शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

आता उत्सुकता प्लेआॅफची

By admin | Updated: May 16, 2017 01:33 IST

आता आयपीएलच्या प्लेआॅफमध्ये खेळणारे चार संघ निश्चित झाले आहेत. नंबर वन मुंबई इंडियन्स विरुद्ध नंबर टू रायझिंग पुणे सुपरजायंट आणि त्यानंतर कोलकाता नाइट रायडर्स - सनरायझर्स हैदराबाद

अयाझ मेमन संपादकीय सल्लागारआता आयपीएलच्या प्लेआॅफमध्ये खेळणारे चार संघ निश्चित झाले आहेत. नंबर वन मुंबई इंडियन्स विरुद्ध नंबर टू रायझिंग पुणे सुपरजायंट आणि त्यानंतर कोलकाता नाइट रायडर्स - सनरायझर्स हैदराबाद या अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकाच्या संघामध्ये एलिमिनेटर लढत होईल. मुंबई आणि पुणे संघांना एक अतिरिक्त संधी मिळेल अंतिम फेरी गाठण्याची. या सामन्यातील पराभूत संघ एलिमिनेटरमधील विजेत्या संघाविरुद्ध अंतिम फेरी गाठण्याच्या उद्देशाने खेळेल. तर, क्वालिफायर १ मधील विजेता संघ थेट अंतिम फेरीत पोहोचेल. एकूणच ही पद्धत मला वाटते खूप चांगली आहे. कारण ज्या प्रकारे मुंबई आणि कोलकाता यांनी सुरुवात केली होती, ते पाहता दोन्ही संघ सहजपणे प्ले आॅफमध्ये प्रवेश करतील. परंतु, कोलकाता अव्वल दोन स्थानांमध्ये नसेल याची अजिबात कल्पना नव्हती. अखेरच्या ३-४ सामन्यांमध्ये त्यांची कामगिरी काही प्रमाणात चांगली झाली नाही. अशा परिस्थितीमध्ये हैदराबादला वर येण्याची संधी मिळाली, तसेच खास करून पुण्याला जबरदस्त संधी मिळाली. पुण्याने मिळालेल्या संधीचे सोने करताना अव्वल दोन स्थानांमध्ये जागा मिळवली. हैदराबाद - कोलकाता सामना दोन्ही संघांसाठी परीक्षा ठरेल. कारण हा सामना बंगळुरूमध्ये होणार आहे. त्याउलट क्वालिफायर १ चा सामना मुंबईसाठी काहीसा फायदेशीर ठरणार आहे, जो त्यांच्या घरच्या मैदानावर वानखेडेवर होणार आहे. पण माझ्या मते अशा निर्णायक क्षणी घरच्या मैदानाचा फायदा वगैरे अशा गोष्टी फार महत्त्वाच्या नसतात. कोणत्या संघामध्ये गुणवत्ता आहे, जिंकण्याची जिद्द किती आहे हे येथे सर्वांत महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे क्वालिफायर १ चा सामना कसा रंगतो याचीच उत्सुकता सध्या रंगली आहे. यंदाच्या सत्रात सर्वांत जास्त कोणत्या संघाने निराश केले असेल, तर ते रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने. गतवर्षी या संघाने उपविजेतेपद पटकावले होते. गेल्या वर्षी या संघाने शानदार प्रदर्शन केले होते. विराट कोहली, ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स, शेन वॉटसन यांनी वर्चस्व राखले होते. हा संघ एक प्रकारे चमत्कारिक होता. कोणताही सामना असो आणि कोणतीही परिस्थिती असो धावा सहजपणे निघत होत्या. तसेच, मिशेल स्टार्क, यजुवेंद्र चहल यांनीही मोलाचे योगदान दिले होते. पण या वर्षी बँगलोर संघाचा एकही स्टार यशस्वी ठरला नाही. अनेक सामन्यांत तर गेलसारख्या विध्वंसक फलंदाजाला राखीव ठेवण्यात आले होते. यावरून खूप काही शिकण्यासारखेही आहे. अनेक मोठे दिग्गज खेळाडू संघात असतील; मात्र ते एकत्रितपणे चमक दाखवत नसतील, संघाला कोणतीही दिशा नसेल, तर मग त्या संघाची वाईट स्थिती होते. काही प्रमाणात हीच अवस्था गुजरात लायन्सचीही झाली आहे. त्यांचा संघ समतोल नव्हता. गुजरातची फलंदाजी जबरदस्त मजबूत होती; मात्र गोलंदाजी खूप कमजोर होती. तसेच गोलंदाजीत फॉल्कनर आणि जडेजा अपयशी ठरले तर नुकसान जास्त होणार होते आणि तसेच झाले. त्यांच्यासाठीही निराशाजनक सांगता झाली. तसेच दिल्लीबाबत सांगायचे झाल्यास, त्यांची फलंदाजी खूप गुणवान होती. परंतु, कामगिरीत सातत्य नव्हते. सर्व युवा भारतीय होते. गोलंदाजीही चांगली होती. पण ज्या सातत्याची आवश्यकता होती ती दिसून आली नाही. हा संघ जेव्हा चांगला खेळला तेव्हा जबरदस्त होता आणि जेव्हा वाईट खेळला तेव्हा अत्यंत वाईट होता. किंग्ज इलेव्हन पंजाबचीही वेगळी गोष्ट नाही. अखेरच्या सामन्यात ज्या प्रकारे त्यांनी सामना गमावला ते आश्चर्यकारक होते. या सामन्याआधी मुंबईविरुद्ध २३० धावांचा एव्हरेस्ट उभारलेला हा संघ पुण्याविरुद्ध ७३ धावांत गडगडला. माझ्या मते यावर वीरेंद्र सेहवागने दिलेली प्रतिक्रिया खूप योग्य आहे की, ‘जे कोणी विदेशी स्टार येथे आले होते ते परिस्थिती किंवा खेळपट्टीला दोष देऊ शकत नाही.’ मुळात हेच मोठे आव्हान असते, जर तुम्ही याच दोन गोष्टींना घाबरत असाल, तर मोठे स्टार असून फायदा काय?