शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
4
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
5
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
6
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
7
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
8
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
9
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
10
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
11
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
12
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
13
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
14
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
15
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
16
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
17
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
18
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
19
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
20
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
Daily Top 2Weekly Top 5

नवीन खेळाडू घडविण्यासाठी व्यवस्थेची गरज

By admin | Updated: November 2, 2015 00:17 IST

दिग्गज टेनिसपटू रमेश कृष्णन डेव्हिस कपमध्ये गेल्या काही वर्षांपासून भारताच्या सातत्यपूर्वक चांगल्या कामगिरीने प्रभावित आहेत;

पुणे : दिग्गज टेनिसपटू रमेश कृष्णन डेव्हिस कपमध्ये गेल्या काही वर्षांपासून भारताच्या सातत्यपूर्वक चांगल्या कामगिरीने प्रभावित आहेत; परंतु संघाला पुढच्या स्तरापर्यंत घेऊन जाऊ शकणारे नवीन खेळाडू घडविणाऱ्या व्यवस्थेची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले.सोमदेव देववर्मन आणि युकी भांबरी यांच्या नेतृत्वाखाली भारत सलग १६ देशांच्या विश्व ग्रुपमध्ये स्थान मिळविण्याचा दावेदार बनत आहे. त्यांनी सप्टेंबर २0१४ मध्ये सर्बिया आणि त्यानंतर एका वर्षाने झेक प्रजासत्ताकसारख्या अव्वल संघांना आव्हान दिले; परंतु पुढे जाण्यात ते अपयशी ठरले.ते म्हणाले की, ‘आम्हाला एकेरीतील चांगल्या खेळाडूची आवश्यकता आहे. डेव्हिस कपमध्ये चार एकेरीचे सामने होतात आणि हे सत्य लपून राहिलेले नाही. विद्यमान खेळाडू कठोर मेहनत घेत आहेत आणि ते त्यांच्या कामगिरीत सुधारणा करीत राहतील; परंतु नवीन खेळाडू घडविणाऱ्या व्यवस्थेची आवश्यकता आहे.’ कृष्णन यांनी १९८७ मध्ये आॅस्ट्रेलियाच्या वॉली मसूर याच्याविरुद्ध पाचवी लढत जिंकताना भारताला डेव्हिस कपमध्ये अंतिम फेरीत पोहोचवले होते. त्यानंतर भारत फायनल्समध्ये पोहोचू शकला नव्हता. युकी व साकेत मयनेनी याची रँकिंग सुधारणे हे चांगले संकेत आहेत; परंतु अजून पल्ला खूप लांब आहे, असे आॅस्ट्रेलिया ओपन १९८९ च्या पहिल्याच फेरीत त्या वेळेसचा नंबर वन खेळाडू मॅट्स विलेंडरवर सनसनाटी विजय नोंदणाऱ्या कृष्णन यांनी म्हटले. कृष्णन यांनी १९८१, १९८७ मध्ये यूएस ओपन आणि १९८६ मध्ये विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला होता. युकी टॉप १00 मध्ये आहे, तर सोमदेव आणि साकेत यांची रँकिंग १६0 ते १८0 यादरम्यान आहे. कृष्णन स्वत: आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम २३ व्या रँकिंगवर पोहोचले होते. कृष्णन यांना डेव्हिस कप कर्णधार म्हणून दुसऱ्या डावास सुरुवात करण्याची इच्छा आहे का, असे विचारले असता त्यांनी याविषयी इच्छा नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, आमच्या जवळ चांगला डेव्हिस कपचा संघ आहे आणि उत्तम कर्णधार आहे. सर्व काही व्यवस्थित आहे. (क्रीडा प्रतिनिधी)