शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

कुस्तीत शिस्त नसेल तर खेळ वाढेल कसा?

By admin | Updated: January 12, 2016 04:45 IST

‘मल्ल तितुका मेळवावा, मल्ल धर्म वाढवावा’ हे ब्रीद कुस्तीच्या विकासासाठी आणि मल्लांना स्फुरण चढण्यासाठी नेहमी वापरले जाते. या म्हणीचा अर्थ मात्र आचरणात येताना दिसत नाही.

नागपूर : ‘मल्ल तितुका मेळवावा, मल्ल धर्म वाढवावा’ हे ब्रीद कुस्तीच्या विकासासाठी आणि मल्लांना स्फुरण चढण्यासाठी नेहमी वापरले जाते. या म्हणीचा अर्थ मात्र आचरणात येताना दिसत नाही. कुस्तीचे संघटक आणि आयोजक एकसंध नसल्याने शिस्त हा प्रकार अभावानेच दिसतो. शिस्त नसेल तर खेळ वाढेल कसा?नागपुरात संपलेल्या ५९व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या निमित्ताने हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. मातीवरची कुस्ती मॅटवर, नियम बदलले; पण आचरणात आणावयाच्या काही गोष्टी बदललेल्या नाहीत. महाराष्ट्राच्या मल्लांकडून आॅलिम्पिकमध्ये कुस्तीचे पदक मिळविण्याची आशा वेळोवेळी धरली जाते. हे मल्ल आॅलिम्पिकचा पल्ला गाठावेत, यासाठी राजाश्रयाची मागणी राजदरबारी केली जाते. सरकारकडून कुस्तीला ज्या प्रकारे सहकार्य मिळावे ते मिळायला उशीर होत आहे हे खरे; पण आपल्यात काही उणिवा आहेत आणि त्या आपणच दूर करू शकतो, हे शहाणपण कुस्ती चालविणाऱ्यांनी का शिकू नये? जुना इतिहास आठवत पुढे जाणे हे क्रमप्राप्त असले तरी नवा इतिहास घडविण्यासाठी मल्लांना शिस्त लावणे आवश्यक आहे. महाराष्ट्र केसरीसारख्या स्पर्धेत शिस्तीचा अभाव वर्षानुवर्षे कायम आहे. स्पर्धा आली की उणिवांवर मीडियातून टीका होते. ही टीका सकारात्मक घेऊन पुढच्या वर्षी चुका सुधारण्यावर मात्र भर दिला जात नाही.नागपुरातही हेच घडले. कुस्तीत डोपिंगची मागणी जुनी आहे. त्यावर कुणी विचार करीत नाही. खर्चिक काम असल्याचे सांगून त्याकडे डोळेझाक केली जाते. नागपुरात दोन मल्ल इंजेक्शन घेताना पकडण्यात आल्याचे वृत्त धडकल्याने कुस्तीत असेच घडत असावे, असा क्रीडाप्रेमींचा समज झाला. हा समज खोटा ठरविण्यासाठी कुस्ती आयोजकांनी कायम उपाययोजना करण्याची गरज आहे. कुस्तीच्या हौदाभोवताल नको तितकी गर्दी होत होते. आॅलिम्पिक कुस्तीत मल्लासोबत केवळ कोच येतो. हीच बाब राज्य कुस्तीतही का लागू होऊ नये. पाठीराख्यांचा हौदात होणारा गोंधळ, त्यातून घडणारे हाणामारीचे प्रकार टाळता येऊ शकतील. अधिकाऱ्यांच्याच उपस्थितीत कुस्ती झाल्यास मल्लांना शिस्त लागेल.एकाच वेळी ध्वनिक्षेपकावरून वेगवगळ्या घोषणा होतात. पुकारा होऊनही मल्ल हौदात पोहोचत नाहीत. मल्ल आणि त्यांचे वजनगट, जिल्हा, पूर्व इतिहास ही माहिती मीडियाला कधीच दिली जात नाही. मोक्याच्या लढतीत मल्ल गैरहजर असणे, हे आयोजकांचे अपयशच. कुस्ती शिस्तप्रिय करण्यासाठी कुस्तीगीर परिषदेने स्वत:ला शिस्त लावणे काळाची गरज आहे. (क्रीडा प्रतिनिधी)