शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
2
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
3
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
4
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
5
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
6
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
7
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
8
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
9
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
10
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
11
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
12
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
13
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
14
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
15
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
16
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
17
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
18
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
19
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
20
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई संघाने काढले पंजाबचे दिवाळे!

By admin | Updated: October 10, 2015 01:07 IST

धमाकेदार फलंदाज श्रेयस अय्यर आणि कर्णधार आदित्य तरेने पंजाबच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत मुंबईने ६ गड्यांच्या मोबदल्यात ४९५ धावांचा डोंगर रचला. श्रेयसने रचलेल्या

मुंबई : धमाकेदार फलंदाज श्रेयस अय्यर आणि कर्णधार आदित्य तरेने पंजाबच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत मुंबईने ६ गड्यांच्या मोबदल्यात ४९५ धावांचा डोंगर रचला. श्रेयसने रचलेल्या द्विशतकी खेळीच्या जोरावर आदित्यने शतकरूपी कळस चढवत मुंबईला ३४१ धावांची मजबूत आघाडी मिळवून दिली.
पहिल्या दिवशीची आक्रमकता श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव या जोडीने दुसऱ्या दिवशीही कायम ठेवत सामन्याला सुरुवात केली. कालच्या २ बाद १०३ धावांवरून पुढे खेळताना या जोडीने पंजाबच्या गोलंदाजांना सळो की पळो केले. पंजाबचा कर्णधार युवराज सिंगने ही जोडी फोडण्याचे खूप प्रयत्न केले खरे, पण श्रेयस-सूर्यकुमारसमोर पंजाबच्या गोलंदाजांची डाळ शिजली नाही. आंध्रविरुद्धच्या सामन्यात श्रेयस मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला, या सामन्यात मात्र त्याने कोणतीही कसर ठेवली नाही. श्रेयसने १७६ चेंडूंत २५ चौकारांच्या साथीने २०० धावा केल्या, त्यात ५ गगनचुंबी षटकारांचाही समावेश होता. विशेष म्हणजे त्याने ११३.६३ च्या धावगतीने या धावा काढल्या.
एका बाजूने श्रेयस चौफेर फटकेबाजी करत असताना दुसऱ्या बाजूने सूर्यकुमार यादवने त्याला सुरेख साथ देत आपले अर्धशतक पूर्ण केले. श्रेयस ऐन रंगात असल्याने सूर्यकुमारने जास्तीत जास्त त्याला खेळण्याची संधी दिली. सुर्यकुमारने १६२ चेंडूंत १० चौकार आणि १ षटकार लगावत ७८ धावांची लयलूट केली. अखेर ५९ व्या षटकात सरबजीत लढ्ढाने ही जोडी फोडली. त्याने सूर्यकुमारला गीतांश खेराच्या हाती झेलबाद केले. त्यानंतर श्रेयसच्या साथीने कर्णधाराने फलंदाजीचा आनंद लुटला. आॅक्टोबर हीट आणि मुंबईकरांची तळपती बॅट पाहून पंजाबचे गोलंदाज पुरते घामाघूम झाले. युवराजला जोरदार फटका लगावण्याच्या प्रयत्नात असणारा श्रेयस ६९ व्या षटकात बाद झाला. तत्पूर्वी श्रेयसने आपली जबाबदारी चोख पार पाडली होती.
आदित्य तरेने सिद्धार्थ लाडच्या साथीने खेळाला सुरुवात केली. ४ बाद ३३८ या भक्कम स्थितीचा फायदा उचलत आदित्यने शतक साजरे केले. सिद्धार्थ बी. सरनच्या अफलातून चेंडूवर बाद झाला. दरम्यान, कर्णधाराच्या साथीने त्याने ७४ धावांची भागीदारी केली. संघाच्या धावसंख्येत १२ धावांची भर घालून अभिषेक नायर (५) ही बाद झाला. दुसऱ्या दिवशीचा खेळ थांबला तेव्हा मुंबईने ६ बाद ४९५ धावा केल्या. आदित्य नाबाद १११ तर धवल कुलकर्णी नाबाद ३० धावांवर खेळत आहे. पंजाबचा बी. सरन वगळता एकाही गोलंदाजाला मुंबईच्या फलंदाजांवर अंकुश ठेवता आला नाही. (क्रीडा प्रतिनिधी)

मुंबई (पहिला डाव) : श्रेयस अय्यर झे. कौल गो. युवराज सिंग २००, सूर्यकुमार यादव झे. खेरा गो. लढ्ढा ७८, सिद्धार्थ लाड झे. खेरा गो. बी.सरन २८, अभिषेक नायर झे. वोहरा गो. बी. सरन ५, आदित्य तरे खेळत आहे १११, धवल कुलकर्णी खेळत आहे ३०. एकूण - ११२ षटकांत ६ बाद ४९५ धावा.
गोलंदाजी : सिद्धार्थ कौल २२-२-८८-१, बी. सरन २२-३-८७-३, वरुण खन्ना २८-४-१२२-०, सरबजीत लढ्ढा २९-१-१५४-१, युवराज सिंग ४-०-१२-१, हिमांशू चावला २-०-६-०, मनदीप सिंग ५-१-१९-०.