शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

३५0 पेक्षा जास्त धावांचा यशस्वी तिसऱ्यांदा पाठलाग

By admin | Updated: January 16, 2017 05:16 IST

भारताने तिसऱ्यांदा ३५0 पेक्षा जास्त लक्ष्याचा यशस्वीपणे पाठलाग केला

पुणे- भारताने तिसऱ्यांदा ३५0 पेक्षा जास्त लक्ष्याचा यशस्वीपणे पाठलाग केला आणि योगायोगाने तिन्ही वेळेस कोहलीने शतक ठोकले. याआधी २0१३ मध्ये भारताने आॅस्ट्रेलियाविरुद्ध जयपूर आणि नागपूर येथे ३५0 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करीत विजय मिळविला.१६ आॅक्टोबर २0१३ मध्ये भारताने जयपूर येथील सामन्यात आॅस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेले ३६0 धावांचे लक्ष्य ४३.३ षटकांत १ बाद ३६२ धावा करीत पूर्ण केले. या सामन्यात रोहित शर्माने १४१ आणि विराट कोहलीने १00 धावा केल्या होत्या.त्याचप्रमाणे नागपूर येथे ३0 आॅक्टोबर २0१३ मध्ये आॅस्ट्रेलियाने दिलेले ३५१ धावांचे टार्गेट भारताने ४९.३ षटकांत पूर्ण केले होते. या लढतीत विराट कोहलीने ११५ व शिखर धवनने १00 धावा केल्या होत्या.वनडे इतिहासात सर्वांत जास्त धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावावर आहे. दक्षिण आफ्रिकेने १२ मार्च २00६ मध्ये आॅस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेले ४३५ धावांचे आव्हान ४९.५ षटकांत ९ गडी गमावून ४३८ धावा करीत पूर्ण केले.>हा विजय अविस्मरणीय आहे. आम्ही साडेतीनशे धावा दिल्या आणि ६३ धावांत आमचे ४ फलंदाज बाद झाले होते. खरं तर त्यावेळीही मी सामना जिंकण्याचा विचार करीत होतो. आम्ही केदारची क्षमता यापूर्वीही पाहिली आहे. तो चांगले फटके मारत होता. मी त्याला सांगितले फक्त आपण फक्त १५0 पर्यंत टिकलो तर विरोधी संघ डगमगेल. केदारने अतिशय उत्तम खेळी केली. मी त्या धावांसाठी खूप पळवले. प्रतिस्पर्धी संघाला आम्हाला दाखवून द्यायचे होते की, आमच्यात विजयाचा विश्वास आहे. - विराट कोहली, कर्णधार भारत>इतकी मोठी धावसंख्या उभी करुनही पराभूत होणे निराशाजनक आहे. ४ बाद ६३ धावा असताना आम्ही वरचढ होतो. पण केदार-विराटने सामना खेचून घेतला, म्हणूनच हा पराभव पचवणे जड जात आहे. -इयोन मोर्गंन, कर्णधार इंग्लंड>देशासाठी विजयी कामगिरी करणे माझ्यासाठी गौरवास्पद आहे. विशेषत: माझ्या शहरात ही कामगिरी झाली. आज या सामन्यासाठी माझे आई, बाबा, पत्नी आणि मुलगी उपस्थित आहेत. त्यांच्या साक्षीने आज हे घडले. कर्णधार कोहलीने मोठया लक्ष्याचा पाठलाग करताना कसे खेळावे याचे उदाहरण अनेकदा घालून दिले आहे. विराटची फलंदाजी नॉन स्ट्रायकर एंडवरुन पाहण्याची संधी मी अनेकदा गमावली आहे. त्याच्यासोबत पळणे खूपच मुश्किल आहे. परंतु यापुढे तयार असेन. -केदार जाधव, सामनावीर>३३८ ही इंग्लंडची भारताविरुध्द सर्वोच्च धावसंख्या होती. २0११ मध्ये बंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर ही धावसंख्या त्यांनी उभारली होती. हा सामना टाय झाला होता.१0५ धावांचा पाऊस इंग्लंडने रविवारी शेवटच्या आठ षटकांत पाडला. यामुळे ५ बाद २४५ वरून इंग्लंडची धावसंख्या ७ बाद ३५0 अशी पोहोचली. ३३ चेंडूंत इंग्लंडच्या बेन स्टोक्सने अर्धशतक केले. भारताविरुध्द इंग्लिश फलंदाजाने केलेले हे सर्वांत जलद अर्धशतक ठरले. यापूर्वी हा विक्रम ओवेश शहा आणि अँड्र्यू फ्लिंटॉपच्या नावावर होता. त्यांनी ३५ चेंडूत अर्धशतक केले होते.