गाव नव्हते. त्यामुळे खेळाडूंना त्यांच्या खेळांच्या आधारे एकूण पाच लहान गावात ठेवण्यात आले. तसेच काही खेळाडूंना हे सोयीचे देखील होते कारण त्यांना गावापासून मैदानापर्यंत जाण्यासाठी जास्त प्रवास करावा लागत नव्हता. खेळाडूंसाठी मोठ्या गावाचे वातावरण पदके जिंकूनही चांगले नव्हते, जे काही खेळाडूंसोबत झालेल्या घटनांमुळे दिसून आले. 

 

टॅग्स :Commonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाEnglandइंग्लंडIndiaभारतGold medalसुवर्ण पदकAustraliaआॅस्ट्रेलियाIndian Women's Cricket Teamभारतीय महिला क्रिकेट संघHockeyहॉकी