शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

को‘होली’ है !

By admin | Updated: March 20, 2016 04:34 IST

कोणत्याच वर्ल्डकपमध्ये भारताविरोधात न जिंकू शकणाऱ्या पाकिस्तानला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. हाय व्होल्टेज सामन्यात भारताने पाकवर ६ गडी

पाकिस्तानचा धुव्वा : भारताचा सहा गड्यांनी विजयकोलकाता : कोणत्याच वर्ल्डकपमध्ये भारताविरोधात न जिंकू शकणाऱ्या पाकिस्तानला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. हाय व्होल्टेज सामन्यात भारताने पाकवर ६ गडी राखून विजय मिळविला.ऐतिहासिक ईडन गार्डनवर दिग्गजांच्या उपस्थितीत सायंकाळी हजारो चाहत्यांच्या साक्षीने रंगलेल्या प्रत्येकी १८ षटकांच्या हायव्होल्टेज लढतीत भारतीय फलंदाजांनी सामना एकतर्फी ठरविला. नाणेफेक जिंकून भारताने क्षेत्ररक्षण घेतले. पाकला १८ षटकांत ५ बाद ११८ धावांत रोखल्यानंतर भारताने १५.५ षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात ११९ धावा करीत सामना जिंकला. विराट कोहलीने ३७ चेंडूत सात चौकार आणि एका षटकारासह नाबाद ५५ धावा ठोकल्या. कर्णधार धोनी १३ धावांवर नाबाद राहिला. सुरुवातीला झालेली पडझड युवराज- विराट कोहली यांनी थोपविली. या दोघांनी ७.२ षटकांत चौथ्या गड्यासाठी ६१ धावांची भागीदारी करीत संघाला विजयी पथावर आणले. या मैदानावर भारताने पाकचा टी-२० त पराभव केला नव्हता. आज ही परंपरा मोडित निघाली. अमिताभचे राष्ट्रगीत...सुरुवातीला महानायक अमिताभ बच्चन यांनी हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने भारताचे तसेच पाकचा गायक शफाकत अमानत याने पाकचे राष्ट्रगीत गायले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची विशेष उपस्थिती होती. अमिताभ यांनी आमंत्रणाबद्दल सौरव गांगुलीचे आभार मानून भारत- पाकमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी याबद्दल शुभेच्छाही दिल्या.दिग्गजांचा गौरव...क्रिकेटमध्ये योगदान देणाऱ्या आठ माजी दिग्गजांचा बंगाल क्रिकेट संघटनेतर्फे मुख्यमंत्री ममतादीदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुनील गावस्कर, कपिल देव, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, पाकचे इंतिखाब आलम, इम्रान खान, वकार युनूस, वसीम अक्रम यांच्यासह माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागचा देखील कॅबद्वारे विशेष सन्मान करण्यात आला. पंतप्रधानांकडून कौतुक...भारतीय संघाच्या विजयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. देशभरात विजयाची होळी!भारताच्या विजयाचा आनंद देशभरात होलिकोत्सवाच्या रुपाने साजरा करण्यात आला. क्रिकेट चाहत्यांसोबत सामान्य नागरिकांनी भारताचा विजय साजरा होताच फटाके फोडून, तिरगा फडकवित आणि गुलला उधळून जल्लोष केला. मुंबईकरांनी केला विराट विजयोत्सव...भारताने कट्टर पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ६ गडी राखून धुव्वा उडवताच मुंबईकरांनी अक्षरश: दिवाळी साजरी केली. नाक्यानाक्यावर आणि चौकात फटाके वाजवून मुंबईकरांनी हा विजयोत्सव साजरा केला तसेच मिठाईही वाटून आनंद द्विगुणित केला. शनिवारचा दिवस क्रिकेटप्रेमींनी भारत-पाकिस्तानसाठी खास राखून ठेवला होता. विविध ठिकाणी मोठ्या स्क्रिनवर सामन्याच्या थेट प्रक्षेपणाची चोख व्यवस्था करण्यात आली होती. सोशल मीडियामध्येही मॅचसंबंधी चर्चेला उधाण आले होते. 1,200कोटींचा सट्टामुंबई : भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगला असतानाच बुकींनी या सामान्यासाठी तब्बल १ हजार २०० कोटींचा सट्टा लावला होता. कोण जिंकणार? या उत्सुकतेपोटी प्रत्येकाचे श्वास रोखले गेले असतानाच दुसरीकडे जोरदार सट्टाही लावला जात होता. सामना सुरू असताना पहिल्या डावावेळी भारतासाठी १ रुपयाला ७० पैसे असा भाव होता. तर पाकिस्तानसाठी १ रुपयाला अडीच रुपये असा भाव होता. भारताची फलंदाजी सुरू झाल्यावर दोन गडी बाद झाले असता सट्ट्याच्या दरात बदल झाले. आणि हा भाव १ रुपयांसाठी ९५ पैसे एवढा झाला, अशी माहिती सूत्रांनी दिली.