शहरं
Join us  
Trending Stories
1
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
2
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
3
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
4
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
5
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
6
“त्रिभाषा प्रकरणी हरकती नोंदवण्याची मुदत वाढवावी, आडमार्गाने...”; मनसेचे समितीला पत्र
7
Mohammed Shami: "मी तंदुरुस्त आहे आणि..."  ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर शमीने सोडले मौन! 
8
"तू मरणार आहेस का?", रक्ताच्या थारोळ्यात पाहून तैमूरने विचारलेला प्रश्न, सैफने दिलं 'हे' उत्तर
9
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
10
रतन टाटांचा श्वान महिन्याला कमावतो इतके रुपये; एकूण संपत्ती पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही
11
सरकारकडून मदतीच्या नावाने शेतकऱ्यांची फसवणूक, आकडे फुगवून दाखवले- शरद पवार गटाचा आरोप
12
ओबीसी तरुणांच्या जीवाची सरकारला थोडीजरी काळजी असेल तर...; विजय वडेट्टीवार यांचे रोखठोक मत
13
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
14
“महायुती सरकारने राज्यात लाडका गुंड योजना सुरू करावी”; घायवळ प्रकरणावरून वडेट्टीवारांचा टोला
15
VIRAL : अरे देवा! पाठदुखी बळावली म्हणून आजीने ८ जिवंत बेडूक गिळले; पुढे जे झालं…
16
AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात
17
अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
18
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
19
"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
20
अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!

मक्तेदारीवर टाच

By admin | Updated: January 5, 2016 23:52 IST

देशाच्या क्रिकेट नियामक मंडळात वर्षानुवर्षे निर्माण झालेल्या मक्तेदारीवर टाच आणतानाच क्रिकेटच्या सामन्यांवर खेळल्या जाणाऱ्या जुगारास (बेटींग) अधिकृत मान्यता देण्याची

देशाच्या क्रिकेट नियामक मंडळात वर्षानुवर्षे निर्माण झालेल्या मक्तेदारीवर टाच आणतानाच क्रिकेटच्या सामन्यांवर खेळल्या जाणाऱ्या जुगारास (बेटींग) अधिकृत मान्यता देण्याची महत्वपूर्ण शिफारस मंडळाच्या शुद्धिकरणासाठी नियुक्त लोढा समितीने केली असून समितीच्या बव्हंशी शिफारसींवर प्रचंड गोंधळ माजण्याची वा त्यांच्यातील केवळ काहीच स्वीकारल्या जाण्याची दाट शक्यता आहे. देशाचे माजी सरन्यायाधीश राजेन्द्रमल लोढा यांनी मंत्री आणि सरकारी अधिकारी यांना नियामक मंडळाचे दरवाजे कायमचे बंद करण्याची महत्वपूर्ण शिफारस करतानाच पद धारण करण्यावरही कालमर्यादा घालून दिल्यामुळे या क्रीडेशी संबंधित संस्थेला वेटोळे घालून बसलेल्या बव्हंशी प्रतिष्ठितांमध्ये अस्वस्थता पसरण्याची शक्यता आहे. हाच नियम राज्यस्तरीय क्रिकेट संघटनांनादेखील लागू करण्याची शिफारस आहे. शिवाय आणखी एक महत्वाची शिफारस करताना, ज्या क्रिकेट खेळाडूंनीे कसोटी सामने खेळले आहेत, अशांनाच निवड समितीत स्थान दिले जावे, असेही समितीने म्हटले आहे. तरीही सर्वाधिक खळबळ माजणार आहे ती बेटींगला अधिकृत करण्याच्या शिफारसीमुळे. तसे करण्याने खेळातील भ्रष्टाचाराला आळा बसेल अशी समितीची धारणा आहे. जुगारासाठी अधिकृत आणि नोंदणीकृत संस्थाकडेच पैसे लावण्याची सोय उपलब्ध असावी आणि खेळाडू व पदाधिकारी यांना पैसे लावण्याची बंदी असावी असेही समितीला वाटते. गेल्या काही वर्षात क्रिकेट आणि विशेषत: ‘आयपीएल’ क्रिकेट हे जुगाराचे मोठे साधन बनल्याची सातत्याने ओरड होत होती व त्यात अडकून उघडे पडणाऱ्यांची कारकीर्द संपुष्टात येत होती. त्यामुळे जे काम चोरुन मारुन केले जाते, त्याला अधिकृत दर्जा बहाल केल्यास भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार यांना आळा बसू शकेल असा एक सूर काढला जात होता. हाच सूर लोढा समितीने स्वीकारला असावा असे दिसते. पण येथे मद्याचे उदाहरण गैरलागू ठरु नये. सरकारने हातभट्टीच्या दारुला आळा बसावा म्हणून सरकारमान्य देशी दारुच्या निर्मितीचे आणि विक्रीचे परवाने दिले पण त्यातून हातभट्टी बंद झाली, असे काही घडले नाही. तसाच प्रकार येथेही होऊ शकतो. तोच प्रकार सरकारमान्य लॉटरी आणि मटका यांच्याबाबतही लागू पडतो. पण तरीही खरा गोंधळ समितीच्या या शिफारसीमुळे नव्हे तर राजकारण्यांच्या प्रवेश बंदीमुळेच होणार हे उघड आहे.