उरण : समुद्राची ओहोटी, मोरा बंदरात साचलेल्या गाळामुळे ३ ते ८ डिसेंबरपर्यंत सलग सहा दिवस मोरा-भाऊचा धक्का सागरी मार्गावरील प्रवासी लॉन्च वाहतूक संध्याकाळनंतर बंद राहणार आहे. ऐन दत्तजयंतीच्या यात्रेतच प्रवासी वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांसह स्थानिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
कोट्यवधींचा खर्च करूनही मोरा बंदरात गाळाची समस्या अद्यापही कायम राहिली आहे. मोरा बंदरात साचलेला गाळ व समुद्राच्या ओहोटीमुळे प्रवासी लॉन्चेस धक्क्यापर्यंत पोहोचतच नाहीत. यामुळे समुद्राच्या उधाणाच्या ओहोटीत महिन्यातील तीन-चार दिवस प्रवासी वाहतूक बंद करण्यात येते.
आताही बुधवारपासून (३) दुपारनंतर मोरा-भाऊचा धक्कादरम्यानची सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक बंद केली आहे. तर बुधवारपासून सोमवारपर्यंत सलग सहा दिवस दुपारनंतर प्रवासी वाहतूक बंद केल्याची माहिती एमएमडीचे बंदर निरिक्षक सुशील साटेलकर यांनी दिली.
सफाईसाठी खर्च केलेले कोट्यवधी रुपये पाण्यात
ओहोटी, गाळाच्या समस्येमुळे अनेक वर्षांपासून ठराविक काळावधीसाठी प्रवासी वाहतूक बंद ठेवण्याची वेळ येत आहे. कोट्यवधींच्या खर्चानंतरही गाळाची समस्या कायम राहिली आहे.
Web Summary : Ferry services between Uran and Bhaucha Dhakka are suspended for six days due to silt accumulation in Mora port. Passengers face inconvenience during the Datta Jayanti festival, sparking local anger. Dredging costs have been ineffective, leaving the silt problem unresolved.
Web Summary : उरण और भाऊचा धक्का के बीच फेरी सेवा मोरा बंदरगाह में गाद जमा होने के कारण छह दिनों के लिए निलंबित है। दत्ता जयंती उत्सव के दौरान यात्रियों को असुविधा का सामना करना पड़ रहा है, जिससे स्थानीय लोगों में गुस्सा है। गाद निकालने की लागत अप्रभावी रही है।