शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
इंडिगोवर मोठा आर्थिक दंड लावा; डीजीसीए आणि कंपनीच्या प्रमुखांना हटवा
3
यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा
4
विमानसेवाच जमीनदोस्त ! अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू, प्रवाशांचे हाल
5
विरोधी पक्षनेतेपद मुद्यावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; ‘मविआ’ला खुर्चीचीच चिंता असल्याची सरकारची टीका
6
महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
7
क्रिकेटपटू स्मृती मानधना अन् पलाशचे लग्न अखेर माेडले; कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा : स्मृती
8
...ये दोस्ती हम नही तोडेंगे ! मोदी आणि पुतीन यांच्या भेटीकडे अमेरिका, युरोप आणि चीनचेही होते लक्ष
9
आजी-आजोबांच्या ‘स्क्रीन’च्या ‘व्यसनां’चं काय करणार?
10
गोव्यात नाइट क्लब ठरला ‘मृत्यू क्लब’; अग्नितांडवात २५ ठार; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
11
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
12
Bigg Boss 19: गौरव खन्नाने करुन दाखवलं! 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर कोरलं नाव
13
गोवा क्लबला दोन एक्झिट गेट, बाहेर पडण्यासाठी धडपडत होते लोक; यामुळे झपाट्याने पसरली आग
14
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
15
'बिग बॉस १९'मधून तान्या मित्तलचा प्रवास संपला; प्रणित मोरेची टॉप ३ मध्ये एन्ट्री, ट्रॉफी जिंकणार?
16
"उद्धव ठाकरे इंडिगोने फिरत नाहीत"; CM फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले,"अडचण असल्यास गाडी पाठवून देतो!"
17
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: शीतल तेजवानीनंतर रवींद्र तारूला अटक, घरातून घेतलं ताब्यात
18
610 कोटी रिफंड, 3000 बॅग परत केल्या..., इंडिगोच्या 1650 फ्लाइट ट्रॅकवर; भाडेवाढीसंदर्भात सरकारचे कडक निर्देश 
19
नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता मिळणार का? CM फडणवीस म्हणाले, "आमचा विरोध नाही, पण..."
20
'बिग बॉस १९'च्या ग्रँड फिनालेला सुरुवात, वोटिंग ट्रेंडनुसार 'हा' स्पर्धक जिंकण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

"मारा ***"; दंगल रोखण्यासाठी हातात पिस्तूल घेऊन उतरले अतिरिक्त पोलीस महासंचालक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 15:56 IST

उत्तर प्रदेशच्या बहराइचमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारादरम्यान एका पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Bahraich Violence : उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये झालेल्या हिंसाचारामध्ये दोन जणांच्या हत्येनंतर गावात प्रचंड तणावाचे वातावरण आहे. शेकडो आंदोलकांनी गाड्या आणि दुकानांना आग लावली आहे. परिसरात तणावाचे वातावरण असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी  पोलीस दलाच्या विशेष सहा तुकड्या पाठवण्यात आल्या आहेत. यासोबतच इंटरनेटही बंद करण्यात आले आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारची अफवा पसरवली जाणार नाही. दुसरीकडे, पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली जात असल्याचे समोर आलं आहे. अशातच अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) अमिताभ यश यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अमिताभ यश यांनी पिस्तुल हवेत उंचावून आंदोलकांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत आहेत.

बहराइचमधील मन्सूर गावातील महाराजगंज परिसरात दुर्गा मूर्तीच्या विसर्जनासाठी मिरवणूक काढण्यात आली होती. या हिंसाचारात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला असून दगडफेकीत सुमारे अर्धा डझन लोक जखमी झाले आहेत. बहराइचमध्ये गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर योगी सरकारने कठोर भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. लखनऊहून गृह विभागाचे सचिव संजीव गुप्ता यांच्यासह एडीजी कायदा आणि सुव्यवस्था अमिताभ यशही बहराइचला पोहोचले आहेत. अमिताश यश यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली असून, त्यात ते हातात पिस्तूल घेऊन संतप्त जमावावर कारवाई करण्याबाबत बोलताना दिसत आहे. अमिताभ यश पिस्तुल हातात घेऊन जमावाचा पाठलाग करताना दिसत आहेत.

एडीजी अमिताभ यश यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दंगलखोरांना पळवून लावणाऱ्या पोलिसांच्या मध्ये अचानक आलेल्या अमिताभ यांनी एका हातात पिस्तुल घेऊन पोलिसांनी कारवाई करण्याची सूचना केली. एका हातात मोबाईल आणि चष्मा आणि दुसऱ्या हातात पिस्तूल धरून अमिताभ यश हे पोलिसांना यांना मारा असे म्हणताना दिसत आहे. परिस्थिती बिघडल्यापासून पोलीस दल रस्त्यावर उतरले असून दंगलखोरांवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहे. त्यामुळे इंटरनेट सेवेवरही बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान, बहराइचमध्ये रविवारी झालेल्या जातीय हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी सुमारे ३० जणांना ताब्यात घेतले आहे. बहराइचच्या पोलिस अधीक्षक वृंदा शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, महसी तहसील अंतर्गत महाराजगंज भागात तणावाचे वातावरण आहे. मिरवणूक मुस्लिमबहुल भागातून जात असताना दुसऱ्या समुदायातील व्यक्तीवर कथित हल्ला करण्यात आला, यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी सुमारे ३० जणांना ताब्यात घेतले आहे. दंगलग्रस्त भागात सामान्य स्थिती पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

रविवारी मूर्ती विसर्जनाच्या वेळी महाराजगंज मार्केटमधील मशिदीजवळ झालेली दगडफेक, त्यानंतर मारामारी आणि त्यानंतर राम गोपाल मिश्रा नावाच्या मुलाचा मृत्यू झाल्यापासून हिंसाचार थांबलेला नाही. सोमवारी सकाळी महाराजगंज परिसरात लोकांनी पुन्हा गोंधळ घातला. आरोपींना अटक करण्याची मागणी करत जमावाने अनेक ठिकाणी जाळपोळ केली. दंगलखोरांनी हिरो मोटरसायकलच्या शोरूमजवळील एका ठिकाणी दुचाकी, कार आणि दुकान पेटवून दिले. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस