शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
2
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
3
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
4
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
5
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
6
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
7
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
8
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
9
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
10
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
11
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
12
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
13
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
14
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
15
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
16
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
17
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
18
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
19
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला

नवी मुंबईतील मतदारांनी दाखवला मतदानात निरुत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2019 12:06 AM

ठाणे लोकसभेसाठी झालेल्या मतदानात नवी मुंबईकरांचा निरुत्साह दिसून आला आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातून निम्म्यापेक्षाही कमी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे.

सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : ठाणे लोकसभेसाठी झालेल्या मतदानातनवी मुंबईकरांचा निरुत्साह दिसून आला आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातून निम्म्यापेक्षाही कमी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. त्यापैकी कोणत्या उमेदवाराच्या पारड्यात किती मतदान पडले हे २३ मेच्या मोजणीअंती स्पष्ट होणार असून, त्यावरूनच आगामी विधानसभेची गणिते बांधली जाणार आहेत.

ठाणे लोकसभेसाठी सोमवारी झालेल्या मतदानात नवी मुंबई महापालिका क्षेत्रातून ४५.९२ टक्के मतदान झाले आहे. महापालिका क्षेत्रात सद्यस्थितीला आठ लाख २४ हजार ७०२ मतदार नोंदीवर आहेत, त्यापैकी तीन लाख ७८ हजार ७२८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याचे प्रमाण अवघे ४५.९२ टक्के आहे. त्यापैकी ऐरोली विधानसभेतून ४३.४८ टक्के तर बेलापूरमधून ४८.८३ टक्के मतदान झाले आहे. मागील लोकसभेच्या तुलनेत यंदा दोन्ही विधानसभा क्षेत्रात मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे, त्यामुळे मतदानाचाही टक्का वाढणे अपेक्षित होते. मात्र, तसे न होता घसरलेल्या टक्क्यामुळे मतदारांचा निरुत्साह दिसून येत आहे. मतदानाचा टक्का घसरण्यामागे इतरही कारणे असून त्यामध्ये दुबार मतदारांच्या नोंदीसह सुट्टीची संधी साधून गाव गाठलेल्या मतदारांचेही प्रमाण दखलपात्र आहे. मात्र, लोकसभेच्या या मतदानावरून आगामी विधानसभेची बांधणी केली जाणार आहे. २३ मेला मतमोजणी झाल्यानंतर कोणत्या उमेदवाराला किती मते मिळाली हे स्पष्ट होणार आहे. त्यानंतर कोणत्या राजकीय पक्षाची कसोटी लागणार आहे याचेही चित्र उघड होणार आहे.

सद्यस्थितीला बेलापूर विधानसभेत दोन लाख तीन हजार ३० मतदार असून, त्यापैकी अवघ्या एक लाख ८३ हजार ६२८ मतदारांनी मतदान केले आहे. त्यात पुरुषांचा आकडा अधिक असून, तो एक लाख १७२ इतका आहे. तर ऐरोली विधानसभा क्षेत्रात चार लाख ४८ हजार ६८१ मतदारांपैकी एक लाख ९५ हजार ९८ मतदारांनी मतदान केले आहे. त्यात महिलांचे प्रमाण ४३.४१ टक्के तर पुरुषांचे प्रमाण ४३.५४ टक्के इतके आहे. ऐरोली व बेलापूर विधानसभेच्या तुलनेत बेलापूरमध्ये कमी मतदार असतानाही मतदानाची टक्केवारी ऐरोलीपेक्षा अधिक आहे.यंदा प्रथमच शासनाकडून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले, त्यानुसार नवी मुंबईतही मतदानाच्या जनजागृतीवर भर देण्यात आला होता. सार्वजनिक ठिकाणी पथनाट्यांसह तरुणांमध्ये मतदानाच्या हक्काविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली आहे.

यानंतरही ५० टक्क्यांचाही आकडा पार होऊ शकलेला नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हा टक्का वाढवण्यासाठी कसोटी लागणार आहे. तृतीयपंथी दुर्लक्षितच शहरात अनेक ठिकाणी तृतीयपंथीचे वास्तव्य दिसून येत आहे. त्यांच्यातही मतदानाविषयी जागरूकता निर्माण करणे आवश्यक असतानाही केवळ ३३ तृतीयपंथीची मतदारयादीत नोंदणी असून त्यापैकी तिघांचा बेलापूरमध्ये तर उर्वरितांचा ऐरोली विधानसभेत समावेश आहे. त्यापैकी ऐरोलीत अवघ्या आठ तृतीयपंथींनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे.

फुगीर आकड्याची डोकेदुखी

मतदानाचा टक्का घसरण्यामागे मतदारयादीतल्या फुगीर आकड्याचेही प्रमुख कारण मानले जात आहे. अनेक मतदारांची एकाच विधानसभेत दुबार नावे असून अनेक मयतांची नावेही यादीतून वगळण्यात आलेली नाहीत. दुबार मतदारांमध्ये भाडोत्री रहिवाशांचा सर्वाधिक समावेश आहे. मात्र, यंत्रणेतील ढिसाळ कारभारामुळे एका ठिकाणचे नाव न वगळता दुसऱ्या ठिकाणी नावाची नोंदणी होत असल्याने मतदारांचा आकडा फुगत चालला आहे. तर काही ठिकाणी बोगस मतदारांची देखील नोंदणी होत असून दोन्ही विधासभेतील अशा बोगस मतदारांची नावे यापूर्वीही राजकीय पक्षांनी निवडणूक विभागाकडे सुपूर्द केलेली आहेत. त्यामुळे देखील मतदारांचा आकडा फुगत असून एकूण मतदानाच्या टक्केवारीवर त्याचा परिणाम होत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईElectionनिवडणूकVotingमतदान