शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

Champions Trophy : या पाच कारणांसाठी बांगलादेशचा संघ भारतासाठी धोकादायक

By admin | Updated: June 15, 2017 11:04 IST

यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत अनेक धक्कादायक निकालांची नोंद झाली आहे. बांगलादेशच्या तुलनेत भारताचा संघ सर्वच आघाडयांवर सरस असला तरी...

 ऑनलाइन लोकमत 

बर्मिंगहॅम, दि. 15 - यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत अनेक धक्कादायक निकालांची नोंद झाली आहे. बांगलादेशच्या तुलनेत भारताचा संघ सर्वच आघाडयांवर सरस असला तरी, आपल्याला काही गोष्टींसाठी बांगलादेशपासून संभाळून राहण्याची गरज आहे. 
 
1) श्रीलंकेचा भारतावर विजय, बांगलादेशची न्यूझीलंडवर मात तसेच पाकिस्तानचा इंग्लंडवर विजय या निकालांनी क्रिकेट पंडितांचे अंदाज चुकवले. त्यामुळे आज बांगलादेश विरुद्ध होणा-या सामन्यात भारताचे पारडे जड असेल तरी भारतच जिंकेल असे छातीठोकपणे म्हणता येणार नाही. 
 
2)  2007 वर्ल्डकपमध्ये बांगलादेशने भारताला पराभूत करुन संपूर्ण क्रिकेट जगताला धक्का दिला. त्यामुळे वर्ल्डकपमधील भारताची वाटचाल साखळीतच संपली. 2015 च्या वर्ल्डकपमध्ये बांगलादेश विरुद्धच्या उपांत्यपूर्वफेरीच्या सामन्यातही रोहित शर्माला बाद न देण्याचा निर्णयही बराच वादग्रस्त ठरला होता. त्यावेळी रोहित बाद झाला असता तर, भारताचा डाव अडचणीत सापडला असता. 2015 मध्ये भारत-बांगलादेशमध्ये झालेल्या एकदिवसीय मालिकेत बांगलादेशने 2-1 ने विजय मिळवला होता. 2016 च्या टी-20 वर्ल्डकपमध्येही भारताने बांगलादेशवर अवघ्या 1 रन्सने विजय मिळवला होता. 
 
आणखी वाचा 
 
3)  चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहित शर्मा आणि शिखर धवन या दोन्ही सलामीवीरांनी भारताला चांगली सुरुवात करुन दिली असली तरी, त्यांना पहिल्या पावरप्लेचा फायदा उचलता आलेला नाही. पहिल्या दहा षटकात भारताने पाकिस्तान विरुद्ध 46, श्रीलंके विरुद्ध 48 आणि दक्षिण आफ्रिके विरुद्ध 35 धावा केल्या. 
 
4) कॅचेस विन मॅचेस म्हटले जाते. उपांत्यफेरीच्या महत्वाच्या सामन्यात झेल सोडणे भारताला परवडणारे नाही. पाकिस्तान विरुद्ध केदार जाधवने, हार्दिक पांडयाने कुशल मेंडिस, हाशिम आमला यांचे झेल सोडले होते. भारताला क्षेत्ररक्षणातही आणखी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. 
 
5) आर. अश्विनचा संघात समावेश झाला असला तरी, एक वेगवान गोलंदाज कमी झाला आहे. अश्विनच्या समावेशाने फलंदाजीत फायदा होणार असला तरी, हाणामारीच्या षटकात फटका बसू शकतो. कमी धावसंख्येचा आपण बचाव करु शकतो ? या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. कारण चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतावर अजून अशी वेळ आलेली नाही.