शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

मक्तेदारीवर टाच

By admin | Updated: January 5, 2016 23:52 IST

देशाच्या क्रिकेट नियामक मंडळात वर्षानुवर्षे निर्माण झालेल्या मक्तेदारीवर टाच आणतानाच क्रिकेटच्या सामन्यांवर खेळल्या जाणाऱ्या जुगारास (बेटींग) अधिकृत मान्यता देण्याची

देशाच्या क्रिकेट नियामक मंडळात वर्षानुवर्षे निर्माण झालेल्या मक्तेदारीवर टाच आणतानाच क्रिकेटच्या सामन्यांवर खेळल्या जाणाऱ्या जुगारास (बेटींग) अधिकृत मान्यता देण्याची महत्वपूर्ण शिफारस मंडळाच्या शुद्धिकरणासाठी नियुक्त लोढा समितीने केली असून समितीच्या बव्हंशी शिफारसींवर प्रचंड गोंधळ माजण्याची वा त्यांच्यातील केवळ काहीच स्वीकारल्या जाण्याची दाट शक्यता आहे. देशाचे माजी सरन्यायाधीश राजेन्द्रमल लोढा यांनी मंत्री आणि सरकारी अधिकारी यांना नियामक मंडळाचे दरवाजे कायमचे बंद करण्याची महत्वपूर्ण शिफारस करतानाच पद धारण करण्यावरही कालमर्यादा घालून दिल्यामुळे या क्रीडेशी संबंधित संस्थेला वेटोळे घालून बसलेल्या बव्हंशी प्रतिष्ठितांमध्ये अस्वस्थता पसरण्याची शक्यता आहे. हाच नियम राज्यस्तरीय क्रिकेट संघटनांनादेखील लागू करण्याची शिफारस आहे. शिवाय आणखी एक महत्वाची शिफारस करताना, ज्या क्रिकेट खेळाडूंनीे कसोटी सामने खेळले आहेत, अशांनाच निवड समितीत स्थान दिले जावे, असेही समितीने म्हटले आहे. तरीही सर्वाधिक खळबळ माजणार आहे ती बेटींगला अधिकृत करण्याच्या शिफारसीमुळे. तसे करण्याने खेळातील भ्रष्टाचाराला आळा बसेल अशी समितीची धारणा आहे. जुगारासाठी अधिकृत आणि नोंदणीकृत संस्थाकडेच पैसे लावण्याची सोय उपलब्ध असावी आणि खेळाडू व पदाधिकारी यांना पैसे लावण्याची बंदी असावी असेही समितीला वाटते. गेल्या काही वर्षात क्रिकेट आणि विशेषत: ‘आयपीएल’ क्रिकेट हे जुगाराचे मोठे साधन बनल्याची सातत्याने ओरड होत होती व त्यात अडकून उघडे पडणाऱ्यांची कारकीर्द संपुष्टात येत होती. त्यामुळे जे काम चोरुन मारुन केले जाते, त्याला अधिकृत दर्जा बहाल केल्यास भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार यांना आळा बसू शकेल असा एक सूर काढला जात होता. हाच सूर लोढा समितीने स्वीकारला असावा असे दिसते. पण येथे मद्याचे उदाहरण गैरलागू ठरु नये. सरकारने हातभट्टीच्या दारुला आळा बसावा म्हणून सरकारमान्य देशी दारुच्या निर्मितीचे आणि विक्रीचे परवाने दिले पण त्यातून हातभट्टी बंद झाली, असे काही घडले नाही. तसाच प्रकार येथेही होऊ शकतो. तोच प्रकार सरकारमान्य लॉटरी आणि मटका यांच्याबाबतही लागू पडतो. पण तरीही खरा गोंधळ समितीच्या या शिफारसीमुळे नव्हे तर राजकारण्यांच्या प्रवेश बंदीमुळेच होणार हे उघड आहे.