शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

परफेक्ट ‘टेन’सह भारताची मालिकेत बरोबरी

By admin | Updated: June 21, 2016 02:17 IST

भारताने सोमवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेचा १० गडी व ४१ चेंडू राखून पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.

हरारे : बरिंदर सरन (४-१०) व बुमराह (३-११) यांच्या भेदक माऱ्यानंतर मनदीप सिंग (नाबाद ५२ धावा, ४० चेंडू, ६ चौकार, १ षटकार) व के. एल. राहुल (नाबाद ४७ धावा, ४० चेंडू, २ चौकार, २ षटकार) यांच्या चमकदार फलंदाजीच्या जोरावर भारताने सोमवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेचा १० गडी व ४१ चेंडू राखून पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. भारताने झिम्बाब्वेचा डाव ९ बाद ९९ धावांत रोखला आणि विजयासाठी आवश्यक धावा १३.१ षटकांत गडी न गमावता पूर्ण केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना मनदीप व के. एल. राहुल यांनी सलामीला १०३ धावांची अभेद्य भागीदारी करीत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याआधी, वेगवान गोलंदाज बरिंदर सरन (१० धावांत ४ बळी) आणि जसप्रीत बुमराह (११ धावांत ३ बळी) यांच्या भेदक माऱ्यापुढे झिम्बाब्बेचा डाव ९ बाद ९९ धावांत रोखला गेला.पदार्पणाची लढत खेळणारा वेगवान गोलंदाज सरनने भारतातर्फे टी-२० क्रिकेटमध्ये दुसरी सर्वोत्तम कामगिरी करताना ४ षटकांत १० धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. आॅफ स्पिनर रविचंद्रन आश्विनच्या नावावर टी-२० मध्ये ८ धावांत ४ बळींची नोंद आहे. हा भारतीय विक्रम आहे. सरनने डावाच्या पाचव्या षटकात झिम्बाब्वेच्या तीन फलंदाजांना बाद केले. एकाच षटकात तीन फलंदाजांना बाद करणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला. यापूर्वी अशी कामगिरी अशोक डिंडाने केली आहे. सरनने या षटकात हेमिल्टन मस्कादजा (१०), सिकंदर रजा (१) आणि टीनोतेंदा मुतोमबोद््जी (०) यांना बाद केले. सरनने झिम्बाब्वेचा सलामीवीर चामू चिभाभा (१०) याला तिसऱ्या षटकात बाद केले होते. सरनने आघाडीच्या पाचपैकी चार फलंदाजांना माघारी परतवले. (वृत्तसंस्था) विजयाचे श्रेय गोलंदाजांना : धोनी

हरारे : कर्णधार महेंद्रसिंह धोनी सोमवारी गोलंदाजांच्या कामगिरीवर खूश होता. गोलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर भारताने सोमवारी खेळलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यांत झिम्बाब्वेचा १० गडी राखून पराभव केला. धोनी म्हणाला, ‘‘हा शानदार विजय आहे. गोलंदाजांनी विजयाची मजबूत पायाभरणी केली होती. आमच्यासाठी सुरुवात महत्त्वाची होती. गोलंदाजांनी अचूक मारा केला. या खेळपट्टीवर तिसरी लढत असल्यामुळे मला चिंता सतावत होती. आम्ही नाणेफेकीचा कौल मिळवला असता, तर फलंदाजी स्वीकारली असती. ’’तो पुढे म्हणाला, ‘‘गोलंदाजांच्या कामगिरीला क्षेत्ररक्षकांची योग्य साथ लाभली. टी-२० क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण चांगले होणे महत्त्वाचे असते.’’ १० धावांच्या मोबदल्यात चार बळी घेणारा सरन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. सरन म्हणाला, ‘‘चेंडू स्विंग होत होता. कुठलेच दडपण नव्हते. मी वेगापेक्षा चेंडू स्विंग करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले. खेळपट्टी गोलंदाजीला अनुकूल होती.’’ पराभूत संघाचा कर्णधार क्रेमर म्हणाला, ‘‘आमची सुरुवात संथ झाली आणि मोक्याच्या क्षणी आम्ही विकेट गमावल्या. मालिकेत शानदार सुरुवातीनंतर हे निराशाजनक होते. खेळपट्टी थोडी वेगळी होती. केवळ ९९ धावा फटकाविल्यानंतर पराभव स्पष्ट दिसत होता. बुधवारी अंतिम लढत होणार असून, मालिका जिंकण्याची संधी आहे.’’ वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी आणि फिरकीपटू युजवेंद्र चहल यांनी अनुक्रमे ३२ व १९ धावांच्या मोबदल्यात प्रत्येकी एक बळी घेतला. बुमराहने झिम्बाब्वेतर्फे सर्वाधिक ३१ धावा करणाऱ्या पीटर मूर याला १५ व्या षटकात माघारी परतवले. त्यानंतर १७ व्या षटकात एल्टन चिगुम्बुरा (८) व नेव्हिल मद््िजव्हा (१) यांना बोल्ड केले. कुलकर्णीने कर्णधार ग्रीम क्रेमर (४) व चहलने मॅल्कम वॉलरला (१४) तंबूचा मार्ग दाखवला. डोनाल्ड तिरिपानो ११ धावा काढून नाबाद राहिला. मूरने ३२ चेंडूंना सामोरे जाताना २ चौकार व १ षटकार ठोकला. पहिला टी-२० सामना जिंकणाऱ्या झिम्बाब्वे संघाला सरनच्या एका षटकातील तीन धक्क्यानंतर सावरता आले नाही. त्यांचा डाव ९ बाद ९९ धावांत रोखल्या गेला. भारताचा ‘यॉर्कर मॅन’ बुमराहने चार षटकांत ११ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. त्याने १७व्या षटकात दोन फलंदाजांना क्लीनबोल्ड केले. धावफलकझिम्बाब्वे :- सी. चिभाभा झे. रायडू गो. सरन १०, एच. मसाकाजा त्रि. गो. सरन १०, पी. मूर झे. पटेल गो. बुमराह ३१, एस. रजा झे. राहुल गो. सरन ०१, सी. मुतोम्बोजी पायचीत गो. सरन ००, एम. वालेर झे. पटेल गो. चहल १४, एल्टन चिगुम्बुरा त्रि.गो. बुमराह ०८, ए. क्रेमर झे. रायडू गो. कुलकर्णी ०४, एन. मेडजिव्हा त्रि. गो. बुमराह ०१, डी. तिरिपानो नाबाद ११, टी. मुजाराबानी नाबाद ००. अवांतर (९). एकूण २० षटकांत ९ बाद ९९. बाद क्रम : १-१४, २-२६, ३-२८, ४-२८, ५-५७, ६-७५, ७-८१, ८-८३, ९-९१. गोलंदाजी : सरन ४-०-१०-४, कुलकर्णी ४-०-३२-१, पटेल ४-०-२३-०, चहल ४-१-१९-१, बुमराह ४-०-११-३.भारत :- के. एल. राहुल नाबाद ४७, मनदीप नाबाद ५२. अवांतर (४). एकूण १३.१ षटकांत बिनबाद १०३. गोलंदाजी : तिरिपानो ३-०-११-०, मेडजिव्हा २.१-०-१९-०, मुजाराबानी २-०-१७-०, क्रेमर ३-०-२४-०, चिभाभा २-०-२३-०, रजा १-०-९-०.