शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
3
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
4
Mithilesh Tiwari: बिहारच्या मुख्यमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
5
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
6
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
7
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
8
नेपाळमध्ये पंतप्रधान होताच बालेन शाह यांचा 'भारतविरोधी' अवतार! ४५ दिवसांत घेतले ४ मोठे निर्णय
9
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
10
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
11
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
12
अजबच! SBI च्या एटीएममध्ये सुरू आहे सलून, पैसे काढण्यासाठी येणारे होताहेत अवाक्, नेमका प्रकार काय?
13
'२०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर..,' रॉबर्ट कियोसाकी यांनी दिला आणखी एक मोठा इशारा
14
Google New QR Code: गुगलचा मास्टर प्लॅन! आता QR कोड स्कॅन केल्याशिवाय कोणतीही वेबसाईट उघडणार नाही; पाहा काय आहे नवा नियम
15
एका पेक्षा एक तगड्या खेळाडूंपासून सारं काही होतं, पण...., ही बाब ठरली मुंबईच्या अपयशाचं सर्वात मोठं कारण
16
‘तुम तो ठहरे परदेसी’चे गीतकार जहीर आलम यांचे निधन; शब्दांनी जग जिंकले, पण आयुष्य काढले गरिबीत
17
रात्रभर घराबाहेर खाटेवर झोपला, सकाळी 'पत्नी विष प्यायली' म्हणत रडला; क्रूर पतीचा 'असा' उघड झाला बनाव!
18
Daily Worship: १०० वर्षांचे आयुष्य आणि निरोगी शरीर हवंय? मग रोज सकाळी म्हणा 'हा' प्रभावशाली श्लोक
19
मृत्यूला हरवलं, कॅन्सरशी लढत अद्वैती बनली 'टॉपर'; जिद्द, संघर्षमय यशाच्या प्रवासाचा विद्यार्थ्यांसमोर आदर्श
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना योद्ध्यांच्या प्रयत्नांना यश; १२४८ जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 23:41 IST

कोविडविषयी भीती झाली कमी : ७९ दिवस अविरत संघर्ष सुरू

नामदेव मोरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेसह शासन यंत्रणा सलग ७९ दिवस अविश्रांत कोरोनाशी लढा देत आहे. कोरोना योद्ध्यांच्या या प्रयत्नांना यश येत असून आतापर्यंत तब्बल १,२४८ जणांना बरे करण्यात यश आले आहे. उपचार पूर्ण झालेले अनेक जण पूर्ववत कर्तव्यावर हजरही होऊ लागले असून आजाराविषयी नागरिकांमधील भीती कमी होत आहे.


नवी मुंबईमध्ये १३ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला व त्यामुळे शहरात खळबळ उडाली. स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या शहराभोवती कोरोनाचा विळखा घट्ट होऊ लागला. मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी जाणारे डॉक्टर्स, नर्स, बेस्ट बस वाहक, व्यवसायिक यांना कोरोनाची लागण होऊ लागली. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमुळे रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. बघता बघता नवी मुंबईमध्ये कोरोनाने दोन हजारचा आकडा ओलांडला आहे. प्रतिदिन वाढणाऱ्या आकड्यांमुळे शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.


महानगरपालिका प्रशासनाने कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी तातडीने पावले उचलून चार स्तरीय उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली. महानगरपालिका रुग्णालयाबरोबर खाजगी रुग्णालयांचीही मदत घेण्यास सुरुवात केली. १३ मार्चपासून एकही दिवस सुट्टी न घेता अनेक अधिकारी व कर्मचारी अविश्रांतपणे परिश्रम घेत आहेत. या प्रयत्नांना आता यश येऊ लागले आहे. नवी मुंबईमधील रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे.


वाढणाºया रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणारांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी सर्वाधिक २७७ रुग्ण बरे झाले आहेत. तब्बल ५८ टक्के रुग्ण बरे झाले असून रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांपेक्षा बरे होऊन घरी परतलेल्यांची संख्या आता जास्त झाली आहे. नवी मुंबई महापालिकेने ७९ दिवसांमध्ये साडेअकरा हजार नागरिकांची तपासणी केली आहे. यामध्ये साडेआठ हजार जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत २८ हजारपेक्षा जास्त नागरिकांना क्वारंटाइन करण्यात आले असून त्यापैकी २० हजार ५०० पेक्षा जास्त नागरिकांनी क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण केला आहे. बरे होणाºयांची संख्या वाढू लागल्यामुळे नागरिकांचे मनोबलही वाढू लागले आहे.


७९ दिवस अविश्रांत मेहनत
1नवी मुंबई महापालिकेमध्ये १३ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. तेव्हापासून ७९ दिवस महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, मुख्य आरोग्य अधिकारी, साथ नियंत्रण अधिकारी, आरोग्य विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी, सफाई व इतर कामगार अविश्रांतपणे काम करीत आहेत. अनेक जण साप्ताहिक सुट्टी न घेता काम करीत असून या प्रयत्नांना यश येऊ लागले आहे.
मनोबल वाढले
2वाढणाºया रुग्णांपेक्षा बरे होणाºया रुग्णांचे प्रमाण वाढू लागल्यामुळे महानगरपालिका, पोलीस व इतर सर्वच शासकीय यंत्रणांसह शहरवासीयांचेही मनोबल वाढू लागले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोनामुक्त झालेले कर्मचारी पुन्हा कर्तव्यावर हजर झाले आहेत. अशाच पद्धतीने प्रयत्न सुरू झाल्यास लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासनाकडून दिलेल्या नियमावलीची योग्य अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

बाधितांप्रति नागरिकांचा सकारात्मक दृष्टिकोन
यापूर्वी क्वॉरंटाइन झालेल्यांकडेही दूषित नजरेने पाहिले जात होते. परंतु महानगरपालिकेने केलेली जनजागृती व केलेल्या उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. येणाºया काळात रुग्ण बरे होण्याची संख्या अजून झपाट्याने वाढून नवी मुंबई लवकरात लवकर कोरोनामुक्त करण्याच्या दृष्टीने महानगरपालिका प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. नागरिकांनीही नियमांचे पालन करून या लढ्यास सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी केले.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या