भारताचे झिम्बाब्वेला १३९ धावांचे आव्हान

By Admin | Updated: June 22, 2016 18:37 IST2016-06-22T18:25:43+5:302016-06-22T18:37:03+5:30

सामन्यात भारताने झिम्बाब्वेला १३९ धावांचे आव्हान दिले आहे. या सामन्यात भारताने २० षटकात सहा बाद १३८ धावा केल्या.

India's Zimbabwean challenge of 139 runs | भारताचे झिम्बाब्वेला १३९ धावांचे आव्हान

भारताचे झिम्बाब्वेला १३९ धावांचे आव्हान

>ऑनलाइन लोकमत
 
हरारे, दि. २२ -  टी-२० सामन्यात भारताने झिम्बाब्वेला १३९ धावांचे आव्हान दिले आहे.  या सामन्यात भारताने २० षटकात सहा बाद १३८ धावा केल्या. 
भारताकडून फलंदाज केदार जाधवने सर्वाधिक जास्त धावा केल्या. त्याने ४२ चेंडूत एक षटकार आणि सात चौकार लगावत ५८ धावा कुटल्या. तर, के एल राहुलने २२ धावा केल्या. मनदीप सिंह अवघ्या चार धावा काढून तंबूत परतला. अंबाती रायडू (२०) , मनीष पांडे (०), महेंद्रसिंग धोणी (९), अक्षर पटेल नाबाद (२०) आणि धवल कुलकर्णीने नाबाद १ धावा केल्या.  
झिम्बाब्वेकडून गोलंदाज डोनाल्ड तिरिपानोने तीन बळी घेतले. तर, नेविल मादजिवा आणि क्रेमर यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.
 

Web Title: India's Zimbabwean challenge of 139 runs