शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

उरणमध्ये ९० घरे धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 02:26 IST

उरण शहरात ९० घरे, चाळी आणि इमारती धोकादायक ठरविण्यात आल्या आहेत. घरमालकांना नोटिसा बजाविल्यानंतरही अशा धोकादायक घरांत ४३ कुटुंब वास्तव्य करीत असल्याचे खळबळजनक वास्तव समोर आले आहे.

उरण : उरण शहरात ९० घरे, चाळी आणि इमारती धोकादायक ठरविण्यात आल्या आहेत. घरमालकांना नोटिसा बजाविल्यानंतरही अशा धोकादायक घरांत ४३ कुटुंब वास्तव्य करीत असल्याचे खळबळजनक वास्तव समोर आले आहे.मुंबई घाटकोपर येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर धोकादायक इमारतींचा विषय ऐरणीवर आला आहे. उरण नगरपरिषदेच्या हद्दीत बाजारपेठ, मोरा, भवरा, बोरी, कुंभारवाडा आदी ठिकाणी ९० घरे धोकादायक असल्याचे सर्वेक्षणानंतर आढळून आले आहे. उनपने केलेल्या सर्व्हेनंतर धोकादायक ठरविण्यात आलेल्या ९० घरांमध्ये कौलारू घरे ८३, एक मजली वाडे अथवा बैठ्या चाळी ४, तर ३ इमारतींचा समावेश असल्याची माहिती उनपचे नगर अभियंता अनुपकुमार कांबळे यांनी दिली. १९६० सालापूर्वी असलेली धोकादायक घरे, वाडे, चाळी, इमारतींना उरण नगरपरिषदेने अनेकदा नोटिसाही बजावल्या आहेत. अतिवृष्टी अथवा खराब हवामानामुळे घरे, इमारती कोसळण्याची भीती असल्याने उनपने शक्यताही व्यक्त केली आहे. मात्र, उनपच्या नोटिशींनंतर धोकादायक घरात सध्या ४३ कुटुंबे वास्तव करीत असल्याची माहिती उनपचे नगर अभियंता अनुपकुमार कांबळे यांनी दिली.बहुतांश धोकादायक घरांमध्ये एक मजली कौलारू घरे अथवा चाळी, वाडेच आहेत. धोकादायक घरांमध्ये वास्तव्य करीत असलेले बहुतांश कुटुंबे अनेक वर्षांपासून भाडोत्री म्हणूनच राहत आहेत. काही पगडी पद्धतीने, तर काही नाममात्र ५० ते ५०० रुपये मासिक भाडे देऊन अनेक वर्षांपासून राहात आहेत. अनेक घरांचे मालक हयात नाहीत. त्यामुळे तर मालकांच्या पश्चात असलेल्या घरमालकांच्या वारसांना भाड्यांनी दिलेल्या घरांची दुरुस्ती करण्यात स्वारस्य नाही. घरे, इमारतींच्या दुरुस्तीची भाडोत्र्यांची इच्छा असली तरी त्यासाठी घरमालक परवानगी देण्यास तयार नाहीत. तर केवळ मालमत्तेच्या हव्यासापोटी आर्थिक सुबत्ता असतानाही अनेक भाडोत्री कुटुंबे जीव मुठीत घेऊन धोकादायक घरांमध्ये वास्तव्य करून आहेत. तर खरोखरच भाड्याने घर घेण्याची अथवा नवीन घर घेण्याची ऐपत नसल्यानेच काही गरीब गरजू कुटुंबे नाइलाजास्तव धोकादायक घरात जीव मुठीत घेऊन राहात आहेत. घरमालक आणि भाडोत्री यांच्यातील मालकी हक्काबाबत एकमत होत नसल्याने वादाचे प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे घरांच्या जागा जमिनीबाबत एकमत होत नसल्याने वादाचे प्रकार घडू लागले आहेत. यामुळे घरांच्या जागा जमिनीबाबत घरमालक आणि भाडोत्री यांच्यातील वादाचे अनेक खटले निवाड्यासाठी न्यायालयात दाखल झालेले आहेत.वादात अडकलेली अशी अनेक घरे, चाळी, इमारतींचा वापर बंद करून मालकांनी त्यांना टाळे ठोकणेच पसंत केले असल्याचीही अनेक उदाहरणे असल्याची माहितीही उनपचे नगर अभियंता अनुपकुमार कांबळे यांनी दिली. मात्र, दुर्दैवाने एखादी अप्रिय घटना घडल्यास नोटिसा बजावूनही धोकादायक घरांमध्ये राहणाºया ४३ कुटुंबीयांबाबत उनप नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.