शहरं
Join us  
Trending Stories
1
लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
2
"INS विक्रांतच्या नावानेच पाकिस्तानची झोप उडवली होती.."; पंतप्रधान मोदींकडून गौरवोद्गार
3
ऐन दिवाळीत सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; एका झटक्यात चांदी ९ हजारांनी स्वस्त, सोन्याची नवी किंमत काय?
4
‘रो-को’चा फ्लॉप शो! गावसकर म्हणाले, "पुढे दोघांनी ही गोष्ट केली तर आश्चर्यचकित होऊ नका!"
5
‘...म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्या सासऱ्यांनी हत्या केली’, बच्चू कडूंचं धक्कादायक विधान  
6
वार्षिक भविष्य २०२५-२६: महालक्ष्मी कृपेने पुढील वर्षभर कोणत्या राशींना धन, यश आणि भाग्याची साथ?
7
'वॉर २'च्या अपयशानंतर अयान मुखर्जीने 'धूम ४'च्या दिग्दर्शनातून घेतली माघार, 'ब्रह्मास्त्र २'ची तयारी सुरु
8
ऐन दिवाळीत माधुरी दीक्षितला करावं लागलेलं टक्कल, खुद्द 'धकधक गर्ल'ने केला खुलासा
9
"मी मोदींचा भक्त, भाजप म्हणजे घर"; महेश कोठारे म्हणाले, "मुंबईवर कमळ फुलणार, महापौरही इथूनच"
10
पाकिस्तानचे सूर बदलले? शाहबाज यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; जगभरातील हिंदू असा उल्लेख केला, पण...
11
८०० वर्षांनी वैभव लक्ष्मी-महालक्ष्मी योगात लक्ष्मी पूजन: महत्त्व, महात्म्य, लक्ष्मी आरती
12
दहशत माजवणारा साद रिझवी कुठे गायब झाला? पीएम शहबाज शरीफ यांच्याही आणलेले नाकी नऊ!
13
हृदयस्पर्शी! शाळेच्या लाडक्या दास काकांची ३८ वर्षांची सेवा, वाजवली शेवटची घंटा; पाणावले डोळे
14
"भारताने इस्रायलकडून शिकायला हवे", RSS नेते भैयाजी जोशी नेमकं काय म्हणाले? धर्मांतरणावरही स्पष्टच बोलले!
15
दिवाळीनिमित्त मराठी अभिनेत्रीने पोस्ट केला लेकाचा गोड फोटो; म्हणाली, "माझ्या छोट्या स्टारची..."
16
WhatsApp युजर्सना मोठा धक्का; ChatGPT चा वापर करू देणार नाही मेटा, कारण...
17
"मोठी सती सावित्री बनून फिरतेय, रीलमध्ये फक्त पेटीकोटवर...", तान्या मित्तलची मालतीकडून पोलखोल
18
"आर्यनने त्याच्या दु:खावर सर्वांना हसवलं...", लक्ष्य लालवानीने केलं शाहरुखच्या लेकाचं कौतुक
19
"नगरविकास खाते माझ्याकडे; पैशांचा तुटवडा येणार नाही"; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाण्यात मोठा दावा
20
बांके बिहारी मंदिराच्या १०० वर्षांहून जुन्या 'तळघरात' अखेर काय सापडलं? साडे चार फूट सोन्याची काठी...

‘बीएसी’ने मागितली पी. व्ही. सिंधूची माफी; रेफ्रीच्या चुकीच्या निर्णयाचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 09:18 IST

जपानच्या अकाने यामागुचीविरुद्ध झालेल्या उपांत्य सामन्यात पंचांकडून देण्यात आलेल्या चुकीच्या निर्णयानंतर सिंधूला अश्रू अनावर झाले होते.

नवी दिल्ली : यंदा एप्रिल महिन्यात झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान उपांत्य सामन्यात रेफ्रीद्वारे झालेल्या चुकीमुळे बॅडमिंटन आशियाच्या (बीएसी) तांत्रिक समितीने भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधू हिची माफी मागितली. बीएसी तांत्रिक समितीचे अध्यक्ष चिह शेन चेन यांनी, ‘त्या उपांत्य सामन्यात रेफ्रीद्वारे झालेल्या मानवी चुकीमुळे आम्ही सिंधूची माफी मागतो,’ असे सांगितले.

जपानच्या अकाने यामागुचीविरुद्ध झालेल्या उपांत्य सामन्यात पंचांकडून देण्यात आलेल्या चुकीच्या निर्णयानंतर सिंधूला अश्रू अनावर झाले होते. या निर्णयानंतर सिंधूने आपली लय गमावली आणि तिला पराभवानंतर कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. चेन यांनी सिंधूसाठी लिहिलेल्या पत्रात म्हटले की, ‘दुर्दैवाने आता त्या निर्णयामध्ये बदल करता येणार नाही; पण अशा मानवी चुका पुन्हा होऊ न देण्यासाठी आम्ही आवश्यक पावले उचलली आहेत. तुम्हाला झालेल्या असुविधांसाठी आम्ही प्रामाणिकपणे आपली माफी मागतो. आमच्या मते हा खेळाचा एक भाग आहे आणि या प्रकरणाचा खिलाडू वृत्तीने स्वीकार केला गेला पाहिजे.’ पहिला गेम जिंकल्यानंतर सिंधू दुसऱ्या गेममध्ये १४-११ अशी आघाडीवर होती. मात्र, यानंतर पंचांनी अधिक वेळेचा ब्रेक घेतल्याचे सांगत सिंधूला दंड म्हणून यामागुचीला एक अतिरिक्त गुण बहाल केला. यानंतर सिंधूची लय बिघडली आणि तिला तीन गेमपर्यंत रंगलेल्या या सामन्यात २१-१३, १९-२१, १६-२१ असा पराभव पत्करावा लागला होता. यानंतर  सिंधूने पंचांच्या या निर्णयाची तक्रार करताना जागतिक संस्थेला आणि आशियाई बॅडमिंटन महासंघाला पत्र लिहिले होते.

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधू