शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

‘बीएसी’ने मागितली पी. व्ही. सिंधूची माफी; रेफ्रीच्या चुकीच्या निर्णयाचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 09:18 IST

जपानच्या अकाने यामागुचीविरुद्ध झालेल्या उपांत्य सामन्यात पंचांकडून देण्यात आलेल्या चुकीच्या निर्णयानंतर सिंधूला अश्रू अनावर झाले होते.

नवी दिल्ली : यंदा एप्रिल महिन्यात झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान उपांत्य सामन्यात रेफ्रीद्वारे झालेल्या चुकीमुळे बॅडमिंटन आशियाच्या (बीएसी) तांत्रिक समितीने भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधू हिची माफी मागितली. बीएसी तांत्रिक समितीचे अध्यक्ष चिह शेन चेन यांनी, ‘त्या उपांत्य सामन्यात रेफ्रीद्वारे झालेल्या मानवी चुकीमुळे आम्ही सिंधूची माफी मागतो,’ असे सांगितले.

जपानच्या अकाने यामागुचीविरुद्ध झालेल्या उपांत्य सामन्यात पंचांकडून देण्यात आलेल्या चुकीच्या निर्णयानंतर सिंधूला अश्रू अनावर झाले होते. या निर्णयानंतर सिंधूने आपली लय गमावली आणि तिला पराभवानंतर कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. चेन यांनी सिंधूसाठी लिहिलेल्या पत्रात म्हटले की, ‘दुर्दैवाने आता त्या निर्णयामध्ये बदल करता येणार नाही; पण अशा मानवी चुका पुन्हा होऊ न देण्यासाठी आम्ही आवश्यक पावले उचलली आहेत. तुम्हाला झालेल्या असुविधांसाठी आम्ही प्रामाणिकपणे आपली माफी मागतो. आमच्या मते हा खेळाचा एक भाग आहे आणि या प्रकरणाचा खिलाडू वृत्तीने स्वीकार केला गेला पाहिजे.’ पहिला गेम जिंकल्यानंतर सिंधू दुसऱ्या गेममध्ये १४-११ अशी आघाडीवर होती. मात्र, यानंतर पंचांनी अधिक वेळेचा ब्रेक घेतल्याचे सांगत सिंधूला दंड म्हणून यामागुचीला एक अतिरिक्त गुण बहाल केला. यानंतर सिंधूची लय बिघडली आणि तिला तीन गेमपर्यंत रंगलेल्या या सामन्यात २१-१३, १९-२१, १६-२१ असा पराभव पत्करावा लागला होता. यानंतर  सिंधूने पंचांच्या या निर्णयाची तक्रार करताना जागतिक संस्थेला आणि आशियाई बॅडमिंटन महासंघाला पत्र लिहिले होते.

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधू