शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

तर भारत उपांत्य फेरीत...

By admin | Updated: March 24, 2016 17:09 IST

बांगलादेशच्या तोंडातील विजयाचा घास हिसकावून घेत एका धावेने विजय मिळवला असला तरी भारताचे उपांत्य फेरीतील स्थान अद्याप फिक्स झालेलं नाही. टी २० विश्वचषक अंतिम टप्यात आलेला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - शेवटच्या क्षणापर्यंत रोमहर्षक झालेल्या सामन्यात धोनी ब्रिगेडने झुंझार वृत्तीचे प्रदर्शन करीत बांगलादेशच्या तोंडातील विजयाचा घास हिसकावून घेत एका धावेने विजय मिळवला असला तरी भारताचे उपांत्य फेरीतील स्थान अद्याप फिक्स झालेलं नाही. टी २० विश्वचषक अंतिम टप्यात आलेला आहे. प्रत्येक सामना रंगतदार होत आहे.
 
१० संघापैकी न्युझीलंड संघ उपांत्य फेरीत धाकल झाला आहे. ब गटात अतिशय चुरशीचे सामने चालू आहेत. ब गटातील भारत, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघाला उपांत्या फेरीत जाण्याच्या संधी आहे. भारताचे ३ सामने झाले आहेत. त्यापैकी २ सामने जिंकून ब गटात दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे.
उपांत्यासामन्यासाठी काही महत्वाच्या बाबीवर टाकलेली एक नजर
 
- भारत सध्या पॉईंटटेबलमध्ये चार गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. मात्र त्यांचा रनरेट -०.५५ इतका आहे. यापुढील दोन सामने भारतासाठी महत्त्वाचे आहेत. पहिला म्हणजे ऑस्ट्रेलिया वि पाकिस्तान आणि त्यानंतर भारत वि ऑस्ट्रेलिया.
- शुक्रवारी पाकिस्तानचा सामना ऑस्ट्रेलियाशी होतोय. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवल्यास त्यांचे भारताइतकेच चार गुण होतील. त्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढत महत्त्वाची असेल. हा सामना बरोबरीत सुटल्यास रनरेटच्या आधारावर ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये जाईल. 
- समजा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवल्यास त्यांचेही गुण ४ होतील. तसेच त्यांचा रनरेटही चांगला आहे. त्यांचा सध्याचा रनरेट ०.२५ आहे तर भारताचा -०.५५ इतका आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना पाकिस्तान जिंकल्यास त्यांचा रनरेटही सुधारेल. दुसरीकडे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दोघांसाठी सामना जिंकणे महत्त्वाचे असेल. भारत या सामन्यात जिंकल्यास त्यांच्यासाठी सेमीफायनलेच दरवाजे उघडतील मात्र दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला केवळ विजय मिळवून चालणार नाही तर मोठ्या फरकाने त्यांना विजय मिळवावा लागेल. ऑस्ट्रेलिया - भारत यांच्यात सामना झाला नाही तर भारताचे ५ गुण होतील. 
- समजा पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्याती सामना न झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक-एक गुण मिळतील. ऑस्ट्रेलियाचे तीन गुण होतील. त्यानंतर भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील मुकाबला महत्त्वाचा असेल. मात्र भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यातही सामना होऊ शकला नाही तर पुन्हा दोन्ही संघांना एक एक गुण मिळेल. भारताचे यानंतर पाच गुण होतील.
- जर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून हरल्यास तर त्यांचे चार गुण राहतील. मात्र ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध विजय मिळवला आणि पाकिस्तानविरुद्ध त्यांचा पराभव झाल्यास त्यांचेही चार गुण राहतील. तसेच पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला हरवल्यास त्यांचेही ४ गुण होतील. यावेळी रनरेटद्वारे भारत, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यापैकी एक संघ सेमीफायनलमध्ये पोहोचेल
- ऑस्ट्रेलियाचे दोन सामने शिल्लक आहेत. एक भारताविरुद्ध आणि दुसरा पाकिस्तानविरुद्ध. हे दोन्ही सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले, तर ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत जाईल आणि भारत स्पर्धेबाहेर.