शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

टीम इंडियाने मोकळेपणाने खेळावे

By admin | Updated: March 25, 2016 01:59 IST

देवाने आपला वरदहस्तच टीम इंडियावर ठेवला आहे, असेच बुधवारच्या विजयानंतर म्हणावे लागेल. बांगलादेशचा पराभव कल्पनेपलीकडचा होता. ड्रेसिंग रूममध्ये त्यांची टीम नक्कीच

- सौरव गांगुली लिहितो़...

देवाने आपला वरदहस्तच टीम इंडियावर ठेवला आहे, असेच बुधवारच्या विजयानंतर म्हणावे लागेल. बांगलादेशचा पराभव कल्पनेपलीकडचा होता. ड्रेसिंग रूममध्ये त्यांची टीम नक्कीच स्तब्ध झाली असेल. खेळपट्टीवर जम बसलेले दोन फलंदाज असताना तीन चेंडंूत दोन धावा काढता न येणे, हे न पटण्यासारखे आहे. दुसरा चौकार काढल्यानंतर त्यांनी केवळ एकेरी धाव काढायला हवी होती आणि धोनीने केलेल्या क्षेत्ररक्षणाची रचना पाहता ते सहज शक्य होते. त्यामुळे धावसंख्या बरोबरीत आली असती व धोनीला क्षेत्ररक्षकांना जवळ आणणे भाग पडले असते. शेवटच्या चेंडूपर्यंत हिमतीने झुंज दिल्याबद्दल भारतीय संघ, धोनी व पांड्याला विजयाचे श्रेय द्यायलाच हवे. स्पर्धेमध्ये अद्याप भारतीय फलंदाज चमक दाखवू शकलेले नाहीत, हे मात्र मान्य करायलाच हवे. भारताचे सामने जिथे झाले त्या तीनही खेळपट्ट्यांवरील फिरकी आश्चर्यजनक होती. चेंडू फिरकी घेईल, अशा खेळपट्ट्या बनवण्याच्या सूचना दिल्याचा संशय व्यक्त होत आहे, पण त्यात तथ्य नाही. कोलकाताच्या बाबतीत मी ठामपणे सांगतो, की पाऊस पडल्याने अतिरिक्त ओलाव्यामुळे चेंडू फिरकी घेऊ लागला. ग्राउंड्समननी फलंदाजीला पोषक खेळपट्ट्या तयार करण्याच्या अतिउत्साहात कोरड्या खेळपट्ट्या तयार केल्या. त्यामुळे चेंडू इतका वळत होत असल्याचे मला वाटते. बुधवारी भारतीय फलंदाजीचा क्रम तात्पुरत्या स्वरूपाचा होता. रोहित व शिखरच्या फॉर्मबद्दल बरीच चर्चा होती, मात्र माझे मत वेगळे आहे. ते न्यूझीलंड व पाकिस्तानविरुद्ध अपयशी ठरले होते आणि टी-२० क्रिकेटमध्ये असे होत असते. त्यांनी वृत्तपत्र वाचणे बंद करून मुक्तपणे खेळले पाहिजे. कदाचित खेळपट्टीमुळे ते मुक्तपणे खेळू शकत नसतील, पण मोहालीतील चांगल्या खेळपट्टीवर ही स्थिती बदलू शकेल. चांगल्या टणक खेळपट्ट्या फलंदाजांसाठी लाभदायक ठरू शकतील. भारताने विजय खेचून आणला, पण मला त्यांची कामगिरी फारशी प्रभावी वाटली नाही. घरच्या मैदानांवर विश्वचषक खेळणे सोपे नाही, पण काही वेळा चाहत्यांच्या अपेक्षांमुळे कामगिरी उंचावते. त्यामुळे भारताने दबावाखाली न येता खेळाचा आनंद घेतला पाहिजे. या संघात काही उत्तम फटकेबाजी करणारे फलंदाज आहेत, फक्त त्यांनी मोकळेपणाने खेळणे गरजेचे आहे. धोनीने सुरुवातीच्या फळीत फलंदाजीला यावे, असे मत मी अनेकदा व्यक्त केले आहे. तो सहाव्या क्रमांकावर येणे पसंत करतो, मात्र युवराज व रैना अद्याप चौथ्या क्रमांकावर क्षमतेनुसार खेळलेले नसल्याने कदाचित आॅस्ट्रेलियाविरुद्ध धोनीला फलंदाजीच्या क्रमवारीतील स्वत:चे स्थान बदलावे लागेल. कारण मधल्या फळीला प्रोत्साहनाची गरज आहे आणि धोनी भविष्यात पुन्हा सहाव्या क्रमांकावर येऊ शकतो. (गेमप्लान)