शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईचे पहिल्या दिवसावर वर्चस्व

By admin | Updated: February 7, 2015 01:36 IST

रणजी करंडक स्पर्धेतील आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत असलेल्या मुंबईने गुरुवारपासून वानखेडे स्टेडियमवर सुरू झालेल्या लढतीत झोकात सुरुवात केली.

मुंबई : रणजी करंडक स्पर्धेतील आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत असलेल्या मुंबईने गुरुवारपासून वानखेडे स्टेडियमवर सुरू झालेल्या लढतीत झोकात सुरुवात केली. कर्णधार आदित्य तरे, सिद्धेश लाड व निखिल पाटील या त्रिकूटाने कर्नाटकच्या गोलंदाजांना सडेतोड उत्तर देत दिवसअखेर यजमानांना ५ बाद ३४२ धावांची मजल मारून दिली. लाड (९४) आणि पाटील (८५) नाबाद असल्यामुळे मुंबईला धावांचा डोंगर उभा करण्याची संधी आहे. ४० वेळा रणजी करंडक पटकावणाऱ्या मुंबईला यंदा साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यात घरच्या मैदानावरील कामगिरी पाहता कर्नाटकविरुद्ध त्यांचा चांगलाच कस लागेल हे निश्चित होते. अशा आव्हानात्मक परिस्थितीत मुंबईचा कर्णधार आदित्य तरे याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा धाडसी निर्णय घेतला. पहिल्याच षटकात सलामीवीर श्रीदीप मंगेला याला विनय कुमारने बाद करून यजमानांना जबरदस्त धक्का दिला. त्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यर याने तरेसह दुसऱ्या विकेटसाठी संयमी खेळी करून संघाला सावरले. दोन्ही खेळाडू सेट झालेले वाटत असतानाच विनय कुमारने अय्यरला बाद करून ४९ धावांची भागीदारी संपुष्टात आणली. नेतृत्वाची जबाबदारी खांद्यावर पडल्यानंतर तरेची फलंदाजी आणखीनच बहरली. एका बाजूने संयमी खेळ करीत तरेने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने अभिषेक नायरसह तिसऱ्या विकेटसाठी ७५ धावांची भागीदारी करून संघाला शतकी पल्ला गाठून दिला, परंतु दुखापतीतून सावरलेल्या नायरला उदीत पटेलने माघारी धाडले. नायरच्या विकेटनंतर मुंबईला गळती लागली. सूर्यकुमार यादव पटेलच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. सेट झालेल्या तरेही ९२ चेंडूंत १५ चौकारांसह ७२ धावा करून श्रेयस गोपालच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यामुळे मुंबईचा डाव गडगडतो की काय, असा प्रश्न निर्माण झाला, परंतु सिद्धेश लाड व निखिल पाटील या जोडीने कर्नाटकच्या गोलंदाजांचा घामटा काढला. या जोडीने धावफलक हलता ठेवून मुंबईची सामन्यावरील पकड मजबूत केली. त्यांनी सहाव्या विकेटसाठी ३९.५ षटकांत १७५ धावांची भागीदारी करून संघाला मजबूत स्थितीत आणले. लाडने ११९ चेंडूंत १८ चौकार मारून नाबाद ९४ धावा, तर पाटीलने १२९ चेंडूंत ११ चौकार व २ षटकार खेचून नाबाद ८५ धावा केल्या. संक्षिप्त धावफलकमुंबई : मंगेला झे. उथप्पा गो. विनय ४, तरे झे. समर्थ गो. गोपाल ७२, अय्यर झे.गौतम गो. विनय २०, नायर झे. पांडे गो. पटेल ३६, यादव पायचीत गो. पटेल १९, लाड नाबाद ९४, पाटील नाबाद ८५.अवांतर - १२; एकूण - ९० षटकांत ५ बाद ३४२ धावागोलंदाज : विनय कुमार १७-४-६५-२, मिथुन १५-५-५२-०, गोपाल १४-१-७१-१, अरविंद २१-२-७३-०, पटेल २२-१-६८-२, समर्थ १-०-२-०.अंतिम लढत मुंबईतमुंबई : वानखेडे स्टेडियमवर रणजी करंडक स्पर्धेची अंतिम लढत रंगणार असून, उपांत्य फेरीचे सामने कोलकाता व बंगळुरू येथे खेळविण्यात येणार असल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांकडून समजते. स्पर्धेची अंतिम लढत ८ ते १२ मार्च या कालावधीत होणार असून, उपांत्य फेरीच्या लढती २७ फेब्रुवारी ते १ मार्चला रंगतील. बीसीसीआयच्या माहितीनुसार उपांत्यपूर्व फेरीचे सामने कटक, इंदोर, लाहली आणि जयपूर येथे होतील.