शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा अधिकार बजावा; राज ठाकरेंनी केले आवाहन
2
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
3
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
4
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
5
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
6
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
7
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
8
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
9
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
11
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
12
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
13
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
15
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
16
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
17
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
18
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
19
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
20
मतदानाच्या आदल्या दिवशी विनोद तावडे-राज ठाकरे भेट; मराठी मतांच्या बेरजेसाठी भेट झाल्याची चर्चा 

कबड्डी खेळण्यासाठी पुन्हा भारतात येणार नाही - पाकिस्तान

By admin | Published: December 21, 2014 8:21 PM

विश्वचषकात भारताकडून पराभव झालेल्या पाकिस्तान संघाने कबड्डी खेळण्यासाठी पुन्हा भारतात येणार नाही असे म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत 
बादल, दि. २१ - विश्वचषकात भारताकडून पराभव झालेल्या पाकिस्तान संघाने कबड्डी खेळण्यासाठी पुन्हा भारतात येणार नाही असे म्हटले आहे. आयोजकांनी पक्षपातीपणा केल्यामुळेच आमचा पराभव झाला असे पाकच्या कबड्डी संघाचे म्हणणे आहे. 
पंजाबमधील बादल येथे नुकताच कबड्डी विश्वचषक पार पडला असून या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये भारताने पाकचा पराभव करत विश्वचषकावर नाव कोरले आहे. मात्र आता भारताच्या विजयापेक्षा पाकिस्तानी खेळाडूंच्या रडगाण्यांमुळेच हा विश्वचषक चर्चेचा विषय ठरला आहे. सामन्याच्या शेवटच्या काही क्षणांपर्यंत पाक संघ ४ गुणांनी पुढे होता. मात्र यानंतर शेवटच्या काही मिनीटांमध्ये भारतीय कबड्डीपटूंनी चमकदार कामगिरी करत पाकवर ४५ - ४२ अशा फरकाने विजय मिळवला. यापराभवानंतर पाकचे कबड्डीपटू मैदानातच रडू लागले. आयोजकांनी पक्षपातीपणा करत नियोजीत वेळेच्या तीन मिनीटांपूर्वीच सामना संपवला असा आरोप पाक संघाचा कर्णधार शफीक चिश्तीने केला आहे. भारतीय खेळाडूंनी अंगाला तेल लावले होते व यामुळे त्यांना पकडता येत नव्हते, तर दुसरीकडे आम्हाला पाणी प्यायचीही संधी दिली जात नव्हती असे चिश्तीने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. पाक संघाचे प्रशिक्षक मलिक सफदर यांनीही चिश्तीच्या सुरात सूर मिसळले आहेत. भारताने खेळ भावनेला धक्का दिला असून आम्ही पुन्हा विश्वचषकासाठी येणार नाही असे सफदर यांनी सांगितले. या स्पर्धेचे आयोजन पंजाब सरकारकडे होते. याविषयी पंजाबचे उपमुख्यमंत्री आणि आयोजन समितीचे सदस्य सुखबीर बादल यांनी पाक खेळाडूंचा आरोप फेटाळून लावला असला तरी आम्ही त्यांच्या आरोपांची चौकशी करु असे बादल यांनी सांगितले.