शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय
2
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये
3
Top Marathi News Live: विजय यांची बहुमत जुळवण्यासाठी धडपड, आणखी एका पक्षाला पाठवले पत्र
4
प. बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण
5
Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा...
6
कधीकाळी सचिन तेंडुलकरसोबत टीम इंडियात केले पर्दापण; आज मानसिक आजाराशी लढतोय 'हा' खेळाडू
7
अनिल परब यांची राज्यभर गाजलेल्या दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणातून निर्दोष मुक्तता
8
चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले...  
9
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
10
राज्य सरकारचा विभाग शक्तिपीठ महामार्गाची माहिती देत नाही- राजू शेट्टी यांचा आरोप
11
सुनेत्रा पवार यांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? येवल्याची सूत्रे समीर भुजबळांकडे जाण्याची चर्चा
12
Manoj Tiwari : "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र
13
Numerology: प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाच्या कामाला जाताना मूलांकानुसार 'हे' रंग टाळा!
14
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
15
धक्कादायक! १५ वर्षीय मुलीवर वडील अन् मामाकडून अत्याचार; नात्याला काळीमा फासणारी घटना उघड
16
सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
17
"आता पत्नी बाहेर गेली तर काळजी वाटत नाही", ३० वर्षे दिल्लीत राहिलेल्या माणसाचा व्हिडीओ व्हायरल
18
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
19
‘दिल्लीविरोधात लढ्याची घोषणा करा, १७ कोटी मुस्लिम साथ देतील’, या नेत्याने ममतांना दिली चिथावणी
20
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या इशाऱ्यावर नाचते बीसीसीआय

By admin | Updated: October 28, 2015 22:25 IST

बीसीसीआय सरकारच्या इशाऱ्यांवर चालणारे बोर्ड असून, राज्यकर्त्यांच्या परवानगीनंतरच भारतीय क्रिकेटचे सर्व निर्णय घेतले जात असल्याची टीका पाकचा माजी कर्णधार जावेद मियॉँदाद याने केली आहे.

लाहोर : बीसीसीआय सरकारच्या इशाऱ्यांवर चालणारे बोर्ड असून, राज्यकर्त्यांच्या परवानगीनंतरच भारतीय क्रिकेटचे सर्व निर्णय घेतले जात असल्याची टीका पाकचा माजी कर्णधार जावेद मियॉँदाद याने केली आहे.
भारत- पाकदरम्यान द्विपक्षीय मालिका पूर्ववत करण्यासंदर्भात बीसीसीआयने घेतलेल्या भूमिकेवर मियॉँदाद नाराज आहेत. बोर्डाचे सचिव अनुराग ठाकूर यांच्या अलीकडच्या वक्तव्याचा संदर्भ देत मियॉँदाद म्हणाले, की बीसीसीआय सरकारच्या इशाऱ्यावर नाचते. खरेतर याला क्रिकेट बोर्ड नव्हे, सरकारी बोर्ड संबोधायला हवे. अन्य क्रिकेट बोर्डांसोबत भारताची वागणूक खराब आहे. ही बीसीसीआयच्या पतनाची सुरुवात आहे.
पीसीबी प्रमुख शहरयार खान अलीकडेच भारत दौऱ्यावर आले. त्यांना बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर यांच्यासोबत मालिकेसंदर्भात चर्चा करायची होती, पण शिवसैनिकांनी राडा केल्याने त्यांना आल्या पावली परतावे लागले. नंतर सद्य:स्थितीत मालिका आयोजन होणे नाही, असे वक्तव्य अनुराग ठाकूर यांनी केले. ५८ वर्षांच्या मियॉँदादने भारत, आॅस्ट्रेलिया, इंग्लंड या देशांनी जागतिक क्रिकेटवर प्रभुत्व गाजविल्याबद्दल टीका केली. इंग्लंड- आॅस्ट्रेलियात सातत्याने अ‍ॅशेसचे आयोजन होते, तर भारत- पाक मालिका का होऊ नये, पाकसोबत पराभवाच्या भीतीमुळेच भारत
खेळत नसल्याचा आरोपही मियॉँदादने केला.(वृत्तसंस्था)