शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणासाठी वृक्षलागवड लाभदायी

By admin | Updated: July 2, 2017 06:20 IST

राज्यात एकाच दिवशी चार कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. देशभरात महाराष्ट्राचा वृक्ष लागवडीत पहिला क्रमांक

जयंत धुळप/लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : राज्यात एकाच दिवशी चार कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. देशभरात महाराष्ट्राचा वृक्ष लागवडीत पहिला क्रमांक लागतो. वृक्षारोपणामुळे पर्यावरण समतोल राखला जाईल. वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करणे महत्त्वाचे असून, भावी पिढीसाठी ते लाभदायी ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माणमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश महेता यांनी शनिवारी येथे केले. ४ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत रायगड जिल्ह्याच्या वाडगाव येथे आयोजित जिल्ह्याच्या मुख्य कार्यक्रमात पालकमंत्री महेता बोलत होते. या वेळी आमदार पंडित पाटील, आमदार प्रवीण दरेकर, वाडगावचे सरपंच जयेंद्र घरत, जिल्हाधिकारी पी. डी. मलिकनेर, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, उपवनसंरक्षक मनीषकुमार, सामाजिक वनीकरणचे उपसंचालक आप्पासाहेब निकत, परिक्षेत्र वनअधिकारी आर. एस. पाटील, उपजिल्हाधिकारी रोहयो जयमाला मुरुडकर, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महेता म्हणाले, लावलेल्या झाडाचे संवर्धन करणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. उद्दिष्टापेक्षा जास्त झाडे लावल्याबद्दल त्यांनी रायगड जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाडगावचे माजी सरपंच ऋ षीकेश भगत यांनी केले. वृक्षारोपण कार्यक्रमास परिसरातील नागरिक, शेतकरी, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.सावळे शाळेत कृषिदिन मोहोपाडा : सावळे येथील ज्ञानवर्धिनी विद्यालयाच्या आवारात कृषिदिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. या ‘वेळी झाडे लावा झाडे जगवा’चा संदेश देत, माजी सभापती गजानन माळी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. शाळेच्या आवारात विविध जातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक पी. आय. गायकवाड, माजी सरपंच बी. एन. कांबळे आदींसह शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.लागवडीबरोबर संवर्धनही महत्त्वाचेआगरदांडा : मुरु ड तहसीलदार प्रांगणात व तेथील परिसरात मुरु डच्या नगराध्यक्षा स्नेहा पाटील व तहसीलदार -उमेश पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्या वेळी मुरु ड तहसीलदार उमेश पाटील, नगराध्यक्षा स्नेहा पाटील, नायब तहसीलदार नगरसेवक विजय पाटील आदी उपस्थित होते.मुरु ड तहसीलदार -उमेश पाटील यांनी वृक्ष लागवडीबरोबरच त्यांचे संवर्धन, संगोपनाची गरज असल्याचे स्पष्ट केले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने झाडांची लागवड करावी, असे आवाहन या वेळी केले. चावडी वाचन उपक्रमाचा लाभ घ्यावा१शासनाने सुरू केलेल्या चावडी वाचन उपक्र माचा जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन नेहुली येथे प्रशासनाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री महेता यांनी केले. या वेळी सात-बारा उताऱ्यांचे वाटपही करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे, आमदार प्रवीण दरेकर, जिल्हाधिकारी पी. डी. मलिकनेर, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, आदी मान्यवर उपस्थित होते.२महेता म्हणाले, राज्य शासनाने चावडी वाचनाचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम हाती घेतला असून, शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. रायगड जिल्ह्याने सात-बारा वाटपाचे ८८ टक्के काम पूर्ण केले आहे. चावडी वाचन कार्यक्र म शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन करून या कार्यक्र मातून ग्रामस्थांना सात-बारा, फेरफार या ंविषयी माहिती मिळणार आहे.वृक्षलागवडीला सुरुवात च्पाली : सुधागड तालुक्यात पालीतील तहसील कार्यालयाच्या आवारात महसूल, वन, पोलीस, पंचायत समिती, सामाजिक वनीकरण, तसेच सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून वृक्ष लागवड करण्यात आली. मोहिमेत सुधागड तालुक्यातील सर्वच अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला. पोलीस ठाण्यात वृक्षारोपणवडखळ : पेण तालुक्यातील वडखळ पोलीस ठाण्याच्या आवारात वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेगरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वडखळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक के. एल. पाटील, एन. एन. राऊळ, बी. एस. पाटील, एस. एस. अधिकारी, इ. पी. सकपाळ, व्ही. के. गोंजी, आदीसह वडखळ पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते.पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण करणे गरजेचे असून नागरिकांनी वृक्षारोपणाबरोबरच त्यांचे संगोपन करून पर्यावरणाचे संतुलन राखावे, असे अवाहन पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेगरे यांनी या वेळी केले.