शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
5
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
6
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
7
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
8
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
9
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
10
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
11
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
12
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
13
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
14
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
15
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
16
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
17
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
18
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
19
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
20
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान

"मारा ***"; दंगल रोखण्यासाठी हातात पिस्तूल घेऊन उतरले अतिरिक्त पोलीस महासंचालक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 15:56 IST

उत्तर प्रदेशच्या बहराइचमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारादरम्यान एका पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Bahraich Violence : उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये झालेल्या हिंसाचारामध्ये दोन जणांच्या हत्येनंतर गावात प्रचंड तणावाचे वातावरण आहे. शेकडो आंदोलकांनी गाड्या आणि दुकानांना आग लावली आहे. परिसरात तणावाचे वातावरण असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी  पोलीस दलाच्या विशेष सहा तुकड्या पाठवण्यात आल्या आहेत. यासोबतच इंटरनेटही बंद करण्यात आले आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारची अफवा पसरवली जाणार नाही. दुसरीकडे, पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली जात असल्याचे समोर आलं आहे. अशातच अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) अमिताभ यश यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अमिताभ यश यांनी पिस्तुल हवेत उंचावून आंदोलकांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत आहेत.

बहराइचमधील मन्सूर गावातील महाराजगंज परिसरात दुर्गा मूर्तीच्या विसर्जनासाठी मिरवणूक काढण्यात आली होती. या हिंसाचारात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला असून दगडफेकीत सुमारे अर्धा डझन लोक जखमी झाले आहेत. बहराइचमध्ये गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर योगी सरकारने कठोर भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. लखनऊहून गृह विभागाचे सचिव संजीव गुप्ता यांच्यासह एडीजी कायदा आणि सुव्यवस्था अमिताभ यशही बहराइचला पोहोचले आहेत. अमिताश यश यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली असून, त्यात ते हातात पिस्तूल घेऊन संतप्त जमावावर कारवाई करण्याबाबत बोलताना दिसत आहे. अमिताभ यश पिस्तुल हातात घेऊन जमावाचा पाठलाग करताना दिसत आहेत.

एडीजी अमिताभ यश यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दंगलखोरांना पळवून लावणाऱ्या पोलिसांच्या मध्ये अचानक आलेल्या अमिताभ यांनी एका हातात पिस्तुल घेऊन पोलिसांनी कारवाई करण्याची सूचना केली. एका हातात मोबाईल आणि चष्मा आणि दुसऱ्या हातात पिस्तूल धरून अमिताभ यश हे पोलिसांना यांना मारा असे म्हणताना दिसत आहे. परिस्थिती बिघडल्यापासून पोलीस दल रस्त्यावर उतरले असून दंगलखोरांवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहे. त्यामुळे इंटरनेट सेवेवरही बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान, बहराइचमध्ये रविवारी झालेल्या जातीय हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी सुमारे ३० जणांना ताब्यात घेतले आहे. बहराइचच्या पोलिस अधीक्षक वृंदा शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, महसी तहसील अंतर्गत महाराजगंज भागात तणावाचे वातावरण आहे. मिरवणूक मुस्लिमबहुल भागातून जात असताना दुसऱ्या समुदायातील व्यक्तीवर कथित हल्ला करण्यात आला, यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी सुमारे ३० जणांना ताब्यात घेतले आहे. दंगलग्रस्त भागात सामान्य स्थिती पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

रविवारी मूर्ती विसर्जनाच्या वेळी महाराजगंज मार्केटमधील मशिदीजवळ झालेली दगडफेक, त्यानंतर मारामारी आणि त्यानंतर राम गोपाल मिश्रा नावाच्या मुलाचा मृत्यू झाल्यापासून हिंसाचार थांबलेला नाही. सोमवारी सकाळी महाराजगंज परिसरात लोकांनी पुन्हा गोंधळ घातला. आरोपींना अटक करण्याची मागणी करत जमावाने अनेक ठिकाणी जाळपोळ केली. दंगलखोरांनी हिरो मोटरसायकलच्या शोरूमजवळील एका ठिकाणी दुचाकी, कार आणि दुकान पेटवून दिले. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस