शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
3
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
4
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
5
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
6
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
7
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
8
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
9
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
10
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
11
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
12
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
13
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
14
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
15
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ
16
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
17
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
18
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
20
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story

मक्तेदारीवर टाच

By admin | Updated: January 5, 2016 23:52 IST

देशाच्या क्रिकेट नियामक मंडळात वर्षानुवर्षे निर्माण झालेल्या मक्तेदारीवर टाच आणतानाच क्रिकेटच्या सामन्यांवर खेळल्या जाणाऱ्या जुगारास (बेटींग) अधिकृत मान्यता देण्याची

देशाच्या क्रिकेट नियामक मंडळात वर्षानुवर्षे निर्माण झालेल्या मक्तेदारीवर टाच आणतानाच क्रिकेटच्या सामन्यांवर खेळल्या जाणाऱ्या जुगारास (बेटींग) अधिकृत मान्यता देण्याची महत्वपूर्ण शिफारस मंडळाच्या शुद्धिकरणासाठी नियुक्त लोढा समितीने केली असून समितीच्या बव्हंशी शिफारसींवर प्रचंड गोंधळ माजण्याची वा त्यांच्यातील केवळ काहीच स्वीकारल्या जाण्याची दाट शक्यता आहे. देशाचे माजी सरन्यायाधीश राजेन्द्रमल लोढा यांनी मंत्री आणि सरकारी अधिकारी यांना नियामक मंडळाचे दरवाजे कायमचे बंद करण्याची महत्वपूर्ण शिफारस करतानाच पद धारण करण्यावरही कालमर्यादा घालून दिल्यामुळे या क्रीडेशी संबंधित संस्थेला वेटोळे घालून बसलेल्या बव्हंशी प्रतिष्ठितांमध्ये अस्वस्थता पसरण्याची शक्यता आहे. हाच नियम राज्यस्तरीय क्रिकेट संघटनांनादेखील लागू करण्याची शिफारस आहे. शिवाय आणखी एक महत्वाची शिफारस करताना, ज्या क्रिकेट खेळाडूंनीे कसोटी सामने खेळले आहेत, अशांनाच निवड समितीत स्थान दिले जावे, असेही समितीने म्हटले आहे. तरीही सर्वाधिक खळबळ माजणार आहे ती बेटींगला अधिकृत करण्याच्या शिफारसीमुळे. तसे करण्याने खेळातील भ्रष्टाचाराला आळा बसेल अशी समितीची धारणा आहे. जुगारासाठी अधिकृत आणि नोंदणीकृत संस्थाकडेच पैसे लावण्याची सोय उपलब्ध असावी आणि खेळाडू व पदाधिकारी यांना पैसे लावण्याची बंदी असावी असेही समितीला वाटते. गेल्या काही वर्षात क्रिकेट आणि विशेषत: ‘आयपीएल’ क्रिकेट हे जुगाराचे मोठे साधन बनल्याची सातत्याने ओरड होत होती व त्यात अडकून उघडे पडणाऱ्यांची कारकीर्द संपुष्टात येत होती. त्यामुळे जे काम चोरुन मारुन केले जाते, त्याला अधिकृत दर्जा बहाल केल्यास भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार यांना आळा बसू शकेल असा एक सूर काढला जात होता. हाच सूर लोढा समितीने स्वीकारला असावा असे दिसते. पण येथे मद्याचे उदाहरण गैरलागू ठरु नये. सरकारने हातभट्टीच्या दारुला आळा बसावा म्हणून सरकारमान्य देशी दारुच्या निर्मितीचे आणि विक्रीचे परवाने दिले पण त्यातून हातभट्टी बंद झाली, असे काही घडले नाही. तसाच प्रकार येथेही होऊ शकतो. तोच प्रकार सरकारमान्य लॉटरी आणि मटका यांच्याबाबतही लागू पडतो. पण तरीही खरा गोंधळ समितीच्या या शिफारसीमुळे नव्हे तर राजकारण्यांच्या प्रवेश बंदीमुळेच होणार हे उघड आहे.