शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

आदिवासींसाठी अन्नसुरक्षाही नाही

By admin | Updated: October 6, 2016 03:36 IST

प्राथमिक सुविधा नसलेल्या रानसईमधील आदिवासींना दोन वेळचे अन्न मिळविण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे.

नामदेव मोरे , नवी मुंबई प्राथमिक सुविधा नसलेल्या रानसईमधील आदिवासींना दोन वेळचे अन्न मिळविण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे. शिधावाटप विभाग प्रत्येक महिन्याला त्यांच्यासाठी धान्य, साखर व रॉकेलचा पुरवठा करत आहे. परंतु ते धान्य पूर्णपणे लाभार्थींपर्यंत पोहचतच नाही. अर्ध्या धान्यावर मध्यस्थ डल्ला मारत आहेत. गावात रेशन दुकान असल्याची नोंद सरकारी दप्तरी असली तरी प्रत्यक्षात धान्य आणण्यासाठी दोन तास पायपीट करून चिरनेरपर्यंत जावे लागत आहे. उरण तालुक्यामधील रानसई आदिवासी पाड्यांमधील समस्यांवर ‘लोकमत’ने प्रकाश टाकल्यानंतर पूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शासकीय यंत्रणेचा अनागोंदी कारभार समोर येवू लागला आहे. प्रस्तावित विमानतळापासून जवळच असलेल्या या पाड्यांमधील रहिवाशांना प्राथमिक सुविधाही मिळत नाहीत. पावसाळ्यात भाजीपाला पिकवून उदरनिर्वाह करणाऱ्या आदिवासींना उन्हाळ्यात रोजगाराचे साधनच नाही. रोजगार हमी योजना व नरेगाची कामेही मिळत नाहीत. अशा स्थितीमध्ये दोन वेळचे जेवण मिळविण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे. शासनाने आदिवासींना स्वस्त दरामध्ये धान्य पुरवठा करण्यासाठी गावामधील राया धानया शिंगवा याला शिधावाटप दुकान मंजूर करून दिले आहे. अनेक वर्षांपासून दुकान त्याच्या नावावर असले तरी प्रत्यक्षात दुकानाचा कारभार दुसरीच व्यक्ती पहात आहे. नियमाप्रमाणे आदिवासींना त्यांच्या पाड्यावर स्वस्त धान्य दुकानात धान्य उपलब्ध झाले पाहिजे. परंतु दुकान चिरनेरमध्ये असल्याने दोन तास पायी चालत जावे लागते व धान्य घेवून पुन्हा दोन ते अडीच तास चालून गावामध्ये यावे लागत आहे. रेशनवर महिन्यामधून फक्त एक दिवस धान्य दिले जाते. दुकानदाराने निरोप पाठविला की सर्व कामे सोडून रेशनसाठी जावे लागते. त्या दिवशी कोणी गेले नाही तर त्या महिन्याचे रेशनच दिले जात नाही. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावरून रानसई गावाच्या धान्यपुरवठ्याविषयी माहिती घेतली असता अनेक आश्चर्यजनक गोष्टी निदर्शनास आल्या आहेत. शासन प्रत्येक महिन्यामध्ये आदिवासींसाठी पूर्ण धान्याचे वितरण करत आहे. जानेवारी ते आॅगस्टपर्यंत प्रत्येक महिन्यात १७०० लिटर रॉकेलचा पुरवठा झाला आहे. प्रत्येक शिधापत्रिकाधारकास ५ लिटरप्रमाणे रॉकेलचा पुरवठा करण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे. प्रत्यक्षात १ ते २ लिटरच रॉकेल देण्यात येत असल्याची माहिती येतील रहिवाशांनी दिली आहे. जूनपर्यंत ३०८ शिधापत्रिका होत्या. जुलैमध्ये अचानक ४३९ शिधापत्रिका असल्याची नोंद आहे. अचानक एवढ्या शिधापत्रिका कशा वाढल्या याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जानेवारीपासून रानसईमधील प्रत्येक शिधापत्रिकाधारकासाठी २ किलो साखरेचा पुरवठा होणे अपेक्षित होते. परंतु तीही पूर्णपणे मिळालेली नाही. अंत्योदय योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला दहा किलो गहू व २५ किलो तांदूळ मंजूर असून तेही पूर्णपणे मिळत नसल्याची खंत रहिवाशांनी व्यक्त केली आहे. आम्ही जगायचे कसे?रेशनवर पुरेसे धान्य मिळत नाही. दुकानदार सांगेल त्याच दिवशी जावून धान्य घ्यावे लागत आहे. वास्तविक आदिवासींसाठी रोजगाराचे काहीही साधन नाही. पावसाळ्यात भाजीपाला पिकवून उदरनिर्वाह केला जातो. उन्हाळ्यात पनवेल व उरण परिसरात जावून रोजंदारीची कामे करावी लागतात. रेशनवर धान्य मिळत नाही व महागाईमुळे बाहेरून खरेदी करणे परवडत नसल्याने आम्ही जगायचे कसे, असा प्रश्न रहिवाशांनी उपस्थित केला आहे.